शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

माणुसकीची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवा

By admin | Updated: January 19, 2015 00:30 IST

स्मिता कोल्हे : सांगलीत भावनिक एकात्मता व कर्मयोगी पुरस्काराने कोल्हे दांपत्याचा गौरव

सांगली : ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील आणि माई यांनी आपणा सर्वांना दिलेला समाजसेवेचा मंत्र भावी पिढीने जपला पाहिजे. यासाठीच माणुसकीची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवा, असे आवाहन सेवाभावी कार्यकर्त्या डॉ. स्मिता कोल्हे यांनी केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मेळघाटातील बैरागड येथील दुर्गम खेड्यात आदिवासींच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना विकास योजनेचे उपायुक्त इंद्रजित देशमुख (पुणे) यांच्याहस्ते ‘भावनिक एकात्मता पुरस्कार’ आणि ‘कर्मयोगी सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. शाल, श्रीफळ, मानपत्र व रोख एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.डॉ. कोल्हे म्हणाल्या की, भावी पिढीकडून आम्हाला आशा आहे. समाजसेवेचे व्रत भविष्यकाळात देखील सुरु राहिले पाहिजे. आपले प्रत्येक पाऊल हे दुसऱ्यांच्या हितासाठीच असले पाहिजे, याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे. माझे लग्नापूर्वीपर्यंतचे आयुष्य हे छानछोकीतच गेले होते. महाविद्यालयीन जीवनात अ. भा. वि. प. संघटनेशी जोडले गेल्याने माझ्यावर समाजसेवेचा संस्कार झाला. विनोबांच्या गीता प्रवचनातून स्वधर्माचा शोध लागत गेला आणि विवाहानंतर दुसऱ्यांसाठी जगायचे हेच ठरवून मार्गक्रमण केले. देशातील मुलींनी मनावर घेतले, तर त्या जगाचे चित्र निश्चितपणे बदलू शकतील. डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, आपल्या परिसराकडे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. समाजात चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात. आपण कोणत्या बाजूने राहायचे याचा विचार स्वत:च करावयाचा असतो. जीवन हे सत्प्रवृत्त पध्दतीने जगले पाहिजे. आजकाल पैसा कमावण्यासाठीच बहुतांशी विद्यार्थी शिकतात. परंतु समाजसेवाही महत्त्वाची आहे, याचा विसर पडून उपयोग नाही. इंद्रजित देशमुख म्हणाले, स्वत:पुरते न जगता समाजासाठी जगावे, हा मंत्र कोल्हे दाम्पत्याने दिला आहे. सेवाभावी कार्यकर्त्यांच्या एका डोळ्यात प्रेम आणि दुसऱ्यात वेदना असावी लागते. सेवेत देव-घेवीचा व्यवहार नसून, केवळ नि:स्वार्थी भाव असतो. शहाणी माणसे स्वत:चा संसार करतात, तर वेडी माणसे जगाचा संसार करतात. त्यामुळे प्रत्येकाने एक दिवस तरी वेडे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. मोहन पाटील यांनी परिचय, योगिता पाटील यांनी मानपत्र वाचन, सदानंद गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, डॉ. मनोहर नरांजे (नागपूर), ब्रिगेडिअर सुरेश पाटील, डॉ. अविनाश पाटील, संगीता पाटील, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)