शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

कवलापुरातील तलाव ४६ वर्षांत प्रथमच आटला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:09 IST

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील तलाव गेल्या ४६ वर्षांत प्रथमच आटले आहे. ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील तलाव गेल्या ४६ वर्षांत प्रथमच आटले आहे. तलावात पाण्याचा थेंबही नसल्याने खर्चाच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तलाव पूर्णपणे आटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांना पाणी बंद झाले आहे. जनवारांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.कवलापूरचा तलाव प्रसिद्ध आहे. हा तलाव कधी आणि कोणी काढला, याबद्दल जुन्या लोकांनाही माहीत नाही. गावाबाहेर विमानतळालगत तलाव आहे. तो आकाराने खूप मोठा आहे. येथे नेहमीच महिलांची कपडे धुण्यासाठी गर्दी असते. जनवारांनाही पाणी पाजण्यासाठी आणले जाते. काहीजण वाहने धुवायला येतात. अगदी बुधगावचे ग्रामस्थ या तलावाचा उपयोग करुन घेतात. गणेश मूर्तींचे विसर्जनही केले जाते. घटस्थापना तसेच सिद्धेश्वर यात्रेपूर्वी मोठी धुणी धुण्यासाठी संपूर्ण गाव या तलावावर येते. मध्यंतरी तळ्यातील मासेमारीचा ठेकाही देण्यात आला होता. सांगलीपासून अवघ्या दहा किलोमीटरवर कवलापूर गाव आहे. तरीही कित्येक वर्षांपासून या गावचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. अनेकदा महिना, पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. त्यावेळी ग्रामस्थांना या तलावाचा खूप आधार मिळतो. विशेषत: महिला कपडे धुण्यासाठी येतात. बहुतांश गावातील जनावरांना पाणी पाजण्यास आणले जाते.यावर्षी ऐन उन्हाळ्यात तलाव आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. सध्या ग्रामपंचायतीकडून पाच ते सहा दिवसांतून एकवेळ पाणी पुरवठा केला जात आहे. नळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. जनवारांना पाणी खूप लागते. यासाठी तलावाचा आधार होतो. मात्र गेल्या ४५ वर्षांत यंदा तो प्रथमच आटला आहे. १९७२ ला दुष्काळ पडला होता. त्यावेळीही तलाव आटला होता. दुष्काळी परिस्थितीत याच तलावाने ग्रामस्थांना तारले होते. ग्रामस्थांनी गाळही काढला होता. तलाव, विहीर आणि कूपनलिका असे एक आगळे-वेगळे समीकरण आहे. तलाव आटले की, परिसरातील विहिरी तळ गाठतात. कूपनलिकांना अजिबात पाणी येत नाही. धुळगाव रस्त्यावर पिराचा मळा येथे एक खूप खोल विहीर आहे. उन्हाळ्यात तलावातील पाणी कमी झाले, तर या विहिरीतील पाणीही कमी होत असे. आताही तशीच परिस्थिती आहे. दरम्यान ग्रामस्थ शरद पाटील यांनी तलावातील गाळ काढण्याची तयारी दर्शविली आहे.