शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर बाजाराकडे धान्य व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

By admin | Updated: November 23, 2014 23:46 IST

शेतकऱ्यांचे हाल : खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी

पांडुरंग डोंगरे - खानापूर --खानापूर आठवडा बाजारात शेतकऱ्यांचा शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी घेत आहेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब किसान सभेचे भाई अरुण माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून धान्य व्यापाऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवून शेतमालाची खरेदी-विक्री बंद केल्याने शेतकऱ्यांनी शेतीमाल कोणाकडे विकायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून खानापूर येथे खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.खानापूर आठवडा बाजारात शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. हे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यात शेतकऱ्यांची पिळवणूक व फसवणूक होत आहे. किसान सभेचे अध्यक्ष अरुण माने यांनी प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा पुरवठा अधिकारी गलांडे व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. एस. एन. जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.यानंतर तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस दिल्याने दोन आठवड्यांपासून धान्य व्यापाऱ्यांनी खानापूर आठवडा बाजारात शेतीमाल खरेदी करणे थांबविले आहे. दोन आठवड्यापासून शेतीमाल विक्रीविना पडून राहिला आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली असली तरी अडचणी व गैरसोय निर्माण झाली आहे. खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व खानापूर येथे बाजार समितीचे धान्य खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. वास्तविक शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात बाजार समिती अस्तित्वात आहे. परंतु, शेतमाल खरेदीचे २५ टक्के व्यवहार बाजार समिती, तर ७५ टक्के व्यवहार खासगी व्यापारी करीत आहेत. यात शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत आहे. खासगी व्यापाऱ्यांना बाजार समितीव्दारेच शेतीमाल खरेदी-विक्री परवाने दिले जातात. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)