शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादीला खिंडार

By admin | Updated: July 26, 2015 00:17 IST

अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा : आबांच्यानंतर कार्यकर्त्यांना वाली राहिला नसल्याची खंत

कवठेमहांकाळ : बाजार समितीच्या निवडणुकीतील पक्षांतर्गत राजकारणामुळे राष्ट्रवादीचे कवठेमहांकाळ तालुकाअध्यक्ष भानुदास पाटील व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. भानुदास पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत खळबळ माजली आहे. शनिवारी कवठेमहांकाळ येथे भानुदास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचे सांगितले. यावेळी भानुदास पाटील यांनी पक्ष नेतृत्वावर तसेच निर्णय प्रक्रिया राबविणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आपण पक्षाचे तालुकाअध्यक्ष असताना कोणत्याही राजकीय निर्णय प्रक्रियेत आपल्याला समावून घेतले जात नाही. तालुक्यात आर. आर. आबांच्या निधनानंतर निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू आहे. तालुक्यात गटबाजीचे जोरदार राजकारण सुरू असून, महांकालीचे अध्यक्ष विजयराव सगरे व सुुरेश पाटील यांच्या गटबाजीच्या राजकारणाचा आपल्याला कंटाळा आला आहे. अशा गटबाजीच्या राजकारणात अडकण्यापेक्षा घरी बसलेले बरे म्हणून आपण हा राजीनामा देत आहोत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीतही उमेदवारी निश्चित करीत असताना गटबाजीचे व जिरवा-जिरवीचे राजकारण झाले. त्यावेळीही आपल्याला किंमत दिली नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सांगली बाजार समितीच्या उमेदवारी निश्चितीवेळीही आपल्याला निर्णय प्रक्रियेत व विश्वासात घेतले नाही. मग हा पक्ष व पद काय कामाचे. ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे. आपला व राष्ट्रवादी पक्षाचा भविष्यात काडीचा संबंध राहणार नसल्याचे भानुदास पाटील यांनी सांगितले. यावेळी महादेव सूर्यवंशी, नंदकुमार घाडगे, मधुकर पाटील यांच्यासह ग्रामपंचायत, विकास सोसायटीचे निवडक सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर) जयंत पाटील यांचे दुर्लक्ष पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे सोपविली आहे. परंतु जयंत पाटीलसुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असल्यानेच राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे पाटील म्हणाले. आर. आर. आबा पाटील स्थानिक कार्यकर्त्यांची मते लक्षात घेऊन कोणताही निर्णय घेत होते, परंतु आबांच्यानंतर खरंच आम्ही पोरके झालो आहोत. आता आधार तरी कुणाचा शोधायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गटबाजीवर टीकास्त्र सुरेश पाटील व विजय सगरे यांच्यातील गटबाजीचे राजकारण आता कळीचा मुद्दा बनला आहे. याच गटबाजीचा धागा पकडत तालुका अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. एवढे सारे घडत असतानाही नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नेत्यांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.