शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कवठेमहांकाळला काका गट सुसाट

By admin | Updated: December 10, 2015 00:49 IST

पंचायत समितीत राजकारण : राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा पाठिंबा

अर्जुन कर्पे --कवठेमहांकाळ --कवठेमहांकाळच्या राजकीय कुरुक्षेत्रावर राष्ट्रवादी पक्षाला व आर. आर. पाटील आबा गटाला मोठा धक्का बसला असून, रांजणी पंचायत समिती गटातील विद्यमान पंचायत समिती सदस्य पतंग यमगर, माजी सरपंच अण्णाप्पा माने यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील गटात प्रवेश केला आहे. पंचायत समितीमध्ये सदस्यांच्या आकडेवारीत खासदार पाटील यांनी चौकार लगावला असून, आबा गटाचे चार, अजितराव घोरपडेंचे दोन आणि आता खा. संजयकाका गटाचे चार असे बलाबल झाले आहे. भविष्यात पंचायत समितीचे राजकारण ताब्यात घेण्याच्या हालचाली काका गटाकडून सुरू आहेत.२०१२ च्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाने एकहाती सत्ता मिळविली. आबा गटाने पंचायत समितीत दहापैकी सात सदस्य निवडून आणले, दोन सदस्य घोरपडे गटाचे, तर एक अपक्ष निवडून आले. पंचायत समितीमध्ये आबा गटाच्या माध्यमातून एकहाती कारभार सुरु होता. परंतु आबांच्या निधनानंतर मतदारसंघातील सर्वच राजकीय समीकरणे बदलली. अनेक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपच्या खासदार गटात सामील झाले. सुरुवातीला पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी उपसभापती अनिल शिंदे, विद्यमान सभापती वैशाली पाटील, विद्यमान पंचायत समिती सदस्य शिवाजीराव चंदनशिवे यांनी थेट काकांच्या माध्यमातून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते गळ्यात भाजपचा हार घालून घेतला आणि आबा गटाला धक्का दिला. या धक्क्यातून आबा गट व राष्ट्रवादी पक्ष सावरण्याआधीच, सोमवारी, ७ डिसेंबर रोजी रांजणी पंचायत समिती सदस्य पतंग यमगर यांनी सांगली येथे काकांच्याहस्ते सत्कार स्वीकारत भाजपमध्ये प्रवेश केला, तर आशाताई पाटील, बाळासाहेब कुमठेकर हे दोन सदस्य अजितराव घोरपडे गटाचे आहेत आणि विद्यमान सभापती वैशाली पाटील, अनिल शिंदे, पतंग यमगर, शिवाजी चंदनशिवे हे चार सदस्य आता काका गटाचे झाले आहेत. त्यामुळे पंचायत समितीमध्ये आता भाजपचे तोडीस तोड सदस्य आहेत. यामुळे यापुढील काळात पंचायत समितीच्या राजकारणात व कारभारात काका गटाचे वजन वाढले आहे. पंचायत समितीचा कारभार आता काका गटाशिवाय अशक्य आहे. सभापती बदलाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या हालचाली आता काका गटाने फोडाफोडीचे राजकारण करुन पूर्णपणे थंड केल्या आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात काका गटाचे काही नाही म्हणणाऱ्यांना, पंचायत समिती कोणाची, याचे उत्तर राष्ट्रवादी पक्षाला देणे कठीण होऊन बसले आहे.‘काकां’चे प्राबल्य : आबा गटास चिंताआणखी एक पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीतून संजयकाका गटात गेल्याने आधीच राजकीय चक्रव्यूहात सापडलेल्या आबा गटाला आणखी फटका बसला आहे. पतंग यमगर यांच्या पक्षप्रवेशाने पंचायत समितीमधील राजकीय बलाबल बदलले आहे. आता राष्ट्रवादीचे अर्थात आबा गटाचे चार, अजितराव घोरपडे गटाचे दोन, तर संजयकाका गटाचेही चार सदस्य पंचायत समितीचा कारभार पाहणार आहेत. एकंदरीत बलाबल पाहता, उषाताई माने, सुरेखा कोळेकर, कल्पनाताई घागरे आणि उपसभापती जगन्नाथ कोळेकर हे चारच पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीकडे राहिले आहेत. यापुढील काळात संजयकाका गटाचे प्राबल्य वाढणार, हे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी, घोरपडे गटासमोर आव्हानकवठेमहांकाळ तालुक्यात खासदार संजयकाका पाटील यांचा राजकीय वारु कवठेमहांकाळ तालुक्यात सुसाट धावू लागला आहे. तो रोखणे राष्ट्रवादी पक्ष व अजितराव घोरपडे गटाला मोठे आव्हान बनले आहे.