शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

कदम महाविद्यालयात ऑनलाईन परिषद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST

सांगली : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व मानवाच्या समोर असणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर दिला पाहिजे. असे ...

सांगली : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व मानवाच्या समोर असणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर दिला पाहिजे. असे विचार भारती अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मांडले. तर विज्ञान-तंत्रज्ञानाबरोबर सामाजिक शास्त्रांचा समन्वय साधूनच संशोधन केले पाहिजे. कारण यातूनच समाजाचा शाश्वत विकास होणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.

सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘सामाजिक कल्याणासाठी विज्ञान, सामाजिक शास्त्रे व भाषा शास्त्रातील नवीन कल, आव्हाने व समस्या’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अमेरिकेच्या सालीसबरी विद्यापीठातील प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी, शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. संभाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन परिषदेस भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. पी. एम. पाटील, टी. आर. सावंत, डॉ. ए. आर. सुपले आदींसह संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. नितीन गायकवाड, अमोल वंडे, मंगेश गावित, डॉ. एम. टी. कोल्हाळ यांनी सहकार्य केले.