शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवा

By admin | Updated: January 19, 2015 00:30 IST

स्मिता कोल्हे : सांगलीत भावनिक एकात्मता व कर्मयोगी पुरस्काराने कोल्हे दांपत्याचा गौरव

सांगली : ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील आणि माई यांनी आपणा सर्वांना दिलेला समाजसेवेचा मंत्र भावी पिढीने जपला पाहिजे. यासाठीच माणुसकीची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवा, असे आवाहन सेवाभावी कार्यकर्त्या डॉ. स्मिता कोल्हे यांनी केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मेळघाटातील बैरागड येथील दुर्गम खेड्यात आदिवासींच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना विकास योजनेचे उपायुक्त इंद्रजित देशमुख (पुणे) यांच्याहस्ते ‘भावनिक एकात्मता पुरस्कार’ आणि ‘कर्मयोगी सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. शाल, श्रीफळ, मानपत्र व रोख एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.डॉ. कोल्हे म्हणाल्या की, भावी पिढीकडून आम्हाला आशा आहे. समाजसेवेचे व्रत भविष्यकाळात देखील सुरु राहिले पाहिजे. आपले प्रत्येक पाऊल हे दुसऱ्यांच्या हितासाठीच असले पाहिजे, याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे. माझे लग्नापूर्वीपर्यंतचे आयुष्य हे छानछोकीतच गेले होते. महाविद्यालयीन जीवनात अ. भा. वि. प. संघटनेशी जोडले गेल्याने माझ्यावर समाजसेवेचा संस्कार झाला. विनोबांच्या गीता प्रवचनातून स्वधर्माचा शोध लागत गेला आणि विवाहानंतर दुसऱ्यांसाठी जगायचे हेच ठरवून मार्गक्रमण केले. देशातील मुलींनी मनावर घेतले, तर त्या जगाचे चित्र निश्चितपणे बदलू शकतील. डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, आपल्या परिसराकडे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. समाजात चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात. आपण कोणत्या बाजूने राहायचे याचा विचार स्वत:च करावयाचा असतो. जीवन हे सत्प्रवृत्त पध्दतीने जगले पाहिजे. आजकाल पैसा कमावण्यासाठीच बहुतांशी विद्यार्थी शिकतात. परंतु समाजसेवाही महत्त्वाची आहे, याचा विसर पडून उपयोग नाही. इंद्रजित देशमुख म्हणाले, स्वत:पुरते न जगता समाजासाठी जगावे, हा मंत्र कोल्हे दाम्पत्याने दिला आहे. सेवाभावी कार्यकर्त्यांच्या एका डोळ्यात प्रेम आणि दुसऱ्यात वेदना असावी लागते. सेवेत देव-घेवीचा व्यवहार नसून, केवळ नि:स्वार्थी भाव असतो. शहाणी माणसे स्वत:चा संसार करतात, तर वेडी माणसे जगाचा संसार करतात. त्यामुळे प्रत्येकाने एक दिवस तरी वेडे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. मोहन पाटील यांनी परिचय, योगिता पाटील यांनी मानपत्र वाचन, सदानंद गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, डॉ. मनोहर नरांजे (नागपूर), ब्रिगेडिअर सुरेश पाटील, डॉ. अविनाश पाटील, संगीता पाटील, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)