शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जत पूर्वच्या गावांना कर्नाटकच्या पाण्याचा चकवा

By admin | Updated: April 24, 2016 23:54 IST

पाणीप्रश्न गंभीर : हिरेपडसलगी योजनेतून पाणी मिळण्याची शक्यता मावळली

शरद जाधव -- सांगली --कोसोदूरच्या तहानेने व्याकुळ झालेल्या लातूरला पाणी देत ‘जलदूता’चे काम करणाऱ्या सांगली-मिरजकरांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, याच जिल्ह्यातील अनेक गावांची तहान मात्र अजूनही कायम असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. जत पूर्व भागातील टंचाईग्रस्त भागाला कर्नाटकच्या ‘हिरेपडसलगी’ योजनेतून पाणी मिळण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाल्याने, आता या गावांना टॅँकरच्या भरवशावरच राहावे लागणार आहे. या तालुक्यातील शंभरावर गावे टंचाईच्या खाईत लोटली गेली आहेत.गेल्या आठवड्यात महाराष्ट्र व कर्नाटकच्या पाण्याच्या देव-घेवीच्या चर्चेतून कर्नाटकला देण्यात येणाऱ्या एक टीएमसी पाण्याच्या बदल्यात हिरेपडसलगी योजनेतून जत तालुक्यासाठी एक टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कृष्णा नदी कोरडी पडल्याने सध्या हिरेपडसलगी योजना कार्यान्वित नसल्याने पाणी देण्यास कर्नाटक पाटबंधारे विभागाने असमर्थता दर्शवली आहे. याबदल्यात नारायणपूर योजनेतून अक्कलकोटसाठी पाणी मिळणार आहे. राज्यातील एका टंचाईग्रस्त भागाला पाणी मिळणार असल्याने त्याचे समाधान असले तरी, जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला आहे. १२३ गावे आणि वाड्या-वस्त्यांमुळे भौगोलिकदृष्ट्या भलामोठा असलेला जत तालुका कायमस्वरुपी दुष्काळी आहे. त्यामुळे प्रशासनाला या तालुक्यात काम करणे आव्हानच असते. गेल्या तीन वर्षापासून सरासरीपेक्षा कमी पाऊसमान झाल्याने जत तालुक्यातील जलस्रोत आटले आहेत. सध्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ जत तालुक्यातील पश्चिम भागातील केवळ ११ गावांना होत आहे. या भागात असणारे तेरा तलाव ‘म्हैसाळ’च्या पाण्याने भरुन घेण्याची कार्यवाही सध्या सुरु असली तरी, पूर्व भागातील गावांना मात्र याचा कमी प्रमाणात लाभ होणार असल्याने, कर्नाटकातील हिरेपडसलगी योजनेतून पाणी सोडण्याची मागणी होत होती. यात यत्नाळ (जि. विजापूर) येथील तलावातून जत तालुक्यातील भिवर्गी तलावातून सीमावर्ती भागातील १६ गावांना पाणी मिळण्याची शक्यता होती. निगडी बुद्रुक येथील दोड्डनाला तलावातून या भागातील ६ गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र, आता हा तलावही कोरडा पडल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.आता कर्नाटकातही टंचाई परिस्थिती असून, पाणी मिळणार नसल्याने, जत पूर्व भागातील या गावांना आता टॅँकरवरच भरोसा ठेवावा लागणार आहे. त्यात म्हैसाळ योजनेचे कामही अपूर्ण असल्याने पाणीटंचाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. जत पूर्व भागातील या गावांना कायमस्वरुपी पाणी मिळावे, यासाठी आंदोलनेही झाली आहेत.तलाव कोरडे : कूपनलिका खुदाईस बंदीजत तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर बनला असतानाच, निसर्ग आणि प्रशासनाच्या अजब फेऱ्यात जत तालुक्यातील जनता अडकली आहे. तालुक्यातील तलाव कोरडे पडत असतानाच, आता कूपनलिका खुदाईवरही प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. कर्नाटकच्या मदतीने १५ गावांचा प्रश्न मिटला असता. मात्र, तेथेच पाणी नसल्याने टंचाई परिस्थिती कायम राहणार आहे. शासनाकडून जत तालुक्यातील जनतेची फसवणूक सुरु आहे. मुळात राज्यातील पाणीटंचाई असलेल्या भागाला पाणी देण्यात आपण आघाडी घेतली, ही सकारात्मक बाब असली तरी, जत तालुक्यातील पाणीटंचाई मिटविण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे होते. तालुक्यातील अपूर्ण योजनांसाठी १५० कोटींची मागणी केली असताना, केवळ २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ही या भागातील नागरिकांची क्रूर चेष्टा आहे.- सुनील पोतदार, अध्यक्ष, तालुका पाणी संघर्ष समिती.