शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

खानापूर बाजाराकडे धान्य व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

By admin | Updated: November 23, 2014 23:46 IST

शेतकऱ्यांचे हाल : खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी

पांडुरंग डोंगरे - खानापूर --खानापूर आठवडा बाजारात शेतकऱ्यांचा शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी घेत आहेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब किसान सभेचे भाई अरुण माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून धान्य व्यापाऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवून शेतमालाची खरेदी-विक्री बंद केल्याने शेतकऱ्यांनी शेतीमाल कोणाकडे विकायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून खानापूर येथे खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.खानापूर आठवडा बाजारात शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. हे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यात शेतकऱ्यांची पिळवणूक व फसवणूक होत आहे. किसान सभेचे अध्यक्ष अरुण माने यांनी प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा पुरवठा अधिकारी गलांडे व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. एस. एन. जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.यानंतर तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस दिल्याने दोन आठवड्यांपासून धान्य व्यापाऱ्यांनी खानापूर आठवडा बाजारात शेतीमाल खरेदी करणे थांबविले आहे. दोन आठवड्यापासून शेतीमाल विक्रीविना पडून राहिला आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली असली तरी अडचणी व गैरसोय निर्माण झाली आहे. खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व खानापूर येथे बाजार समितीचे धान्य खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. वास्तविक शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात बाजार समिती अस्तित्वात आहे. परंतु, शेतमाल खरेदीचे २५ टक्के व्यवहार बाजार समिती, तर ७५ टक्के व्यवहार खासगी व्यापारी करीत आहेत. यात शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत आहे. खासगी व्यापाऱ्यांना बाजार समितीव्दारेच शेतीमाल खरेदी-विक्री परवाने दिले जातात. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)