शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

‘सागरेश्वर’मधून काळवीट नामशेष

By admin | Updated: March 16, 2016 23:41 IST

अभयारण्यात प्राणीगणना : हरणांची संख्या घटली

अतुल जाधव-- देवराष्ट्रेयशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये नुकतीच प्राणीगणना पार पडली. यामध्ये काळवीट जातीची हरणे अभयारण्यातून पूर्णपणे बाहेर पडल्याचे दिसत आहे, तर मागील वर्षाच्या तुलनेत चितळ जातीच्या हरणांची संख्याही घटल्याचे दिसत आहे. चाऱ्याअभावी बाहेर पडणाऱ्या हरणांचे वाढते प्रमाण आणि मोकाट कुत्र्यांकडून होत असलेली शिकार ही मुख्य कारणे यामागे असल्याचे जाणकारांचे मत आहे.सुरुवातीच्या काळात अभयारण्यात चितळ, सांबर आणि काळवीट जातीच्या हरणांच्या बारा जोड्या सोडण्यात आल्या होत्या. अभयारण्यातील एका विशिष्ट जागी (मृगविहार) तारेचे कुंपण घालून त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा विरोध असतानाही ही हरणे मुक्त करण्यात आली. हरणांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत गेली आणि अभयारण्यात पोषक चारा आणि पाण्याची कमतरता जाणवू लागली. त्यानंतर बहुतांशी हरणे अभयारण्याच्या बाहेर पडली. चारा आणि पाण्याच्या शोधार्थ असलेल्या प्राण्यांना मोकाट कुत्र्यांमुळे प्राणाला मुकावे लागले आहे.नुकतीच वन विभागाने प्राण्यांची गणना केली असून, यामध्ये २००८ च्या तुलनेत प्राण्यांचे प्रमाण घटल्याचेच वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या वनमंत्री पदाच्या कार्यकालात अभयारण्याचा खऱ्याअर्थाने विकास केला. कोट्यवधींची विकासकामे केली, मात्र प्रशासनाने बाहेरील हरणे अभयारण्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. २००८ मध्ये अभयारण्यात २२९ सांबर, ३२८ चितळ आणि २५० काळवीटांची संख्या होती. २०१६ मध्ये झालेल्या गणनेमध्ये मात्र अभयारण्यामध्ये काळवीट जातीची हरणे अजिबात पाहावयास मिळत नाहीत. तसेच चितळ ११६ व सांबर ४३८ आढळून आली. यातून चितळांची संख्याही घटल्याचे दिसत आहे.अभयारण्याबाहेर हरणे : प्रशासनाचे दुर्लक्षप्रत्यक्षात अभयारण्याबाहेर हरणांची संख्या लक्षणीय आहे. माळरानावर कळपाने हरणे फिरताना दिसत आहेत. मोकाट हरणांकडून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. खरे तर अभयारण्याला चेनलिंक जाळीचे कुंपण घालताना बाहेरील हरणांना अभयारण्यात घेणे गरजेचे होते. मात्र तसे झालेले नाही. त्यावेळी ही बाब प्रशासनाच्या का लक्षात आली नाही? हा प्रश्नच आहे. यामुळे निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.