शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कमळापुरात पत्नी, मेहुण्यावर कुऱ्हाडीने हल्ला

By admin | Updated: December 13, 2015 01:09 IST

दोघेही गंभीर : दुहेरी खुनाचा प्रयत्न; हल्लेखोर विटा पोलिसांत हजर

विटा : खानापूर तालुक्यातील कमळापूर येथे विलास खाशाबा साळुंखे (वय ६२) याने पत्नी व बहिणीच्या पतीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी चिंगूताई विलास साळुंखे (५५, रा. कमळापूर) व बहिणीचा पती नानासाहेब ऊर्फ भाऊसाहेब तुकाराम देवकर (६०, मूळ गाव वेजेगाव, ता. खानापूर) गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कमळापूर ते आळसंद रस्त्यावरील वडाचा मळा येथे घडली. घटनेनंतर हल्लेखोर स्वत: विटा पोलिसांत हजर झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, मेहुणे नानासाहेब देवकर आमच्या कुटुंबात भांडणे लावत असल्यामुळेच कुऱ्हाडीने घाव घातल्याचे हल्लेखोर विलासने पोलिसांना सांगितले असले, तरी घटनेमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. कमळापूर येथील वडाचा मळा नावाच्या वस्तीवर विलास साळुंखे याचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्याच्या बहिणीचे निधन झाल्याने वेजेगाव येथील बहिणीचा पती नानासाहेब कमळापूर येथे अधूनमधून राहण्यास येतात. गेल्या महिन्याभरापासून ते विलासच्या घरी राहण्यास होते. शनिवारी सायंकाळी नानासाहेब घरात असताना विलासने अचानक त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने दोन घाव घातले. या हल्ल्यात नानासाहेब यांच्या मेंदूला इजा पोहोचल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यावेळी आवाज झाल्याने अंगणात असलेली विलासची पत्नी चिंगूताई घरात जात असतानाच विलासने पाठीमागून येऊन त्यांच्याही पाठीवर कुऱ्हाडीने घाव घातला. त्यात त्याही गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर विलास दुचाकी घेऊन थेट विटा पोलिसांत हजर झाला. चिंगूताई यांच्या सून रूपाली जनावरांच्या गोठ्यात साफसफाई करीत असताना ही घटना त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी शेजारचे लोक जमा झाले. जखमींना प्रथम विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दोघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना मिरजच्या वॉन्लेस रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. नानासाहेब देवकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. घरात भांडणे लावत असल्याच्या संशयावरून वाद देवकर यांना दोन मुले असून, एक मुलगा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे सोने-चांदी गलाई व्यवसायात आहे, तर दुसरा मुलगा वेजेगाव येथे शेती करतो. पत्नीचे निधन झाल्यानंतर देवकर अधूनमधून कमळापुरात राहण्यास येत होते. ते कमळापुरात येऊन घरात भांडणे लावत असल्याचा संशय विलासला होता. त्यामुळे तो त्यांना कमळापुरात येण्यास विरोध करत होता. त्यातूनच त्यांच्यात वाद झाल्याने नानासाहेब यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. पत्नी चिंगूताई हिलाही रागाच्या भरात पाठीत कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याचे विलासने पोलिसांना सांगितले.