शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात पतंगरावांचे कार्य आदर्शवत

By admin | Updated: December 10, 2014 23:56 IST

अरुण पाटील : कडेगावात राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप

तोंडोली : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये राज्य शासनाच्यावतीने डॉ. पतंगराव कदम यांनी पाच वर्षात महाराष्ट्रात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकरी, सामान्य माणूस यांच्या विकासाचा हेतू समोर ठेवून नियोजनबद्धरित्या केलेले कार्य म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा आदर्श पॅटर्न आहे, असे मत शिवाजी विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण पाटील यांनी व्यक्त केले.कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात महाराष्ट्र भूगोल शास्त्र परिषद, पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापन’ या विषयावरील तीनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एम. एस. खोत होते. या चर्चासत्रात नीलाद्री दास (बडोदा) यांनी ‘आपत्ती व्यवस्थापनाचा इतिहास व संकल्पना’, डॉ. रवींद्र जायभाय यांनी ‘आपत्ती व्यवस्थापनात सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर’, डॉ. प्रवीण सप्तर्षी (पुणे) ‘बदलते पर्यावरण व नैसर्गिक आपत्ती’, डॉ. आडवितोट एस. सी. (अक्कलकोट) यांनी ‘दुष्काळी भागाच्या विकासावर पर्यटनाचा होणारा परिणाम’, डॉ. चंद्रकांत माने (पाटण) यांनी ‘देशाच्या आर्थिक विकासात पर्यटन उद्योगाचे स्थान’, डॉ. शशिकांत कुमार (बडोदा) यांचे ‘नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी कमी करण्यासाठी वापरावयाची आधुनिक तंत्रे’, डॉ. बी. एन. गोफणे यांचे नैसर्गिक आपत्ती काळात घ्यावयाची खबरदारी व उपाय, संपतराव पवार यांचे दुष्काळ कमी करण्यासाठी जलनियोजन व जलव्यवस्थापन व पर्यावरण रक्षण’ या विषयावर, अशी मान्यवरांची व्याख्याने झाली.देशभरातील ९२ संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. याप्रसंगी भूगोलशास्त्र परिषदेचे सचिव डॉ. ज्योतिराम मोरे, प्रा. डॉ. चंद्रकांत माने, प्रा. एस. व्हाय. कारंडे, डॉ. संपत जगदाळे, डॉ. के. आर. जाधव यांची भाषणे झाली. प्रा. एस. ए. माळी व प्रा. कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एच. एस. माने यांनी आभार मानले. चर्चासत्रासाठी प्राचार्या डॉ. सौ. एस. व्ही. कुलकर्णी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)