शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

खंडोबाचीवाडी पुलामध्ये अखेर मुरूमाचा भराव

By admin | Updated: April 1, 2015 00:00 IST

जलसंपदा विभागाला आली जाग : ठेकेदाराचे धाबे दणाणले--लोकमतचा दणका

भिलवडी : पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी-धनगाव रस्त्यादरम्यान जलसंपदा विभागाच्यावतीने अकरा लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलामध्ये मुरूमाऐवजी ठेकेदाराने चक्क मातीचाच भराव केला होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसारित करून ठेकेदाराचे बिंग फोडले होते. यामुळे खडबडून जाग्या झालेल्या जलसंपदा विभागाने व ठेकेदाराने भरलेला मातीचा भराव काढून नव्याने मुरूम भरण्यास सुरुवात केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह क ार्यकर्त्यांनी गुरुवार, दि. २६ रोजी समक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने धनगाव व खंडोबाचीवाडी या दोन गावातील क्षारपड शेतजमिनीमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चर खुदाईचे काम सुरू आहे. या चरीदरम्यान ज्या ठिकाणी रस्ता आहे, तेथे क्रॉस ड्रेनेज व पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. ओढ्यामध्ये सिमेंटच्या मोठ्या पाईप घालून त्यावर मुरूमाचा भराव करणे अपेक्षित असताना, संबंधित ठेकेदाराने पाईपवर दहा ते बारा फूट उंचीवर जे.सी.बी.ने शेजारच्या ओढ्यामधील काळी माती काढून त्याचा भराव केला व वरील बाजूस मुरूम पसरून ठेवला. रस्त्याच्या दोन्ही बाजूस दगडी बांधकाम व पिचिंग करणे गरजेचे असताना, केवळ मातीच्या भरावावर काम उरकण्यात आलेहोते. संदीप राजोबा यांच्यासह खंडोबाचीवाडीचे सरपंच धोंडीराम मगदूम, अशोक मगदूम, चंद्रकांत कापसे, दिलीप भस्मे आदी कार्यकर्त्यांनी या कामाची पाहणी करुन त्याची कानउघाडणी केली. ठेकेदाराने चूक कबूल करून, माती काढून मुरूम भरून परत कामकाज करण्याचे आश्वासन दिले होते. या कामाचा दर्जा न सुधारल्यास स्वाभिमानीने आंदोलनाचाही इशारा दिला होता. ‘लोकमत’मधून २७ रोजी प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराने शनिवारी रात्री उशिरा जे.सी.बी.ने पुलामध्ये भरलेला मातीचा भराव काढून मुरूमाचा भराव करण्यास सुरुवात केली. आज (मंगळवारी) दिवसभर ठेकेदाराची माणसे मुरूम भरण्याच्या कामात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)शेतकऱ्यांतून ‘लोकमत’चे अभिनंदनशासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असताना भ्रष्ट ठेकेदार प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून दर्जाहीन कामे करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. यावेळी ‘लोकमत’ने शेतकऱ्यांच्या हिताचे वृत्त देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल खंडोबाचीवाडी, धनगाव गावातील शेतकऱ्यांतून ‘लोकमत’चे अभिनंदन करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत दर्जाबाबत शेतकऱ्यांनी जागरुक राहण्याचे आवाहनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले.