शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

धर्माच्या नादाला न लागता विज्ञानाची कास धरा

By admin | Updated: January 6, 2016 00:51 IST

एन. डी. पाटील : नितीन शिंदे यांच्या ‘पत्रिका जुळवताना’ आणि ‘अंतराळ समजून घेताना’ पुस्तकांचे प्रकाशन

इस्लामपूर : धर्मव्यवस्थेचा उन्माद काही मर्यादेपर्यंतच चालतो. समाजाच्या अज्ञानावर या व्यवस्थेचे प्राबल्य आधारलेले असते. मात्र शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोनासमोर त्याला नमावे लागते. त्यामुळे नव्या पिढीने धर्माच्या नादाला न लागता विज्ञानाची कास धरावी, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी केले.येथील केबीपी महाविद्यालयाचे खगोल अभ्यासक प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी लिहिलेल्या ‘पत्रिका जुळवताना’ आणि ‘अंतराळ समजून घेताना’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्रा. डॉ. पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आर. डी. पाटील, सौ. सरोज पाटील, प्रा. शामराव पाटील, मुक्ता दाभोलकर, सौ. दीपिका शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. अंधश्रध्दा निर्मूलन समिती, नाग—नालंदा प्रकाशन, महात्मा फुले शिक्षण संस्था यांच्यावतीने आयोजित विवेक संवाद कार्यक्रमात हे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.प्रा. डॉ. पाटील म्हणाले की, लग्नासाठी पत्रिकेतील गुण जुळविण्याची किमया ज्योतिषाच्याच हातात असते. मात्र ज्यांचे ३६ गुण जुळले, त्यांच्या पुढील आयुष्यात ३६ चा आकडा बनल्याची कित्येक उदाहरणे आहेत. पत्रिका पाहणाऱ्या आणि हुंडा मागणाऱ्या मुलाशी लग्न न करण्याची भूमिका मुलींनी घ्यावी.सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, इतर कुणाच्या चमत्कारावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या मुठीतील कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास आनंदी जीवन जगता येईल. पत्रिका जुळवताना आपण निवड स्वातंत्र्याचा अधिकार दुसऱ्याकडे गहाण टाकतो. त्यावेळी स्वत्व संपते, आत्मविश्वास ढळतो. लेखक डॉ. शिंदे म्हणाले की, खगोलशास्त्राचा अभ्यास करताना जनमानसावर फलज्योतिषाचा प्रचंड पगडा असल्याचे अनुभवायला मिळाले. त्यामुळे पुरोगामी संत-सुधारकांनी केलेल्या सुधारणा पुढे प्रवाही ठेवण्यासाठी हा लेखनप्रपंच केला. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की, आपला देश मंगळ ग्रहावर यान पाठवितो. मात्र मंगळ असणाऱ्या मुला—मुलींचे विवाह ठरत नाहीत. हे सर्व पत्रिका बनविणाऱ्यांच्याच हातात असते. संजय बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. प्रमोद गंगणमाले यांनी सूत्रसंचालन केले. योगेश कुदळे यांनी आभार मानले. यावेळी विश्वास सायनाकर, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील, एल. जी. दाभोळे, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, शिवाजीराव माने, प्रा. वि. द. कदम, अ‍ॅड. बी. डी. पाटील, महेश मोरे, सर्जेराव यादव, त्र्यंबकेश्वर मिरजकर उपस्थित होते. (वार्ताहर)पिंपळाचं काय झालं?प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, अभिनेत्री ऐश्वर्या रायला कडक मंगळ होता. त्यामुळे तिचे पहिले लग्न पिंपळाच्या झाडाशी लावण्यात आले. त्यानंतर अभिषेक बच्चनशी ती विवाहबध्द झाली. आता या दोघांचा संसार सुरळीत सुरू आहे. मात्र त्या पिंपळाच्या झाडाचे काय झाले, हे कोणी पाहिले आहे का?