शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

कवठेमहांकाळ वसतिगृहातील विद्यार्थी तणावात

By admin | Updated: November 30, 2014 00:57 IST

अधीक्षकांचा मनमानी कारभार : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दुजाभावाची वागणूक; जेवणही निकृष्ट दर्जाचे

अर्जुन कर्पे /कवठेमहांकाळ कवठेमहांकाळ येथील समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या अधीक्षकांकडून येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय, दुजाभावाची वागणूक व मनमानी कारभाराने विद्यार्थी मानसिक दबावाखाली रहात असल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. कवठेमहांकाळ येथे साडेतीन वर्षापूर्वी सात कोटी रुपये खर्च करून अद्ययावत स्वरुपाचे वसतिगृह सुरू झाले. येथे शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असून, सध्या ७५ ते ६८ विद्यार्थी राहतात. परंतु या वसतिगृहात राहणारे हे सर्व मागासवर्गीय, गोरगरीब विद्यार्थी सध्या मोठ्या मानसिक दबावाखाली, अधीक्षकांच्या अन्याय, त्रासापुढे भरडून निघत आहेत. या विद्यार्थ्यांनी कुणाकडे तक्रार करायची म्हटल्यास, त्यांच्यावर अधीक्षकांच्या दबावाची टांगती तलवार असते. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामार्फत मोफत जेवण, स्टेशनरी, मासिक विद्यावेतन दिले जाते. परंतु या देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दिरंगाई, बोगसपणा, भ्रष्टाचार, निकृष्ट पध्दतीचे जेवण मिळते आणि हे सर्व कुणाला सांगितल्यास विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याऐवजी अन्यायच वाढतो. यामुळे विद्यार्थ्यांना हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहण्याखेरीज आणि अन्याय सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याची गाऱ्हाणे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे मांडली. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाकाहारी व आठवड्यातून दोनवेळा मांसाहारी जेवण दिले जाते. परंतु शाकाहारी जेवणामध्ये पापड, तूप, मूग, हरभरा, वाटाणा यांच्या डाळी देणे नियमाने बंधनकारक आहे. परंतु हा सकस आहारही विद्यार्थ्यांना दिला जात नाही. रोज एक फळ देणेही गरजेचे व नियमात आहे, परंतु तेही कधी दिले जाते, तर कधी नाही. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भातासाठी निकृष्ट दर्जाचा तांदूळ, तर दुधात पाण्याची मोठ्या प्रमाणात भेसळ करून दूध दिले जाते. तसेच मांसाहारी जेवणातही मोठी भेसळ असल्याची गंभीर तक्रार आज विद्यार्थ्यांनी केली आहे. या सर्व प्रकारामुळे येथे राहणाऱ्या गोरगरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना सोळा वह्या व पुस्तकांचा संच मोफत देण्याची सुविधा शासन नियमानुसार आहे. परंतु येथे विद्यार्थ्यांना फक्त एक किंवा दोन वह्या दिल्या गेल्या आहेत, तर पुस्तकांचा पत्ताच नाही. हा सर्व प्रकार येथे अधीक्षकांमुळे घडत आहे. या अधीक्षकांच्या मनमानी कारभारामुळे व विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर, शैक्षणिक अभ्यासावर परिणाम झाला आहे. अधीक्षकांच्या या मनमानी कारभाराला, त्रासाला कंटाळून, आमची स्वप्ने अधुरीच राहतात की काय? असा प्रश्नही या येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पडत आहेत. अधीक्षकाला समाजकल्याण अधिकारी कायमचा धडा शिकवणार आहे की नाही? अशी संतप्त विचारणा तालुक्यातील विद्यार्थी संघटना केली आहे. अधीक्षकांच्या कारभाराला लगाम घालून या अधीक्षकाला धडा शिकवावा. अन्यथा अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करू, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.