शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबाचीवाडी पुलामध्ये अखेर मुरूमाचा भराव

By admin | Updated: April 1, 2015 00:00 IST

जलसंपदा विभागाला आली जाग : ठेकेदाराचे धाबे दणाणले--लोकमतचा दणका

भिलवडी : पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी-धनगाव रस्त्यादरम्यान जलसंपदा विभागाच्यावतीने अकरा लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलामध्ये मुरूमाऐवजी ठेकेदाराने चक्क मातीचाच भराव केला होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसारित करून ठेकेदाराचे बिंग फोडले होते. यामुळे खडबडून जाग्या झालेल्या जलसंपदा विभागाने व ठेकेदाराने भरलेला मातीचा भराव काढून नव्याने मुरूम भरण्यास सुरुवात केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह क ार्यकर्त्यांनी गुरुवार, दि. २६ रोजी समक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने धनगाव व खंडोबाचीवाडी या दोन गावातील क्षारपड शेतजमिनीमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चर खुदाईचे काम सुरू आहे. या चरीदरम्यान ज्या ठिकाणी रस्ता आहे, तेथे क्रॉस ड्रेनेज व पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. ओढ्यामध्ये सिमेंटच्या मोठ्या पाईप घालून त्यावर मुरूमाचा भराव करणे अपेक्षित असताना, संबंधित ठेकेदाराने पाईपवर दहा ते बारा फूट उंचीवर जे.सी.बी.ने शेजारच्या ओढ्यामधील काळी माती काढून त्याचा भराव केला व वरील बाजूस मुरूम पसरून ठेवला. रस्त्याच्या दोन्ही बाजूस दगडी बांधकाम व पिचिंग करणे गरजेचे असताना, केवळ मातीच्या भरावावर काम उरकण्यात आलेहोते. संदीप राजोबा यांच्यासह खंडोबाचीवाडीचे सरपंच धोंडीराम मगदूम, अशोक मगदूम, चंद्रकांत कापसे, दिलीप भस्मे आदी कार्यकर्त्यांनी या कामाची पाहणी करुन त्याची कानउघाडणी केली. ठेकेदाराने चूक कबूल करून, माती काढून मुरूम भरून परत कामकाज करण्याचे आश्वासन दिले होते. या कामाचा दर्जा न सुधारल्यास स्वाभिमानीने आंदोलनाचाही इशारा दिला होता. ‘लोकमत’मधून २७ रोजी प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराने शनिवारी रात्री उशिरा जे.सी.बी.ने पुलामध्ये भरलेला मातीचा भराव काढून मुरूमाचा भराव करण्यास सुरुवात केली. आज (मंगळवारी) दिवसभर ठेकेदाराची माणसे मुरूम भरण्याच्या कामात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)शेतकऱ्यांतून ‘लोकमत’चे अभिनंदनशासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असताना भ्रष्ट ठेकेदार प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून दर्जाहीन कामे करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. यावेळी ‘लोकमत’ने शेतकऱ्यांच्या हिताचे वृत्त देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल खंडोबाचीवाडी, धनगाव गावातील शेतकऱ्यांतून ‘लोकमत’चे अभिनंदन करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत दर्जाबाबत शेतकऱ्यांनी जागरुक राहण्याचे आवाहनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले.