शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

तीर्थक्षेत्र खरसुंडीत घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:24 IST

खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) येथे गावातील प्रमुख चौकात, मंदिर परिसर आणि गल्लीबोळातील गटारी तुंबल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावर ...

खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) येथे गावातील प्रमुख चौकात, मंदिर परिसर आणि गल्लीबोळातील गटारी तुंबल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावर पसरून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र नागरिकांना नागरी सुविधा देण्यात असमर्थ ठरत असून केवळ कर वसुलीत मग्न आहे. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांनी परिसरातील गटारी स्वच्छ करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली असता त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामपंचायतीकडे कामगार संख्या अपुरी असून, योग्य नियोजन होत नसल्याने गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. काही वाॅर्डांत सहा ते सात महिने गटारी साफ करण्यासाठी कामगार जात नाहीत. त्यामुळे गटारी तुंबून दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी गटारी बुजून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना व नियोजन करून गावातील गटारी स्वच्छ कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चौकट

नियोजनाचा अभाव

खरसुंडी हे आठ हजारांच्या वर लोकसंख्या असणारे गाव असून, स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत प्रशासन गंभीर नाही. चार महिला व एक पुरुष असे स्वच्छता कर्मचारी आहेत. मात्र, कामाचे योग्य नियोजन नसल्याने काही वाॅर्डांची सहा-सहा महिने स्वच्छता होत नाही. त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचत आहेत.