शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पलूस तालुक्यात खरीप पिके धोक्यात

By admin | Updated: July 13, 2015 00:36 IST

दुबार पेरणीचे संकट : ३५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतातूर

किरण सावंत - किर्लोस्करवाडी -पलूस तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाअभावी तालुक्यातील जवळजवळ ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर उर्वरित ३५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. पेरणी झालेली पिके पाण्याअभावी वाळू लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.तालुक्यात मान्सूनपूर्व तसेच जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात झालेला मान्सूनच्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी केली होती. तालुक्यातील १० हजार ५०० हेक्टर खरीप पेरणी क्षेत्रावपैकी सुमारे साडेसहा हजार क्षेत्रावर सोयाबीन, ज्वारी, भुईमूग, मूग, उडीद यांची पेरणी झाली. सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने अनेक ठिकाणी उगवणही चांगली झाली. मात्र पावसाने दडी मारली. गेल्या १० ते १२ दिवसांपासून तापमानातही कमालीची वाढ झाली. उन्हामुळे उगवून आलेली पिकेही आता दुपार धरू लागली आहेत. आधीच पावसाने मारलेली दडी आणि दुपार धरू लागलेली पिके यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील चार हजार हेक्टर क्षेत्र अजूनही पेरणीपासून वंचित आहे. २० जुलैपर्यंत खरीप पेरण्या होणे अपेक्षित आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने उर्वरित क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या असून, २० जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास पेरणी हंगाम वाया जाणार असून दुबार पेरणी करणेही कठीण होणार आहे. बळीराजासमोर सलग दुसऱ्यावर्षीही अस्मानी संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीही मान्सूनने हुलकावणी दिली होती. मात्र यावेळी शेतकरी जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात सलग तीन ते चार दिवस पडलेल्या पावसावर पेरणी करून अडचणीत आला आहे.तालुक्यातील कृष्णाकाठच्या गावात पाणी पुरेसे आहे. मात्र इतर गावांत पाण्याची टंचाई आहे. पाणी पुरवठा योजना आहेत. परंतु खरीप पिकांना पाणी पुरविणाऱ्या संस्थांचे पाणी दर परवडणारे नाहीत. त्यामुळे हे पाणी खरीप पिकांना देण्याचे धाडस शेतकरी करीत नाहीत. पण पेरणी झालेल्या सोयाबीन, भुुईमूग, ज्वारी, उडीद आदी पिकांच्या वाढीस पूरक वातावरण नसल्याने वाढ समाधानकारक नाही. द्राक्षबागेचे क्षेत्र तालुक्यात मोठे आहे. आंधळी, मोराळे, बांबवडे येथील द्राक्षबागांना पाण्याची आवश्यकता आहे.