शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

पतंगरावांनी पैशाचा वापर केला

By admin | Updated: May 17, 2015 01:19 IST

विलासराव जगताप : सर्वसाधारण गटात चिंध्या कशा झाल्या?

सांगली : जिल्हा बँक निवडणुकीत मर्यादित मतदारसंख्या असलेल्या सोसायटी गटात पैशाच्या बळावर मते फिरवता येतात, म्हणून पतंगराव कदम यांनी केवळ ‘अ’ गटातच लक्ष घातले. त्याठिकाणी पैशाचा वापर करून त्यांनी काही जागा जिंकल्या, असा आरोप भाजपचे आ. विलासराव जगताप यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. ते म्हणाले की, पतंगरावांचे राजकारण पै-पाहुण्यांच्या पलिकडे कधी गेले नाही. जिल्हा बँक निवडणुकीत त्यांचेच नातेवाईक सोसायटी गटातून उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी धनशक्ती पणाला लावली. दुसरे कोणी उमेदवार असते, तर त्यांनी इतकी मेहनत घेतली नसती. नात्यातील लोकांसाठी त्यांनी जनसुराज्य व राष्ट्रवादीची मते पैशाच्या जोरावर फोडली. पतंगरावांना ‘जनसुराज्य’चे नेते विनय कोरे यांच्या भेटीसाठी लाचार व्हावे लागले. पैशासाठी मतदारांना लाचार करताना तेसुद्धा लाचार झाले. या गोष्टीतच आमचे यश आहे. वैयक्तिक सूडभावनेतून त्यांनी आजवर राजकारण केले आहे. जत तालुक्यातील पतंगरावांच्या गटाचे नेते कमकुवत आहेत. यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये विक्रम सावंत यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे सोसायटी गटातील या विजयाने जग जिंकल्याचा किंवा आकाश हाताला आल्याचा आव त्यांनी आणू नये. पतंगरावांच्या लोकांनी लोकशाही मार्गाने कोणत्याही दबावतंत्राचा, पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकली असती, तर त्यांच्या विजयाचे कौतुक केले असते. पण, आजवर त्यांचे राजकारण सरळमार्गाने कधीही झालेले नाही. पैशाच्या जोरावरच पतंगराव राजकारण करीत असतात. भारती विद्यापीठ, हॉस्पिटल व बाजारासाठी त्यांनी अनेक ठिकाणच्या मोक्याच्या जागा बळकावल्या. विद्यापीठ व अन्य संस्थांसाठी ज्या जागा त्यांनी घेतल्या, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे. आगामी अधिवेशनातही जागांच्या या गंभीर प्रश्नावर आवाज उठविणार आहे, असे आ. जगताप यांनी सांगितले. त्यांच्याच चिंध्या झाल्या पतंगरावांनी सुरुवातीपासूनच जिल्हा बॅँक निवडणुकीत लक्ष घातले होते. मर्यादित मतदारसंख्या असलेल्या सोसायटी गटातच त्यांनी लक्ष घातले. ही मते पैशाच्या बळावर फोडणे शक्य होते. अन्य सर्वसाधारण गटात मतदारसंख्या अधिक असल्याने तेथे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याठिकाणी त्यांच्याच पॅनेलच्या चिंध्या झाल्या. त्यांनी दुसऱ्याच्या चिंध्या करण्याची भाषा करू नये, असे मत जगताप यांनी व्यक्त केले.