शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

खानापूर बाजाराकडे धान्य व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

By admin | Updated: November 23, 2014 23:46 IST

शेतकऱ्यांचे हाल : खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी

पांडुरंग डोंगरे - खानापूर --खानापूर आठवडा बाजारात शेतकऱ्यांचा शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी घेत आहेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब किसान सभेचे भाई अरुण माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून धान्य व्यापाऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवून शेतमालाची खरेदी-विक्री बंद केल्याने शेतकऱ्यांनी शेतीमाल कोणाकडे विकायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून खानापूर येथे खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.खानापूर आठवडा बाजारात शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. हे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यात शेतकऱ्यांची पिळवणूक व फसवणूक होत आहे. किसान सभेचे अध्यक्ष अरुण माने यांनी प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा पुरवठा अधिकारी गलांडे व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. एस. एन. जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.यानंतर तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस दिल्याने दोन आठवड्यांपासून धान्य व्यापाऱ्यांनी खानापूर आठवडा बाजारात शेतीमाल खरेदी करणे थांबविले आहे. दोन आठवड्यापासून शेतीमाल विक्रीविना पडून राहिला आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली असली तरी अडचणी व गैरसोय निर्माण झाली आहे. खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व खानापूर येथे बाजार समितीचे धान्य खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. वास्तविक शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात बाजार समिती अस्तित्वात आहे. परंतु, शेतमाल खरेदीचे २५ टक्के व्यवहार बाजार समिती, तर ७५ टक्के व्यवहार खासगी व्यापारी करीत आहेत. यात शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत आहे. खासगी व्यापाऱ्यांना बाजार समितीव्दारेच शेतीमाल खरेदी-विक्री परवाने दिले जातात. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)