शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

खंडोबाचीवाडी पुलामध्ये अखेर मुरूमाचा भराव

By admin | Updated: April 1, 2015 00:00 IST

जलसंपदा विभागाला आली जाग : ठेकेदाराचे धाबे दणाणले--लोकमतचा दणका

भिलवडी : पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी-धनगाव रस्त्यादरम्यान जलसंपदा विभागाच्यावतीने अकरा लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलामध्ये मुरूमाऐवजी ठेकेदाराने चक्क मातीचाच भराव केला होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसारित करून ठेकेदाराचे बिंग फोडले होते. यामुळे खडबडून जाग्या झालेल्या जलसंपदा विभागाने व ठेकेदाराने भरलेला मातीचा भराव काढून नव्याने मुरूम भरण्यास सुरुवात केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह क ार्यकर्त्यांनी गुरुवार, दि. २६ रोजी समक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने धनगाव व खंडोबाचीवाडी या दोन गावातील क्षारपड शेतजमिनीमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चर खुदाईचे काम सुरू आहे. या चरीदरम्यान ज्या ठिकाणी रस्ता आहे, तेथे क्रॉस ड्रेनेज व पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. ओढ्यामध्ये सिमेंटच्या मोठ्या पाईप घालून त्यावर मुरूमाचा भराव करणे अपेक्षित असताना, संबंधित ठेकेदाराने पाईपवर दहा ते बारा फूट उंचीवर जे.सी.बी.ने शेजारच्या ओढ्यामधील काळी माती काढून त्याचा भराव केला व वरील बाजूस मुरूम पसरून ठेवला. रस्त्याच्या दोन्ही बाजूस दगडी बांधकाम व पिचिंग करणे गरजेचे असताना, केवळ मातीच्या भरावावर काम उरकण्यात आलेहोते. संदीप राजोबा यांच्यासह खंडोबाचीवाडीचे सरपंच धोंडीराम मगदूम, अशोक मगदूम, चंद्रकांत कापसे, दिलीप भस्मे आदी कार्यकर्त्यांनी या कामाची पाहणी करुन त्याची कानउघाडणी केली. ठेकेदाराने चूक कबूल करून, माती काढून मुरूम भरून परत कामकाज करण्याचे आश्वासन दिले होते. या कामाचा दर्जा न सुधारल्यास स्वाभिमानीने आंदोलनाचाही इशारा दिला होता. ‘लोकमत’मधून २७ रोजी प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराने शनिवारी रात्री उशिरा जे.सी.बी.ने पुलामध्ये भरलेला मातीचा भराव काढून मुरूमाचा भराव करण्यास सुरुवात केली. आज (मंगळवारी) दिवसभर ठेकेदाराची माणसे मुरूम भरण्याच्या कामात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)शेतकऱ्यांतून ‘लोकमत’चे अभिनंदनशासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असताना भ्रष्ट ठेकेदार प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून दर्जाहीन कामे करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. यावेळी ‘लोकमत’ने शेतकऱ्यांच्या हिताचे वृत्त देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल खंडोबाचीवाडी, धनगाव गावातील शेतकऱ्यांतून ‘लोकमत’चे अभिनंदन करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत दर्जाबाबत शेतकऱ्यांनी जागरुक राहण्याचे आवाहनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले.