शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येळापूर गणावर पदांची खैरात

By admin | Updated: November 28, 2015 00:16 IST

तीनही गटांची मर्जी : गण आपल्याकडे ठेवण्यासाठी नेत्यांत स्पर्धा

शिवाजी पाटील - येळापूर पंचायत समिती गणावर शिराळा तालुक्यातील तीनही गटांनी पदांची खैरात केली आहे. सर्वजण हा गण आपल्याकडे ठेवण्यासाठी कामाला लागले असून या गणातील जनता आगामी काळात कुणाच्या झोळीत दान टाकणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.येळापूर पंचायत समिती गण हा कोकरुड जिल्हा परिषद गटातील महत्त्वाचा गण आहे. या अनुषंगाने भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने तब्बल १९ पदांची खैरात केली आहे. भाजप व राष्ट्रवादीने सर्वात जास्त पदे दिली आहेत. भाजपकडून मारुती कुंभार (ग्लुकोज), सौ. सुभद्रा आटुगडे (दूध संघ), दगडू सावंत (समन्वय समिती), नामदेव पाटील, कुमार कडोले, सुरेश पाटील (वारणा-मोरणा), बाबूराव शिंदे, सौ. रेखा एटम (दक्षता समिती), राष्ट्रवादीकडून तानाजी वनारे (विश्वास साखर), दिनकर दिंडे (बाजार समिती), प्रकाश धस, पी. डी. पाटील, शिवाजी लाड, सौ. अनिता चिंचोलकर (सर्व दूध संघ), शामराव सावंत (अर्बन बँक).काँग्रेसकडून मनोज चिंचोलकर, राजाराम जाधव (निनाई कारखाना), प्रल्हाद जाधव (खरेदी-विक्री), श्रीमती कविता पाटील (बाजार समिती) या नेत्यांच्या निवडी करुन काम करण्याची संधी दिली आहे. त्याचबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून पक्षीय पातळीवर काही निवडी करुन कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.या सर्व पदांच्या वाटपामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर नूतन पदाधिकाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे येळापूर गणातील कोणता पक्ष गणातील मतदारांना आपल्याकडे खेचणार, हे औत्सुक्याचे ठरणार आहे. पक्षाकडून अनेकांना संधी मिळाल्याने समाधान आहे.