शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

पत्रकारांनी ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आधुनिक काळात माहितीचा मोठा खजाना आपल्यासमोर उपलब्ध झाला आहे. त्याचा सकारात्मक वापर करून पत्रकारांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आधुनिक काळात माहितीचा मोठा खजाना आपल्यासमोर उपलब्ध झाला आहे. त्याचा सकारात्मक वापर करून पत्रकारांनी त्यांच्या ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात, असे आवाहन ''''लोकमत''''चे संपादक वसंत भोसले यांनी केले.

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने येथील वृत्तपत्र विक्रेता भवनात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, ''''लोकमत'''' चे आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर उपस्थित होते.

भोसले म्हणाले की, माध्यम क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले. हे बदल स्वीकारत पत्रकार पुढे जात असले तरी ज्ञानग्रहणातही पुढे जाणे आवश्यक आहे. आधुनिक साधनांशिवाय ज्या काळी पत्रकारिता केली जात होती, त्यावेळी माहिती मिळविणे हे खूप जिकिरीचे काम होते. आता माहितीची उपलब्धता सहज होत आहे. त्यावर अभ्यास करून योग्य-अयोग्यतेची पडताळणी करून ती माहिती समाजासमोर मांडली पाहिजे.

पत्रकारिता करताना नकारात्मकता बाजुला केली पाहिजे. आपल्यासमोर ज्या चांगल्या गोष्टी आल्या आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्या मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्याच्या पिढीने ज्ञान आत्मसात करून अभ्यासू वृत्ती जपली नाही, तर मुद्रित माध्यमांची सुदृढ परंपरा पुढे नेणे कठीण होईल. त्यामुळे सध्या कार्यरत पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. तांत्रिक बदल स्वीकारताना सामाजिक, राजकीय, भौगोलिक बदलांबाबतही सतर्क राहणे, त्याचे भान ठेवणे या गोष्टीही गरजेच्या आहेत.

समाजाच्या अडचणी, समस्या व त्यांच्या वेदना मांडण्याबरोबरच त्या कशा व कोणत्या मार्गाने साेडविता येतील, हे पत्रकारांनी दाखवून देणे आवश्यक आहे.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले की, पत्रकारांनी समाजातील नकारात्मक घटनांना अधिक महत्त्व, वातावरण अधिक दूषित तर होणार नाही ना, याची काळजी घ्यावी. समाजाला काय आवश्यक आहे, योजनांची अंमलबजावणी करताना काय त्रुुटी येत आहेत, हे दाखवून दिले पाहिजे.

बलराज पवार यांनी स्वागत, संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रास्ताविक केले. विकास सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी कार्याध्यक्ष समाधान पोरे, जालिंदर हुलवान, गणेश कांबळे, आदी उपस्थित होते. धनंजय पाठक यांनी सूत्रसंचालन केले.