शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

‘सागरेश्वर’मधून काळवीट नामशेष

By admin | Updated: March 16, 2016 23:41 IST

अभयारण्यात प्राणीगणना : हरणांची संख्या घटली

अतुल जाधव-- देवराष्ट्रेयशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये नुकतीच प्राणीगणना पार पडली. यामध्ये काळवीट जातीची हरणे अभयारण्यातून पूर्णपणे बाहेर पडल्याचे दिसत आहे, तर मागील वर्षाच्या तुलनेत चितळ जातीच्या हरणांची संख्याही घटल्याचे दिसत आहे. चाऱ्याअभावी बाहेर पडणाऱ्या हरणांचे वाढते प्रमाण आणि मोकाट कुत्र्यांकडून होत असलेली शिकार ही मुख्य कारणे यामागे असल्याचे जाणकारांचे मत आहे.सुरुवातीच्या काळात अभयारण्यात चितळ, सांबर आणि काळवीट जातीच्या हरणांच्या बारा जोड्या सोडण्यात आल्या होत्या. अभयारण्यातील एका विशिष्ट जागी (मृगविहार) तारेचे कुंपण घालून त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा विरोध असतानाही ही हरणे मुक्त करण्यात आली. हरणांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत गेली आणि अभयारण्यात पोषक चारा आणि पाण्याची कमतरता जाणवू लागली. त्यानंतर बहुतांशी हरणे अभयारण्याच्या बाहेर पडली. चारा आणि पाण्याच्या शोधार्थ असलेल्या प्राण्यांना मोकाट कुत्र्यांमुळे प्राणाला मुकावे लागले आहे.नुकतीच वन विभागाने प्राण्यांची गणना केली असून, यामध्ये २००८ च्या तुलनेत प्राण्यांचे प्रमाण घटल्याचेच वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या वनमंत्री पदाच्या कार्यकालात अभयारण्याचा खऱ्याअर्थाने विकास केला. कोट्यवधींची विकासकामे केली, मात्र प्रशासनाने बाहेरील हरणे अभयारण्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. २००८ मध्ये अभयारण्यात २२९ सांबर, ३२८ चितळ आणि २५० काळवीटांची संख्या होती. २०१६ मध्ये झालेल्या गणनेमध्ये मात्र अभयारण्यामध्ये काळवीट जातीची हरणे अजिबात पाहावयास मिळत नाहीत. तसेच चितळ ११६ व सांबर ४३८ आढळून आली. यातून चितळांची संख्याही घटल्याचे दिसत आहे.अभयारण्याबाहेर हरणे : प्रशासनाचे दुर्लक्षप्रत्यक्षात अभयारण्याबाहेर हरणांची संख्या लक्षणीय आहे. माळरानावर कळपाने हरणे फिरताना दिसत आहेत. मोकाट हरणांकडून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. खरे तर अभयारण्याला चेनलिंक जाळीचे कुंपण घालताना बाहेरील हरणांना अभयारण्यात घेणे गरजेचे होते. मात्र तसे झालेले नाही. त्यावेळी ही बाब प्रशासनाच्या का लक्षात आली नाही? हा प्रश्नच आहे. यामुळे निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.