शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पत्रकारांनी ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आधुनिक काळात माहितीचा मोठा खजाना आपल्यासमोर उपलब्ध झाला आहे. त्याचा सकारात्मक वापर करून पत्रकारांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आधुनिक काळात माहितीचा मोठा खजाना आपल्यासमोर उपलब्ध झाला आहे. त्याचा सकारात्मक वापर करून पत्रकारांनी त्यांच्या ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात, असे आवाहन ''''लोकमत''''चे संपादक वसंत भोसले यांनी केले.

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने येथील वृत्तपत्र विक्रेता भवनात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, ''''लोकमत'''' चे आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर उपस्थित होते.

भोसले म्हणाले की, माध्यम क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले. हे बदल स्वीकारत पत्रकार पुढे जात असले तरी ज्ञानग्रहणातही पुढे जाणे आवश्यक आहे. आधुनिक साधनांशिवाय ज्या काळी पत्रकारिता केली जात होती, त्यावेळी माहिती मिळविणे हे खूप जिकिरीचे काम होते. आता माहितीची उपलब्धता सहज होत आहे. त्यावर अभ्यास करून योग्य-अयोग्यतेची पडताळणी करून ती माहिती समाजासमोर मांडली पाहिजे.

पत्रकारिता करताना नकारात्मकता बाजुला केली पाहिजे. आपल्यासमोर ज्या चांगल्या गोष्टी आल्या आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्या मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्याच्या पिढीने ज्ञान आत्मसात करून अभ्यासू वृत्ती जपली नाही, तर मुद्रित माध्यमांची सुदृढ परंपरा पुढे नेणे कठीण होईल. त्यामुळे सध्या कार्यरत पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. तांत्रिक बदल स्वीकारताना सामाजिक, राजकीय, भौगोलिक बदलांबाबतही सतर्क राहणे, त्याचे भान ठेवणे या गोष्टीही गरजेच्या आहेत.

समाजाच्या अडचणी, समस्या व त्यांच्या वेदना मांडण्याबरोबरच त्या कशा व कोणत्या मार्गाने साेडविता येतील, हे पत्रकारांनी दाखवून देणे आवश्यक आहे.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले की, पत्रकारांनी समाजातील नकारात्मक घटनांना अधिक महत्त्व, वातावरण अधिक दूषित तर होणार नाही ना, याची काळजी घ्यावी. समाजाला काय आवश्यक आहे, योजनांची अंमलबजावणी करताना काय त्रुुटी येत आहेत, हे दाखवून दिले पाहिजे.

बलराज पवार यांनी स्वागत, संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रास्ताविक केले. विकास सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी कार्याध्यक्ष समाधान पोरे, जालिंदर हुलवान, गणेश कांबळे, आदी उपस्थित होते. धनंजय पाठक यांनी सूत्रसंचालन केले.