शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पत्रकारांनी आरसा बनून उपेक्षितांचे प्रश्न मांडावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:32 IST

सांगली : पत्रकारांनी समाजाचा आरसा बनून काम केले पाहिजे. पण सध्या काही प्रसारमाध्यमे न्यायाधीश बनले आहेत. त्यातून अनेकांना नाहक ...

सांगली : पत्रकारांनी समाजाचा आरसा बनून काम केले पाहिजे. पण सध्या काही प्रसारमाध्यमे न्यायाधीश बनले आहेत. त्यातून अनेकांना नाहक त्रास झाला आहे. पत्रकारांनी आरसा बनून दुर्लक्षित व उपेक्षित लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत, अशी अपेक्षा कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी व्यक्त केली.

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, डाॅ. उदयसिंह पाटील, डाॅ. शीतल धनवडे, डाॅ. पंकजा पलंगे, डाॅ. शंकर दुधवाणी, सामाजिक कार्यकर्त्या कलावती पवार यांच्यासह पत्रकारितेत उल्लेखनीय काम केलेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी होते.

डाॅ. कदम म्हणाले की, कोरोनाच्या संकटात अनेकांनी कष्ट घेतले. सफाई कामगारापासून डाॅक्टर, नर्स, पोलीस, अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून काम केले. जिल्हाधिकारी व सीईओंनी योग्य नियोजन केल्याने कोरोनाच्या संकटात जिल्ह्याला दिलासा मिळाला. पत्रकारांनीही या संकटात मोलाची भूमिका बजाविली आहे. सध्या प्रसारमाध्यमांचे स्वरूप बदलले आहे. वृत्तपत्रांचा वापर चांगल्यासाठी व्हावा, त्याचा गैरवापर होऊ नये. सत्य आणि वस्तुस्थितीतून लोकांचे प्रश्न सुटावेत, यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जितेंद्र डुडी, डाॅ. उदयसिंह पाटील यांचीही भाषणे झाली. शेखर जोशी यांनी स्वागत, तर संजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र कांबळे यांनी आभार मानले.

चौकट

मीही पत्रकार होतो

मीही पत्रकार म्हणून काम केले आहे. २००६ मध्ये जर्मनीतील फुटबाॅल ‌विश्वचषकाचे वार्तांकन २३ दिवस करत होतो. तेव्हा पत्रकारांचे काम किती अवघड आहे, याची जाणीव झाली. त्यानंतर शिक्षण क्षेत्राबाबत लिखाण केल्याचे डाॅ. कदम यांनी सांगितले.

फोटो ओळी :- सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांच्याहस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डाॅ. अभिजित चौधरी, जितेंद्र डुडी उपस्थित होते.