शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’साठी सहकारमंत्र्यांच्या घरावर शेतकऱ्यांचा ६ जूनला मोर्चा

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

रघुनाथदादा पाटील : शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’नुसार शेतकऱ्यांना उसाची बिले दिलेली नाहीत. याप्रकरणी कारखान्यांवर कारवाई करण्याची गरज होती. पण, सहकारमंत्र्यांनी त्यांना वाचविण्यासाठी अटी शिथिल करून दिलासा दिला आहे. तसेच पॅकेजची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. म्हणूनच दि. ६ जूनरोजी सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.ते पुढे म्हणाले की, साखरेचे दर गडगडल्यामुळे कारखान्यांकडे पूर्वीची साखर शिल्लक आहे. यातच नवीन साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे त्यांची गोदामे सध्या भरली आहेत. साखरेचे दर उतरले म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झालेला नाही. या शेतकऱ्यांच्या उसाला शासनाने ठरवून दिलेला किमान दर तर मिळालाच पाहिजे. परंतु, साखर कारखान्यांनी साखरेचे दर उतरल्यामुळे कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढल्याचे सांगितले आहे. कारखाने अडचणीत असल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने एफआरपीनुसार दर दिला नाही. जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांपैकी १२ कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिला नाही. या कारखान्यांकडे एफआरपीनुसारची शेतकऱ्यांची सुमारे २०४ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी देण्यासाठी राज्य शासनाने दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु, पॅकेज दिलेच नसल्यामुळे कारखानदार शासनाकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून दि. ६ जून रोजी कोल्हापूर येथील सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)