शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

अक्षतांचे महत्त्व जोपासत कन्यादान!

By admin | Updated: December 16, 2014 23:37 IST

इस्लामपुरात उपक्रम : यादव दांपत्याचा अनोखा आदर्श

अशोक पाटील - इस्लामपूर -कोणत्याही शुभकार्यात अक्षतांचे मोठे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षता टाकण्याची योग्य पध्दत आणि अक्षता दुरुन टाकल्यामुळे अप्रत्यक्षपणे होणारी अन्नाची (तांदळाची) नासाडी टाळणे हा सुध्दा आपल्या सामाजिक व्यवधान पाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. व्यक्तीपरत्वे मतभिन्नता असू शकते. ‘माणूस आस्तिक की नास्तिक’ अशा चर्चेच्या जंगलात न अडकता येथील उद्योजक सर्जेराव यादव यांनी आपल्या मुलीच्या विवाहप्रसंगी सर्रासपणे अक्षता वाटण्याच्या प्रथेला फाटा देऊन एक सामाजिक कर्तव्यभावना पालनाचा संदेशच दिला.येथील प्रसिध्द उद्योजक सर्जेराव यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माधुरी यादव यांनी या अभिनव प्रथेची आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यापासून सुरुवात केली. ‘आधी केले, मग सांगितले’ या संत वचनानुसार यादव दाम्पत्याने हा पुरोगामी विचार समाजासमोर ठेवला आहे. विवाहाकडे समारंभ नव्हे, तर धार्मिक विधी म्हणून पाहणे गरजेचे आहे. वधू-वरांनी एकमेकांच्या आध्यात्मिक उन्नतीला पूरक व्हावे, या हेतूने विवाह संस्कार केले जातात. याकडे लक्ष वेधून अक्षता वाहण्याच्या योग्य पध्दतीबाबत प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.अक्षता या सुख, समृध्दी, धन, धान्य, संतती यांचे प्रतीक आहेत. त्यांच्या आशीर्वादपर स्पर्शाने वधू- वरांना या सर्वांचा लाभ होतो. दुरून टाकलेल्या अक्षता प्रत्यक्ष वधू-वरांच्या मस्तकावर न पडल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे चैतन्य, आशीर्वाद याचा वधू-वरांना लाभ होत नाही. अक्षतेला देवतेचेही रूप असते. अशा देवता स्वरूप मंगलाक्षता उपस्थितांच्या पायाखाली तुडवल्या जातात. पर्यायाने देवता आणि मंगल आशीर्वादाचा अवमान होतो. सामाजिक हित आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार करता अक्षता या नैसर्गिक रंगांचा वापर करूनच तयार केल्या पाहिजेत, असा विचार मांडून यादव दाम्पत्याने आपल्या मुलीच्या विवाहप्रसंगी विवाह संस्कारांचे मनस्वी पालन करण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होेत होती.