शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कदम महाविद्यालयात ऑनलाईन परिषद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST

सांगली : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व मानवाच्या समोर असणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर दिला पाहिजे. असे ...

सांगली : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व मानवाच्या समोर असणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर दिला पाहिजे. असे विचार भारती अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मांडले. तर विज्ञान-तंत्रज्ञानाबरोबर सामाजिक शास्त्रांचा समन्वय साधूनच संशोधन केले पाहिजे. कारण यातूनच समाजाचा शाश्वत विकास होणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.

सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘सामाजिक कल्याणासाठी विज्ञान, सामाजिक शास्त्रे व भाषा शास्त्रातील नवीन कल, आव्हाने व समस्या’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अमेरिकेच्या सालीसबरी विद्यापीठातील प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी, शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. संभाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन परिषदेस भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. पी. एम. पाटील, टी. आर. सावंत, डॉ. ए. आर. सुपले आदींसह संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. नितीन गायकवाड, अमोल वंडे, मंगेश गावित, डॉ. एम. टी. कोल्हाळ यांनी सहकार्य केले.