शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

कडेगावात रंगणार काट्याच्या लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:07 IST

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या फडात सर्वत्र तुल्यबळ उमेदवारांत काट्याच्या लढती रंगणार आहेत.

ठळक मुद्दे तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचे धुमशान : कदम-देशमुख गटामध्ये पारंपरिक चढाओढनिवडणुका असणाºया गावांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.काही ठिकाणी नेत्याच्या तर काही ठिकाणी भावकीच्या प्रतिष्ठेसाठी ईर्षा पेटणार

प्रताप महाडिक।लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या फडात सर्वत्र तुल्यबळ उमेदवारांत काट्याच्या लढती रंगणार आहेत. बहुतांशी गावात काँग्रेस विरूद्ध भाजप असा अटीतटीचा सामना होणार आहे. परंतु काही ठिकाणी मात्र आघाड्यांचे राजकारण रंगणार आहे. निवडणुका असणाºया गावांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने उमेदवार निवडताना नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधाºयांच्या, तर सत्ता खेचण्यासाठी विरोधकांच्या जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. या निवडणूक निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतात. त्यामुळे ग्रामपंचायतींची सत्ता मिळवण्यासाठी आमदार डॉ. पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.कडेगाव तालुक्यात गावोगावी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविण्यासाठी कदम आणि देशमुख या पारंपरिक प्रतिस्पर्धी व परस्परविरोधी गटात चढाओढ आहे. या रणधुमाळीत उमेदवारीसाठी खुल्या प्रभागात चुरस, तर आरक्षित प्रभागात उमेदवारांचा शोध, अशीच परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना गावपुढाºयांची कसोटी लागत आहे. सरपंचपदाचा उमेदवार संबंधित पक्षातील कार्यर्त्यांच्या एकमताने ठरविण्यावर नेत्यांनी अधिक भर दिला आहे. देवराष्ट्रे, तडसर, अमरापूर आदी गावात खुल्या गटातील सरपंचपदाने निवडणुकीला रंग भरला आहे. येथे काँग्रेस व भाजप दोन्हीकडे इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे नाराजीतून बंडखोरी होऊ नये याकडे प्रमुख नेत्यांचे लक्ष आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षीय चिन्हावर नसली तरी, तालुक्यात काँग्रेसविरोधात भाजप अशी काट्याची टक्कर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र सोनहिरा खोºयातील काही गावात भाजपच्या साथीने उमेदवार उभे राहतील.आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या रणांगणात कदम व देशमुख हे दोन्ही राजकीय गट आपापली ताकद अजमावणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची इमेज आणि विकास कामातील योगदानाचा प्रभाव पडणारच आहे. परंतु गावोगावी उमेदवाराचा प्रभाव, स्थानिक पातळीवरील हेवेदावे, भावकीचे राजकारण यावरच सत्तेची गणिते ठरणार आहेत.आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या मातब्बर नेत्यांनी निवडणुकीत बारकाईने लक्ष घातले आहे. यामुळे गावोगावी अटीतटीची झुंज होणार हे निश्चित आहे. शिवसेना, शेतकरी संघटना, आरपीआय आदी पक्ष काही गावात काही जागा लढवून ताकद अजमाविण्याचा प्रयत्न करतील. काही ठिकाणी नेत्याच्या तर काही ठिकाणी भावकीच्या प्रतिष्ठेसाठी ईर्षा पेटणार आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्वासाठी काँग्रेस व भाजप दोन्ही गटांनी कंबर कसली आहे.नेत्यांची प्रतिष्ठा पणालाआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वांगी, देवराष्ट्रे, नेवरी, शाळगाव आदी मोठ्या ग्रामपंचायतींकडे नेत्यांचे विशेष लक्ष आहे.बाहुबलींची हवा टाईटजनतेतून सरपंच निवड असल्याने जनमानसात झिरो आणि नेत्यांजवळ हिरो असणाºया काही बाहुबलींची ‘हवा टाईट’ झाली आहे. कोणी तरी कट्टप्पा धक्का देणार, या भीतीने अशा काही बाहुबलींना मैदानातून काढता पाय घ्यावा लागणार आहे.या ४३ गावांत होणार निवडणूक...आंबेगाव, अमरापूर, अपशिंगे, आसद, बेलवडे, भिकवडी (खुर्द), बोंबाळेवाडी, चिखली, देवराष्ट्रे, हणमंतवडीये, हिंगणगाव (बुद्रुक), हिंगणगाव (खुर्द), कडेपूर, करांडेवाडी, खांबाळे (औंध), खेराडे (विटा), खेराडे (वांगी), कोतवडे, कुंभारगाव, मोहित्यांचे वडगाव, नेर्ली, नेवरी, निमसोड, पाडळी, रायगाव, रेणुशेवाडी, सोहोली, सासपडे, शाळगाव, शिरगाव, शेळकबाव, शिवाजीनगर, सोनसळ, तडसर, तुपेवाडी, तोंडोली, उपाळे (मायणी), उपाळे (वांगी), वडीयेरायबाग, विहापूर, वांगी, येडे, येवलेवाडी या ४३ गावांत ग्रामपंचायत निवडणूक रंगणार आहे .