शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कडेगाव-पलूस तालुके पुन्हा विकासाच्या वाटेवर !

By admin | Updated: November 12, 2014 23:27 IST

मतदारांचा विकासाला कौल : भाजपकडून निधी आणून पृथ्वीराज देशमुख पक्ष मजबूत करणार का?

रजाअली पीरजादे:शाळगाव :वस्तुत: राजकीय संघर्ष ज्या मतदारसंघात असतो, तेथे विकास झालेला दिसत नाही, असे बोलले जाते. परंतु महाराष्ट्रात कडेगाव-पलूस हा असा मतदारसंघ आहे, जेथे महाराष्ट्रात सर्वाधिक विकास झाला असल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीने पुन्हा एकदा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने हा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर आला आहे.सांगली जिल्ह्यावर वसंतदादांचे वर्चस्व होते. त्या काळात खानापूरवर संपतराव माने, शहाजीबापू पाटील, तर तासगाव-पलूसमधून दिनकर आबा पाटील, बाजीरावआप्पा पाटील, वसंतराव पुदाले यांचे वर्चस्व होते. १९८० च्या निवडणुकीत त्यावेळी कडेगावातून संपतराव देशमुख, डॉ. पतंगराव कदम इच्छुक होते. डॉ. पतंगराव कदम यांचे नाव त्यावेळी जवळजवळ निश्चित झाले होते. परंतु ऐनवेळी वसंतदादा यांनी संपतराव चव्हाण यांचे नाव जाहीर केले. त्यावेळी संपतराव देशमुख हे संपतराव चव्हाण यांच्या पाठीशी ठाम राहिले. तेव्हापासून खऱ्याअर्थाने देशमुख-कदम यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला, तो आजअखेर कायम आहे. दरम्यानच्या काळात नागेवाडी कारखाना उभारणीवर कदम-देशमुख संघर्ष झाला. या काळात संपतराव देशमुख खानापूरचे सभापती झाले. जिल्हा परिषदेत निवडून गेल्यावर तेथे सभापती झाले. संपतराव देशमुख यांनी डोंगराई उद्योग समूहाची स्थापना केली. डोंगराई कारखाना (आताचा केन अ‍ॅग्रो) व डोंगराई सूतगिरणी, महालक्ष्मी मागासवर्गीय सूतगिरणीची उभारणी केली. इकडे पतंगराव कदम यांनी सागरेश्वर सूतगिरणी, सोनहिरा साखर कारखाना, पलूसमध्ये कृष्णा-वेरळा सूतगिरणी उभारली. याच काळात विधानसभा निवडणुका झाल्या. १९९५ च्या निवडणुकीत पतंगरावांचा पराभव झाला. नंतर संपतराव देशमुखांचे निधन झाले. पृथ्वीराज देशमुख यांनी पाणीप्रश्न घेऊन संघर्ष चालू ठेवला. १९८० ते २००० पर्यंत देशमुख-कदम यांच्यात मोठा संघर्ष सुरूच राहिला. या काळात २००० मध्ये पलूस तालुक्याची निर्मिती आ. पृथ्वीराज देशमुख यांनी केली, तर २००४ मध्ये कडेगाव तालुक्याची निर्मिती कदम यांनी केली. या कदम-देशमुख राजकीय संघर्षात कडेगाव, पलूसचा मोठा विकास झाला. ताकारी, टेंभू कार्यान्वित झाल्या. पलूसचा क्षारपड जमीन विषय गाजला. गावा-गावात रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय झाली. कडेगाव-पलूसमध्ये शासकीय कार्यालये उभी राहिली. अनेक लोकोपयोगी कामे झाली. खरे पाहता, राजकीय संघर्षातून एवढा मोठा विकास झालेला कुठेही पाहावयास मिळत नाही. १९८० ते २०१४ दरम्यान राजकीय अनेक बदल झाले. परंतु कदम-देशमुख यांच्यामधील संघर्ष निवळला नाही. पतंगराव कदम या ना त्या कारणाने सत्तेत राहिले. आज राजकीय परिस्थिती बदलली आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. कदम विरोधी बाकावर बसणार आहेत, असे असले तरी, ते मतदारसंघाशी संपर्क ठेवून राहतील, तर देशमुख पुढील निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विकासकामांना चालना देतील, अशी अपेक्षा मतदारसंघातील जनतेला आहे.कदम-देशमुख यांच्यातील संघर्ष टोकालाडॉ. पतंगराव कदम यांनी, आपण पुन्हा निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले असले तरी, ते स्वत: उभे राहिले नाहीत तरी, पुढील निवडणुकीस पुत्र डॉ. विश्वजित कदम यांना उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉ. कदम यांना पुन्हा एकदा या मतदारसंघात विकासकामे केल्याशिवाय पर्याय नाही. साहजिकच कदम-देशमुख यांच्यातील संघर्ष भविष्यात तीव्र होणार असून, दोघांनाही मतदारसंघात जोमाने विकासाची कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे या दोघांच्या राजकीय संघर्षात या मतदारसंघाची भरभराट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.