शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

जत पूर्वच्या गावांना कर्नाटकच्या पाण्याचा चकवा

By admin | Updated: April 24, 2016 23:54 IST

पाणीप्रश्न गंभीर : हिरेपडसलगी योजनेतून पाणी मिळण्याची शक्यता मावळली

शरद जाधव -- सांगली --कोसोदूरच्या तहानेने व्याकुळ झालेल्या लातूरला पाणी देत ‘जलदूता’चे काम करणाऱ्या सांगली-मिरजकरांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, याच जिल्ह्यातील अनेक गावांची तहान मात्र अजूनही कायम असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. जत पूर्व भागातील टंचाईग्रस्त भागाला कर्नाटकच्या ‘हिरेपडसलगी’ योजनेतून पाणी मिळण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाल्याने, आता या गावांना टॅँकरच्या भरवशावरच राहावे लागणार आहे. या तालुक्यातील शंभरावर गावे टंचाईच्या खाईत लोटली गेली आहेत.गेल्या आठवड्यात महाराष्ट्र व कर्नाटकच्या पाण्याच्या देव-घेवीच्या चर्चेतून कर्नाटकला देण्यात येणाऱ्या एक टीएमसी पाण्याच्या बदल्यात हिरेपडसलगी योजनेतून जत तालुक्यासाठी एक टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कृष्णा नदी कोरडी पडल्याने सध्या हिरेपडसलगी योजना कार्यान्वित नसल्याने पाणी देण्यास कर्नाटक पाटबंधारे विभागाने असमर्थता दर्शवली आहे. याबदल्यात नारायणपूर योजनेतून अक्कलकोटसाठी पाणी मिळणार आहे. राज्यातील एका टंचाईग्रस्त भागाला पाणी मिळणार असल्याने त्याचे समाधान असले तरी, जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला आहे. १२३ गावे आणि वाड्या-वस्त्यांमुळे भौगोलिकदृष्ट्या भलामोठा असलेला जत तालुका कायमस्वरुपी दुष्काळी आहे. त्यामुळे प्रशासनाला या तालुक्यात काम करणे आव्हानच असते. गेल्या तीन वर्षापासून सरासरीपेक्षा कमी पाऊसमान झाल्याने जत तालुक्यातील जलस्रोत आटले आहेत. सध्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ जत तालुक्यातील पश्चिम भागातील केवळ ११ गावांना होत आहे. या भागात असणारे तेरा तलाव ‘म्हैसाळ’च्या पाण्याने भरुन घेण्याची कार्यवाही सध्या सुरु असली तरी, पूर्व भागातील गावांना मात्र याचा कमी प्रमाणात लाभ होणार असल्याने, कर्नाटकातील हिरेपडसलगी योजनेतून पाणी सोडण्याची मागणी होत होती. यात यत्नाळ (जि. विजापूर) येथील तलावातून जत तालुक्यातील भिवर्गी तलावातून सीमावर्ती भागातील १६ गावांना पाणी मिळण्याची शक्यता होती. निगडी बुद्रुक येथील दोड्डनाला तलावातून या भागातील ६ गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र, आता हा तलावही कोरडा पडल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.आता कर्नाटकातही टंचाई परिस्थिती असून, पाणी मिळणार नसल्याने, जत पूर्व भागातील या गावांना आता टॅँकरवरच भरोसा ठेवावा लागणार आहे. त्यात म्हैसाळ योजनेचे कामही अपूर्ण असल्याने पाणीटंचाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. जत पूर्व भागातील या गावांना कायमस्वरुपी पाणी मिळावे, यासाठी आंदोलनेही झाली आहेत.तलाव कोरडे : कूपनलिका खुदाईस बंदीजत तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर बनला असतानाच, निसर्ग आणि प्रशासनाच्या अजब फेऱ्यात जत तालुक्यातील जनता अडकली आहे. तालुक्यातील तलाव कोरडे पडत असतानाच, आता कूपनलिका खुदाईवरही प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. कर्नाटकच्या मदतीने १५ गावांचा प्रश्न मिटला असता. मात्र, तेथेच पाणी नसल्याने टंचाई परिस्थिती कायम राहणार आहे. शासनाकडून जत तालुक्यातील जनतेची फसवणूक सुरु आहे. मुळात राज्यातील पाणीटंचाई असलेल्या भागाला पाणी देण्यात आपण आघाडी घेतली, ही सकारात्मक बाब असली तरी, जत तालुक्यातील पाणीटंचाई मिटविण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे होते. तालुक्यातील अपूर्ण योजनांसाठी १५० कोटींची मागणी केली असताना, केवळ २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ही या भागातील नागरिकांची क्रूर चेष्टा आहे.- सुनील पोतदार, अध्यक्ष, तालुका पाणी संघर्ष समिती.