शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कवठेएकंदचा सुपुत्र कुलगुरू पदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:24 IST

राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मान सांगली जिल्ह्याला प्रथमच मिळालाय. कवठेएकंद (ता. तासगाव) येथील डॉ. ...

राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मान सांगली जिल्ह्याला प्रथमच मिळालाय. कवठेएकंद (ता. तासगाव) येथील डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांच्या खांद्यावर या विद्यापीठाची जबाबदारी आली आहे.

सांगलीचा हा सुपुत्र सांगली, कोल्हापूरसह जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठात सर्वोच्च स्थानी विराजमान झाला आहे. विशेष म्हणजे डॉ. पाटील याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. आतापर्यंत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम करत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीची बीटेक पदवी प्राप्त केल्यानंतर खरगपूर आयआयटी येथून एमटेक पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी. मिळविली. उच्च शिक्षणाच्या पायऱ्या पूर्ण केल्यानंतर कुलगुरू पदासारखी सर्वोच्च जबाबदारी मिळणे, हा मोठाच सन्मान ठरला आहे. पाच वर्षांसाठी ते या पदावर राहतील.

डॉ. पाटील यांची शैक्षणिक व नोकरीची कारकीर्द मुंबईमध्ये असली, तरी कवठेएकंद गावाशी नाळ सुटू दिलेली नाही. वर्षातून काहीवेळा गावाकडे त्यांची फेरी हमखास ठरलेली असते. गावाकडचे नातेवाईक आणि मित्रमंडळींशी नित्य संपर्क असतो. त्यांच्या निवडीने कवठेएकंद गावात दसऱ्याच्या आतषबाजीचे वातावरण होते.