शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पाणी योजनांची कामे रखडणार

By admin | Updated: June 17, 2016 23:24 IST

विदर्भाकडे स्थलांतर : ‘कृष्णा-कोयना’नंतर ‘ताकारी-म्हैसाळ’ची कार्यालये गुंडाळण्यात येणार

मिरज : कृष्णा खोरे विकास महामंडाळांतर्गत कृष्णा-कोयना उपसा सिंचन बांधकाम विभागाचे कार्यालय विदर्भात स्थलांतरित केल्यानंतर ‘ताकारी व म्हैसाळ’ची दोन मंडल कार्यालये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे स्थलांतरित होणार आहेत. यामुळे अपूर्ण असलेल्या ताकारी म्हैसाळ सिंचन योजनांना फटका बसणार असून कालवे व पोटकालव्यांची कामे रखडण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्यातील ३० मंडल कार्यालये बंद करण्यात येणार असून कृष्णा खोरे प्रकल्पाच्या ताकारी, म्हैसाळ योजनेची प्रत्येकी दोन मंडल कार्यालये असून, त्यापैकी बांधकाम कार्य प्रकारातील दोन मंडल कार्यालये बंद करून ती विदर्भात हलविण्याचा प्रस्ताव आहे. कृष्णा खोरे महामंडळांतर्गत टेंभू, ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण असताना, येथील बांधकाम कार्यालये विदर्भात हलवून केवळ सिंचन व्यवस्थापन कार्यालये अस्तित्वात राहणार असल्याने सिंचन योजनांची अपूर्ण कामे थांबणार आहेत. जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार विदर्भात सिंचन व्यवस्थापनाची स्वतंत्र व सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची फेररचना करण्यात येत आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत दोन नवीन सिंचन व्यवस्थापन मंडळांच्या निर्मितीसाठी कृष्णा खोरे प्रकल्पाची बांधकाम कार्यालये गुंडाळण्यात येत आहेत. ताकारी, म्हैसाळ योजनेचे कालवे व पोटकालवे अपूर्ण असल्याने लाभक्षेत्रात पाणी पोहोचत नाही. परिणामी पाणीपट्टी वसुली होत नसल्याने या योजना अगोदरच अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत कृष्णा खोरे प्रकल्पाची बांधकाम कार्यालये बंद करण्यात येत असल्याने अपूर्ण कामे वर्षानुवर्षे रखडणार आहेत. कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडळ हे बांधकाम कार्य प्रकारातील मंडळ कार्यालय यवतमाळकडे वर्ग करून या कार्यालयाची आस्थापना सांगली पाटबंधारे मंडळाच्या नियंत्रणाखाली आणल्यामुळे, कृष्णा खोरे प्रकल्पाच्या सिंचन योजनांच्या व्यवस्थापनासाठी पाटबंधारे मंडळावर ताण पडणार आहे. पाटबंधारे विभागाकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असताना, बंद करण्यात येणाऱ्या कार्यालयांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या सिंचन व्यवस्थापनाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)बाराशे कोटींची कामे अद्याप अपूर्ण म्हैसाळ योजनेसाठी गेल्या १८ वर्षात सुमारे दोन हजार कोटी रूपये खर्च झाले असून अद्याप बाराशे कोटी रूपयांची कामे अपूर्ण आहेत. ताकारीसाठी सुमारे एक हजार कोटी खर्च झाले असून अद्याप चारशे कोटी रूपयांची कामे अपूर्ण आहेत. कालवे व पोटकालवे, कालव्यांचे अस्तरीकरण ही बांधकाम विभागाकडील कामे अपूर्ण असल्याने ताकारी म्हैसाळच्या लाभक्षेत्रापैकी केवळ ३० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.