शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

युवकाचे अपहरण; तिघे जाळ्यात

By admin | Updated: May 27, 2015 00:57 IST

पोलीस कोठडीत रवानगी : सूत्रधारासह दोघे फरारी; नगर जिल्ह्यातील टोळी इस्लामपुरात सक्रिय

इस्लामपूर : सोने देण्याचे आमिष दाखवून इस्लामपुरातून अपहरण केलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची सुटका करण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या नगर जिल्ह्यातील तिघांची पोलीस कोठडीत रवानगी झाली. यातील अन्य दोघे अद्याप फरारी आहेत. उध्दव अंजाबा गीते (वय २६, रा. डोंगरवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), तौफिक जमील देशमुख (२१, नांदगाव, जि. अहमदनगर) व किशोर ज्ञानदेव सरोदे (२७, रा. वाघोली, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार विजय कोळी (रा. रेठरेधरण) व अनिल गवते (अहमदनगर) हे फरारी आहेत. या सर्वांविरुध्द पोलिसात अपहरण, खंडणी व बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्यावरून गुन्हा नोंद झाला आहे. या सर्वांनी दिग्विजय संजय खांबे (२०, रा. यल्लम्मा चौक, इस्लामपूर) याचे १९ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी गुन्ह्यात रिव्हॉल्व्हर, मोटारीसह (क्र. एमएच १६-ए टी— ८३३) दुसऱ्या एका मोटारीचा वापर केला होता. याप्रकरणी अपहरण झालेल्या दिग्विजय खांबे याची बहीण शीतल बाळकृष्ण पवार (२२, रा. इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अपहरण झालेला दिग्विजय हा पेठ येथील पॉलिटेक्निकमध्ये द्वितीय वर्षात शिकत आहे. रेठरेधरण येथील विजय कोळी याच्याशी त्याची ओळख झाली होती. त्यातून कोळी हा अवैध धंदे करीत असल्याची माहिती दिग्विजयला मिळाल्यावर त्याने त्याच्याकडे कामाची मागणी केली. कोळी याने त्याला सोने देण्याचा बहाणा करून सोबत घेतले. पुण्यात गेल्यावर नगर जिल्ह्यातील चौघांनी त्याला ताब्यात घेतले. पुण्यातून कोळी हा निघून आला. नगरमध्ये गेल्यावर दिग्विजयला आपले अपहरण करण्यात आल्याची जाणीव झाली. यादरम्यान दिग्विजयच्या नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू ठेवला होता. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सौ. पवार यांच्या मोबाईलवरच अपहरणकर्त्यांशी संपर्क साधून बोलणी सुरू ठेवली. ‘५ लाख द्या, नाही तर मुलास ठार मारेन’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यावर तातडीने पोलिसांचे पथक पाठवून वाघोली येथून दिग्विजय खांबे याची सुटका करून तिघांना ताब्यात घेतले. यातील उध्दव गीते व तौफिक देशमुख या दोघांना २७ मेपर्यंत, तर किशोर सरोदे याला २८ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारी व रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली. (वार्ताहर)बहिणीशी संपर्क२१ मे रोजी सकाळी बहिणीच्या मोबाईलवर दिग्विजयने संपर्क साधून, ‘मला कुणीतरी पळवून आणल्या’चे सांगितले. दुपारी पुन्हा त्याचा फोन आल्यावर शीतल पवार यांनी त्याच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली.