शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

करजगी कोल्हापूर बंधाऱ्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST

संख : करजगी (ता. जत) येथील बोर ओढ्यावरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला सांगली पाटबंधारे विभागाकडून लोखंडी बरगे (प्लेट) बसविण्यात ...

संख : करजगी (ता. जत) येथील बोर ओढ्यावरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला सांगली पाटबंधारे विभागाकडून लोखंडी बरगे (प्लेट) बसविण्यात आल्या आहेत. ठेकेदाराला काम देण्यात आले होते. ठेकेदारांना बरगे व्यवस्थित बसविलेले नाहीत. आवश्यक साधनसामग्री न वापरल्याने पाणी दरवाज्यांतून वाहून जात आहे. रब्बी हंगामातील पिके, द्राक्ष, डाळिंब बागा अडचणीत येणार आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. बंधाऱ्यांची अवस्था ''असून अडचण, नसून खोळंबा'' अशी झाली आहे.

पूर्वभागातील करजगी येथे गावालगत बोर नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचा कृष्णा खोरे महामंडलांर्तगत २००३ मध्ये बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला आहेत. पाणीसाठा १६ दशलक्ष घनफूट आहे. एकूण ओलिताखाली येणारे क्षेत्र ५०० एकर आहे. हा बंधारा रब्बी हंगामातील पिके, द्राक्षे, डाळिंब फळबाग, ऊसपिकासाठी उपयुक्त आहे. या बंधाऱ्यातील पाणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुरते. बंधाराची दुरुस्ती, देखभाल पाटबंधारे विभागाची आहे. पाणी अडविण्यासाठी लोखंडी बरगे (प्लेट) दरवाजे बसविले आहेत. त्यामध्ये लोखंडी बरगे व्यवस्थित न बसविल्याने पाणीची गळती सुरू आहे. याअगोदर भागात दमदार पाऊस न झाल्याने पाणी गळतीचा प्रश्नच आला नाही.

यावर्षी पाटबंधारे विभागाने बरगे घालण्यासाठी कार्यालयीन ऑफलाईन टेंडर काढले होते. लोखंडी बरगे बसवून गंजू नये म्हणून गंजविरोधी रंग मारणे, काॅटन कापड, सिमेंट अपेक्षित होते पण काही बरग्यांनाच रंग मारला आहे. ठेकेदारांनी संगनमताने तोंडाला पाने पुसली आहेत. विभागाच्या दुर्लक्षाने काम निकृष्ट झाले आहे. लोखंडी दरवाजे व्यवस्थित न बसविल्याने या बंधाऱ्यातील पाणी गळती झाली आहे. सध्या बंधाऱ्यात १० टक्केच शिल्लक आहे.

फळबागांना नवसंजीवनी

गावातील द्राक्षे, डाळिंब फळबागेचे क्षेत्र अधिक आहे. फळबागेचे चांगले उत्पादन घेतले जाते. या बंधाऱ्याचा फायदा फळबागांना होणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा फळबागांना नवसंजीवनी ठरणार होता. बंधारा कोरडा पडल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन बंधारा दुरुस्तीचे काम परत करावे, अशी मागणी हाेत आहे.

फोटो : २९ संख १

ओळ : करजगी (ता. जत) येथील कोल्हापूर बंधाऱ्यात गळतीमुळे केवळ १० टक्के पाणी शिल्लक आहे.