शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’ची ‘सुट्टी’वरील गदा टळली!

By admin | Updated: October 31, 2015 00:10 IST

भत्तावाढ पचनी : सण, उत्सवातही मिळतेय सुट्टी; सुट्टीदिवशी काम केल्यास डबल पगार

सचिन लाड ल्ल सांगली राज्य शासनाच्या गृह विभागाने साप्ताहिक सुट्टीदिवशी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यादिवशी ‘दुप्पट’ पगार देण्याच्या केलेल्या घोषणेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे. ‘दुप्पट’ पगारामुळे शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याने, कोणत्याही स्थितीत पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीला हात लावू नये, असा आदेश गृह विभागाने दिला आहे. त्यामुळे अगदी सण, उत्सव असला तरी, त्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या जात नाहीत. शासनाच्या या निर्णयाचा पोलिसांच्यादृष्टीने चांगला फायदा झाला आहे. कुठे काहीही अनुचित प्रकार घडो, पोलीस नजरेला पडतोच. कधी आपल्याला वेळाने घरी जायचा प्रसंग आला, तर रस्त्यावर हातात काठी घेऊन गस्त घालताना फक्त पोलीसच दिसतो. तरीही जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी आहे. दोन-सहा महिन्यातून पोलीस सेवेतून निवृत्त होतातच. पण त्यांची जागा भरण्याची तातडीने कार्यवाही केली जात नाही. वर्षात एकदाच भरती होत असली तरी, त्या तुलनेत कर्मचारी सेवानिवृत्तही होत आहेत. रिक्त असलेल्या ८५ जागांमध्ये पोलीस शिपाई, नाईक, हवालदार व सहायक पोलीस फौजदारांचा समावेश आहे. देश किंवा राज्यपातळीवर काही अनुचित घटना घडल्यास, जिल्ह्यातील पोलिसांच्या सुट्ट्या व रजा रद्द केल्या जात होत्या. जे पोलीस सुट्टीवर, रजेवर आहेत, त्यांना तातडीने ड्युटीवर बोलावून घेतले जात होते. याशिवाय दैनंदिन कामाचाही त्यांच्यावर प्रचंड ताण असे. गेल्या अनेक वर्षापासून केवळ पोलिसांच्या बाबतीतच अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांना कौटुंबिक सुख, नातेवाईकांच्या भेटी, तसेच सण, उत्सवाला मुकावे लागले आहे. सततच्या ड्युटीमुळे त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. अनेक पोलिसांचा ड्युटीवर असताना हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गृह विभागाने दोन महिन्यापूर्वी, सुट्टीदिवशी जे पोलीस काम करतील, त्यांना ‘दुप्पट’ पगार देण्याचा लेखी आदेश काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी होईल की नाही, याची खुद्द पोलिसांनाही विश्वासार्हता नव्हती. पण आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. सुट्टीदिवशी पोलीस कामावर हजर राहिले, तर त्याचा आर्थिक भुर्दंड शासनालाच बसणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत सुट्टीदिवशी पोलिसांना कामावर बोलावू नये, असे आदेश आहेत. गेल्या दोन महिन्यात झालेल्या गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात पोलिसांच्या सुट्ट्या, रजा बंद केल्या नव्हत्या. अडीच हजारावर पोलिसांना लाभ जिल्ह्याला २ हजार ७५२ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात २ हजार ६६७ पोलीस सध्या सेवेत आहेत. ८५ पदे रिक्त आहेत. सेवेत असलेल्या अडीच हजारहून अधिक पोलिसांना गृह विभागाच्या आदेशाचा लाभ झाला आहे. ‘डबल’ पगाराचे गाजर दाखविले असले तरी, त्याबद्दल पोलिसांना फारसा आनंद झाला नव्हता. कारण विश्रांतीसाठी आठवड्याची एक सुट्टी महत्त्वाची असते, असे अनेक पोलिसांनी बोलून दाखविले.