शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

कडेगाव तालुक्यात पुन्हा सत्तासंघर्ष

By admin | Updated: July 6, 2015 00:33 IST

नऊ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक : काँग्रेस-भाजपमध्ये थेट लढत

प्रताप महाडिक - कडेगाव -कडेगाव तालुक्यात अंबक, शिवणी, कडेगाव, सोनकिरे, शिरसगाव, येतगाव, कान्हरवाडी, कोतीज, ढाणेवाडी या नऊ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक तसेच उपाळे (वांगी), रेणुशेवाडी, खेराडे-वांगी या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक २५ जुलैरोजी होत आहे. यापैकी बहुतांशी गावात कॉँग्रेस-भाजपमध्येच सामना रंगणार आहे. येथे कॉँग्रेसचे माजी आमदार पतंगराव कदम व भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या परस्परविरोधी गटातील राजकीय सत्तासंघर्ष पुन्हा उफाळून येणार, अशी शक्यता आहे. कडेगाव, अंबक, शिवणी, सोनकिरे, शिरसगाव, येतगाव, कोतीज अशा सात ग्रामपंचायतींवर सध्या कॉँग्रेसचे वर्चस्व आहे, तर कान्हरवाडी आणि ढाणेवाडी या दोन ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे. दरम्यान, येतगाव आणि शिवणी येथे राष्ट्रीय कॉँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागले असल्याची चर्चा आहे. कॉँग्रेसअंतर्गत बंडाळीचा फायदा उठविण्यासाठी भाजप कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, तर गावोगावी कॉँग्रेस कार्यकर्ते एकसंध करण्यासाठी कॉँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. ढाणेवाडी आणि शिरसगाव येथे बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोधच्या प्रयत्नाला कितपत यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कॉँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची लढत होईल, अशी गावोगावी चर्चा आहे.उमेदवारीसाठी कॉँग्रेस आणि भाजप दोन्हीकडे इच्छुकांची गर्दी आहेच. यावर वारंवार बैठका घेऊन उमेदवार निश्चित केले जात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे. दरम्यान, अर्ज माघारीची मुदत संपल्यावरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.युवकांचा आग्रह आणि ज्येष्ठांची पंचाईतनिवडणूक जाहीर झालेल्या बहुतांशी गावांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता आहे. आजवर नेत्यांनी सांगायचे आणि कार्यकर्त्यांनी वागायचे, असा अलिखित नियमच बनून गेला होता. स्थानिक पातळीवरील निवडणुकांत हस्तक्षेप करणार नाही, असे माजी मंत्री पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, तसेच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगत आहेत. असे असले तरी हे निकाल नेत्यांसाठी प्रतिष्ठेचे असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.पक्षाकडून संधी न मिळाल्यास बंडाचा झेंडा फडकवत विरोधी गटाकडून अथवा स्वतंत्र पॅनेल उभारून प्रस्थापितांना आव्हान देण्याची तयारी करीत आहेत. परिणामी आजवर नेत्यांच्या मागे-पुढे करीत खुर्चीला चिटकून राहण्याच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठांची मात्र गोची झाली आहे. आता युवा कार्यकर्त्यांचे वाढलेले उपद्रवमूल्य लक्षात घेऊन नेते त्यांना संधी देणार, की पुन्हा निष्ठा जाणून ज्येष्ठांनाच झुकते माप देणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.कडेगाव लक्षवेधी...कडेगाव ग्रामपंचायतीवर कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. आता सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या कडेगाव ग्रामपंचायतीची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी कॉँग्रेस नेते आणि कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, तर येथे सत्तांतर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. यामुळे कडेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.