शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

जीपचालकाने शाळकरी मुलाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला

By admin | Updated: May 27, 2015 01:18 IST

उपोषण केले नसते तर...

संख : दागिने व पैशाच्या हव्यासापोटी सिद्धनाथ (ता. जत) येथील फाट्यावर खासगी प्रवासी वाहतुकीच्या (वडाप) जीपचालकाने शाळकरी मुलाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला. उदयसिंह ऊर्फ सोनू बलराज रूपनर (वय १५, रा. सिद्धनाथ, मूळ गाव निमज, ता. कवठेमहांकाळ) असे मृत मुलाचे नाव आहे. दागिने लुटताना झालेल्या झटापटीत त्याची आई छायादेवी (३५), भाऊ सोमशेखर (१२), बहीण ऋतुजा (१४) गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. खुनानंतर पळून जाणारा२, रा. कैकाडी गल्ली, जत) जीप पलटल्यामुळे पोलिसांच्या हाती लागला.बलराज रूपनर मूळचे निमज येथील असून, जत तालुक्यातील पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये ते प्राथमिक शिक्षक आहेत. सिद्धनाथ येथे ते कुटुंबासह राहतात. सोमवारी त्यांचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होते. आंदोलन करून सांगलीतून रात्री एक वाजता शेवटच्या जत-सांगली गाडीने ते जतमध्ये आले. रात्र झाल्याने त्यांनी विजय माने याच्या मालकीची खासगी प्रवासी वाहतुकीची जीप (एमएच १० के ५१०) भाड्याने ठरवली. बलराज रूपनर यांनी कुटुंबातील सर्वांना जीपमध्ये बसवले आणि ते स्वत: जतमध्ये ठेवलेल्या दुचाकीवरून गाडीपाठोपाठ होते. जीपमध्ये रूपनर कुटुंबातील चौघांसह चालक असे पाचजण होते. मुचंडी ओलांडल्यानंतर बलराज रूपनर गाडीच्या पुढे निघून सिद्धनाथला गेले. सिद्धनाथ फाटा ओलांडून दोनशे मीटर पुढे आल्यावर माने याने जीप बंद पडल्याचे कारण सांगून ती थांबवली. तेथून छायादेवी मुलांसह फाट्याकडे निघाल्या. मात्र त्याचवेळी माने याने छायादेवी यांचे दागिने आणि पैसे लुटण्याच्या हेतूने बेसावध उदयसिंहवर अगोदरच खिशात ठेवलेल्या चाकूने सपासप वार केले. छाती व पोटावर वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर १४ वार झाले होते. त्याचवेळी उदयसिंहची आई छायादेवी, भाऊ सोमेश्वर आणि बहीण ऋतुजा हिच्यावरही मानेने चाकूने वार केले. छायादेवी आणि सोमेश्वर यांची प्रकृती गंभीर आहे. ही झटापट सुमारे दहा मिनिटे सुरू होती. यावेळी ऋतुजाने पुढे गेलेले वडील बलराज रूपनर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ते सिद्धनाथमधून घटनास्थळी आले. त्यांची गाडी आलेली पाहून विजय मानेने वेगाने दरीकोणूरमार्गे पलायन केले. मात्र दरीकोणूर-सोरडी रस्त्यावर पाटील वस्तीजवळ जीप पलटी झाली. रूपनर यांनी रात्री दोन वाजता वस्तीवरील लोकांना उठवले. जतला दूरध्वनी करून नातेवाईकांना बोलावून माने याला रुग्णालयामध्ये दाखल झाले. पोलिसांनी तेथून त्याला अटक केली.छायादेवी यांच्या गळ्यामध्ये दागिने होते. शिवाय त्यांची मुलगीही सोबत होती. मानेने वाईट हेतूने हा प्रकार केला असावा, अशीही चर्चा आहे. पोलिसांनी रात्री घटनास्थळी भेट दिली. जखमींना सांगलीला पाठवून दिले. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे तपास करीत आहेत. (वार्ताहर)शरीराची चाळणविजय मानेने मृत उदयसिंह याच्या छातीवर, पोटावर, मानेवर, पाठीवर, हातावर गंभीर १४ वार केले आहेत. त्याच्या शरीराची चाळण झाली होती. छायादेवी यांचे दागिने घेताना झटापट झाली असावी. यावेळी ऋतुजाने पैशांची पर्स घट्ट पकडून ठेवली होती. आई आणि बहिणीच्या मदतीला आलेला उदयसिंह मध्ये पडल्यावर मानेने वार केले असल्याचा संशय असून, छायादेवी यांच्या जबाबानंतर घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.उपोषण केले नसते तर...प्राथमिक शिक्षक बलराज रूपनर यांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले होते. आंदोलन करून ते उशिरा जतमध्ये आले. वडापच्या गाडीने गावी जाताना मुलाचा खून झाला. उपोषण केले नसते तर जतमध्ये येण्यास त्यांना एवढा उशीर झाला नसता. उपोषणामुळेच हा बळी गेला, अशी चर्चा परिसरात होती.