शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवा

By admin | Updated: January 19, 2015 00:30 IST

स्मिता कोल्हे : सांगलीत भावनिक एकात्मता व कर्मयोगी पुरस्काराने कोल्हे दांपत्याचा गौरव

सांगली : ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील आणि माई यांनी आपणा सर्वांना दिलेला समाजसेवेचा मंत्र भावी पिढीने जपला पाहिजे. यासाठीच माणुसकीची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवा, असे आवाहन सेवाभावी कार्यकर्त्या डॉ. स्मिता कोल्हे यांनी केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मेळघाटातील बैरागड येथील दुर्गम खेड्यात आदिवासींच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना विकास योजनेचे उपायुक्त इंद्रजित देशमुख (पुणे) यांच्याहस्ते ‘भावनिक एकात्मता पुरस्कार’ आणि ‘कर्मयोगी सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. शाल, श्रीफळ, मानपत्र व रोख एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.डॉ. कोल्हे म्हणाल्या की, भावी पिढीकडून आम्हाला आशा आहे. समाजसेवेचे व्रत भविष्यकाळात देखील सुरु राहिले पाहिजे. आपले प्रत्येक पाऊल हे दुसऱ्यांच्या हितासाठीच असले पाहिजे, याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे. माझे लग्नापूर्वीपर्यंतचे आयुष्य हे छानछोकीतच गेले होते. महाविद्यालयीन जीवनात अ. भा. वि. प. संघटनेशी जोडले गेल्याने माझ्यावर समाजसेवेचा संस्कार झाला. विनोबांच्या गीता प्रवचनातून स्वधर्माचा शोध लागत गेला आणि विवाहानंतर दुसऱ्यांसाठी जगायचे हेच ठरवून मार्गक्रमण केले. देशातील मुलींनी मनावर घेतले, तर त्या जगाचे चित्र निश्चितपणे बदलू शकतील. डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, आपल्या परिसराकडे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. समाजात चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात. आपण कोणत्या बाजूने राहायचे याचा विचार स्वत:च करावयाचा असतो. जीवन हे सत्प्रवृत्त पध्दतीने जगले पाहिजे. आजकाल पैसा कमावण्यासाठीच बहुतांशी विद्यार्थी शिकतात. परंतु समाजसेवाही महत्त्वाची आहे, याचा विसर पडून उपयोग नाही. इंद्रजित देशमुख म्हणाले, स्वत:पुरते न जगता समाजासाठी जगावे, हा मंत्र कोल्हे दाम्पत्याने दिला आहे. सेवाभावी कार्यकर्त्यांच्या एका डोळ्यात प्रेम आणि दुसऱ्यात वेदना असावी लागते. सेवेत देव-घेवीचा व्यवहार नसून, केवळ नि:स्वार्थी भाव असतो. शहाणी माणसे स्वत:चा संसार करतात, तर वेडी माणसे जगाचा संसार करतात. त्यामुळे प्रत्येकाने एक दिवस तरी वेडे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. मोहन पाटील यांनी परिचय, योगिता पाटील यांनी मानपत्र वाचन, सदानंद गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, डॉ. मनोहर नरांजे (नागपूर), ब्रिगेडिअर सुरेश पाटील, डॉ. अविनाश पाटील, संगीता पाटील, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)