शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रस-राष्ट्रवादीला खोत यांचा नवा धक्का !

By admin | Updated: May 11, 2017 23:10 IST

काँगे्रस-राष्ट्रवादीला खोत यांचा नवा धक्का !

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘शासन तृणधान्य व कडधान्ये नियमनमुक्त करणार आहे. मागे जशी विरोधकांनी ओरड केली तशीच ते या निर्णयानंतरही करतील याची मला खात्री आहे. विरोधकांना शेतकऱ्यांचा नाही तर व्यापाऱ्यांचा कळवळा आहे,’ अशी टीका खोत यांनी केली.‘कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करायला हवे, या हेतूने सिमेंट काँक्रीटचे बंधारे बांधण्याचे काम आमचा विभाग करत आहे, ती कामे आता कृषी विभाग करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील माझा हा निर्णय मान्य केला आहे,’ असे स्पष्टीकरण राज्याचे कृषी व पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत केले.गुरुवारी मंत्री खोत स्वत: जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत भोसरे, ता. खटाव येथे श्रमदान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या दृष्टीने शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मंत्री खोत यांनी येथील विश्रामगृहावर बुधवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली.मंत्री खोत यांनी विरोधकांवरही टीकास्त्र झोडले. माझ्याकडे पणन खाते आल्यानंतर भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शेतकरी विक्री व्यवस्थेत पुढे आला. बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या लुटण्याचे अड्डे आहेत. माझ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करणारी यंत्रणा अडचणीत आली. आज जे शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचा आव आणत आहेत. तीच मंडळी आडतदार, व्यापारी यांना सोबत घेऊन सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. १९६३ पूर्वी कुठे बाजार समित्या होत्या. तरी देखील खाल्यांच्या माध्यमातून शेतकरी आपला माल विकत होते. शेतकऱ्यांना मालाच्या विक्रीचे स्वातंत्र्य होते. आता तीच व्यवस्था शासन आणणार आहे.रोहिणी नक्षत्रात शासनातर्फे उन्नत शेती अभियान राबविले जाणार आहे. कोकणातून पेरणी दौरा सुरू करणार आहे. राज्यात सर्वत्र जाऊन पेरणी करणार आहे. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत पेरणी करतील. हवामान आधारित स्वयंचलित केंद्र प्रत्येक महसूलच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. गारपीट वादळ याची माहिती शेतकऱ्यांना आधीच मिळू शकणार आहे.शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी इथून पुढचा काळ काम करणार आहे. साखळी वेअर हाउस उभारून शेतकऱ्यांच्या मालाला दर वाढेपर्यंत साठवणुकीची व्यवस्था करणार आहे. शेतमालाला कर लावण्याचे मतशेतमालाला कर लावावा या मताशी आपण सहमत असल्याचे मंत्री खोत म्हणाले. कर लावल्याशिवाय या व्यवसायातील नफा-तोटा पुढे येणार नाही. शेती हा खात्रीने तोट्यातील व्यवसाय आहे, त्यामुळे तोट्यातील व्यवसायाला कर लावता येणार नाही. हे स्पष्टपणे पुढे येईल, असेही खोत यांनी सांगितले.रघुनाथदादांवर टीका करणे टाळलेशेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता खोत यांनी कोणतीही टीका करणे टाळले. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आलो आहोत मार्ग वेगळे असले तरी सर्वांचा हेतू एकच आहे. रघुनाथदादा, खासदार राजू शेट्टी, शंकर गोडसे यांनी शेतकरी चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य दिल्याचे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.