शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात पतंगरावांचे कार्य आदर्शवत

By admin | Updated: December 10, 2014 23:56 IST

अरुण पाटील : कडेगावात राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप

तोंडोली : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये राज्य शासनाच्यावतीने डॉ. पतंगराव कदम यांनी पाच वर्षात महाराष्ट्रात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकरी, सामान्य माणूस यांच्या विकासाचा हेतू समोर ठेवून नियोजनबद्धरित्या केलेले कार्य म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा आदर्श पॅटर्न आहे, असे मत शिवाजी विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण पाटील यांनी व्यक्त केले.कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात महाराष्ट्र भूगोल शास्त्र परिषद, पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापन’ या विषयावरील तीनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एम. एस. खोत होते. या चर्चासत्रात नीलाद्री दास (बडोदा) यांनी ‘आपत्ती व्यवस्थापनाचा इतिहास व संकल्पना’, डॉ. रवींद्र जायभाय यांनी ‘आपत्ती व्यवस्थापनात सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर’, डॉ. प्रवीण सप्तर्षी (पुणे) ‘बदलते पर्यावरण व नैसर्गिक आपत्ती’, डॉ. आडवितोट एस. सी. (अक्कलकोट) यांनी ‘दुष्काळी भागाच्या विकासावर पर्यटनाचा होणारा परिणाम’, डॉ. चंद्रकांत माने (पाटण) यांनी ‘देशाच्या आर्थिक विकासात पर्यटन उद्योगाचे स्थान’, डॉ. शशिकांत कुमार (बडोदा) यांचे ‘नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी कमी करण्यासाठी वापरावयाची आधुनिक तंत्रे’, डॉ. बी. एन. गोफणे यांचे नैसर्गिक आपत्ती काळात घ्यावयाची खबरदारी व उपाय, संपतराव पवार यांचे दुष्काळ कमी करण्यासाठी जलनियोजन व जलव्यवस्थापन व पर्यावरण रक्षण’ या विषयावर, अशी मान्यवरांची व्याख्याने झाली.देशभरातील ९२ संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. याप्रसंगी भूगोलशास्त्र परिषदेचे सचिव डॉ. ज्योतिराम मोरे, प्रा. डॉ. चंद्रकांत माने, प्रा. एस. व्हाय. कारंडे, डॉ. संपत जगदाळे, डॉ. के. आर. जाधव यांची भाषणे झाली. प्रा. एस. ए. माळी व प्रा. कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एच. एस. माने यांनी आभार मानले. चर्चासत्रासाठी प्राचार्या डॉ. सौ. एस. व्ही. कुलकर्णी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)