शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

‘खाकी’ची ‘सुट्टी’वरील गदा टळली!

By admin | Updated: October 31, 2015 00:10 IST

भत्तावाढ पचनी : सण, उत्सवातही मिळतेय सुट्टी; सुट्टीदिवशी काम केल्यास डबल पगार

सचिन लाड ल्ल सांगली राज्य शासनाच्या गृह विभागाने साप्ताहिक सुट्टीदिवशी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यादिवशी ‘दुप्पट’ पगार देण्याच्या केलेल्या घोषणेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे. ‘दुप्पट’ पगारामुळे शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याने, कोणत्याही स्थितीत पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीला हात लावू नये, असा आदेश गृह विभागाने दिला आहे. त्यामुळे अगदी सण, उत्सव असला तरी, त्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या जात नाहीत. शासनाच्या या निर्णयाचा पोलिसांच्यादृष्टीने चांगला फायदा झाला आहे. कुठे काहीही अनुचित प्रकार घडो, पोलीस नजरेला पडतोच. कधी आपल्याला वेळाने घरी जायचा प्रसंग आला, तर रस्त्यावर हातात काठी घेऊन गस्त घालताना फक्त पोलीसच दिसतो. तरीही जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी आहे. दोन-सहा महिन्यातून पोलीस सेवेतून निवृत्त होतातच. पण त्यांची जागा भरण्याची तातडीने कार्यवाही केली जात नाही. वर्षात एकदाच भरती होत असली तरी, त्या तुलनेत कर्मचारी सेवानिवृत्तही होत आहेत. रिक्त असलेल्या ८५ जागांमध्ये पोलीस शिपाई, नाईक, हवालदार व सहायक पोलीस फौजदारांचा समावेश आहे. देश किंवा राज्यपातळीवर काही अनुचित घटना घडल्यास, जिल्ह्यातील पोलिसांच्या सुट्ट्या व रजा रद्द केल्या जात होत्या. जे पोलीस सुट्टीवर, रजेवर आहेत, त्यांना तातडीने ड्युटीवर बोलावून घेतले जात होते. याशिवाय दैनंदिन कामाचाही त्यांच्यावर प्रचंड ताण असे. गेल्या अनेक वर्षापासून केवळ पोलिसांच्या बाबतीतच अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांना कौटुंबिक सुख, नातेवाईकांच्या भेटी, तसेच सण, उत्सवाला मुकावे लागले आहे. सततच्या ड्युटीमुळे त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. अनेक पोलिसांचा ड्युटीवर असताना हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गृह विभागाने दोन महिन्यापूर्वी, सुट्टीदिवशी जे पोलीस काम करतील, त्यांना ‘दुप्पट’ पगार देण्याचा लेखी आदेश काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी होईल की नाही, याची खुद्द पोलिसांनाही विश्वासार्हता नव्हती. पण आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. सुट्टीदिवशी पोलीस कामावर हजर राहिले, तर त्याचा आर्थिक भुर्दंड शासनालाच बसणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत सुट्टीदिवशी पोलिसांना कामावर बोलावू नये, असे आदेश आहेत. गेल्या दोन महिन्यात झालेल्या गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात पोलिसांच्या सुट्ट्या, रजा बंद केल्या नव्हत्या. अडीच हजारावर पोलिसांना लाभ जिल्ह्याला २ हजार ७५२ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात २ हजार ६६७ पोलीस सध्या सेवेत आहेत. ८५ पदे रिक्त आहेत. सेवेत असलेल्या अडीच हजारहून अधिक पोलिसांना गृह विभागाच्या आदेशाचा लाभ झाला आहे. ‘डबल’ पगाराचे गाजर दाखविले असले तरी, त्याबद्दल पोलिसांना फारसा आनंद झाला नव्हता. कारण विश्रांतीसाठी आठवड्याची एक सुट्टी महत्त्वाची असते, असे अनेक पोलिसांनी बोलून दाखविले.