शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

केंपवाड कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरावर मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:27 IST

लिंगनूर : मिरज पूर्व भागातील लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, संतोषवाडी, जानराववाडी या परिसरात केंपवाड येथील साखर कारखान्याच्या राखेमुळे दोन हजार ...

लिंगनूर : मिरज पूर्व भागातील लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, संतोषवाडी, जानराववाडी या परिसरात केंपवाड येथील साखर कारखान्याच्या राखेमुळे दोन हजार एकरवरील शेतीला फटका बसत आहे. कारखान्याने प्रदूषण नियंत्रण व्यवस्था बसवावी यासाठी अध्यक्ष श्रीमंत पाटील यांच्या बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा लिंगनूर येथील बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

परिसरात केंपवाड कारखान्याच्या चिमणीतून निघणाऱ्या राख व धुळीच्या कणांमुळे होणाऱ्या नुकसानप्रश्नी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खराडे म्हणाले की, केंपवाड कारखान्याची निर्मिती होऊन दहा ते पंधरा वर्षे झाली असून, कारखान्याच्या चिमणीतून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडते. द्राक्ष घडावर ही राख पडते. त्यामुळे द्राक्षघड काळे पडतात व काळी पडलेली द्राक्षे कमी दराने विकावी लागतात. राख, भुसा, आणि दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतातील ऊस, कापूस, गहू, हरभरा, मका या पिकांचेही मोठे नुकसान होत आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. कारखाना प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्‍त होत आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. कारखान्यामुळे होणारे प्रदूषण पुढील हंगामापूर्वी नियोजन करून थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष भरत चौगुले, शाखाध्यक्ष नंदू नलवडे, सरपंच मारुती पाटील, उपसरपंच चंद्रकांत नाईक, राजाराम नाईक, दीपक मगदूम, अशोक मगदूम, शिवदास शिंदे ,राजू मगदूम, किरण नागणे उपस्थित होते.

कोट

केंपवाड कारखान्याच्या राखेमुळे द्राक्षबागेवर व घडावर राखेचा काळा थर साचल्यामुळे चांगला माल तयार होऊनही व्यापारी द्राक्षे घेत नसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

- संजय यादवाडे, द्राक्ष बागायतदार, लिंगनूर