शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

जीपचालकाने शाळकरी मुलाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला

By admin | Updated: May 27, 2015 01:18 IST

उपोषण केले नसते तर...

संख : दागिने व पैशाच्या हव्यासापोटी सिद्धनाथ (ता. जत) येथील फाट्यावर खासगी प्रवासी वाहतुकीच्या (वडाप) जीपचालकाने शाळकरी मुलाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला. उदयसिंह ऊर्फ सोनू बलराज रूपनर (वय १५, रा. सिद्धनाथ, मूळ गाव निमज, ता. कवठेमहांकाळ) असे मृत मुलाचे नाव आहे. दागिने लुटताना झालेल्या झटापटीत त्याची आई छायादेवी (३५), भाऊ सोमशेखर (१२), बहीण ऋतुजा (१४) गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. खुनानंतर पळून जाणारा२, रा. कैकाडी गल्ली, जत) जीप पलटल्यामुळे पोलिसांच्या हाती लागला.बलराज रूपनर मूळचे निमज येथील असून, जत तालुक्यातील पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये ते प्राथमिक शिक्षक आहेत. सिद्धनाथ येथे ते कुटुंबासह राहतात. सोमवारी त्यांचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होते. आंदोलन करून सांगलीतून रात्री एक वाजता शेवटच्या जत-सांगली गाडीने ते जतमध्ये आले. रात्र झाल्याने त्यांनी विजय माने याच्या मालकीची खासगी प्रवासी वाहतुकीची जीप (एमएच १० के ५१०) भाड्याने ठरवली. बलराज रूपनर यांनी कुटुंबातील सर्वांना जीपमध्ये बसवले आणि ते स्वत: जतमध्ये ठेवलेल्या दुचाकीवरून गाडीपाठोपाठ होते. जीपमध्ये रूपनर कुटुंबातील चौघांसह चालक असे पाचजण होते. मुचंडी ओलांडल्यानंतर बलराज रूपनर गाडीच्या पुढे निघून सिद्धनाथला गेले. सिद्धनाथ फाटा ओलांडून दोनशे मीटर पुढे आल्यावर माने याने जीप बंद पडल्याचे कारण सांगून ती थांबवली. तेथून छायादेवी मुलांसह फाट्याकडे निघाल्या. मात्र त्याचवेळी माने याने छायादेवी यांचे दागिने आणि पैसे लुटण्याच्या हेतूने बेसावध उदयसिंहवर अगोदरच खिशात ठेवलेल्या चाकूने सपासप वार केले. छाती व पोटावर वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर १४ वार झाले होते. त्याचवेळी उदयसिंहची आई छायादेवी, भाऊ सोमेश्वर आणि बहीण ऋतुजा हिच्यावरही मानेने चाकूने वार केले. छायादेवी आणि सोमेश्वर यांची प्रकृती गंभीर आहे. ही झटापट सुमारे दहा मिनिटे सुरू होती. यावेळी ऋतुजाने पुढे गेलेले वडील बलराज रूपनर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ते सिद्धनाथमधून घटनास्थळी आले. त्यांची गाडी आलेली पाहून विजय मानेने वेगाने दरीकोणूरमार्गे पलायन केले. मात्र दरीकोणूर-सोरडी रस्त्यावर पाटील वस्तीजवळ जीप पलटी झाली. रूपनर यांनी रात्री दोन वाजता वस्तीवरील लोकांना उठवले. जतला दूरध्वनी करून नातेवाईकांना बोलावून माने याला रुग्णालयामध्ये दाखल झाले. पोलिसांनी तेथून त्याला अटक केली.छायादेवी यांच्या गळ्यामध्ये दागिने होते. शिवाय त्यांची मुलगीही सोबत होती. मानेने वाईट हेतूने हा प्रकार केला असावा, अशीही चर्चा आहे. पोलिसांनी रात्री घटनास्थळी भेट दिली. जखमींना सांगलीला पाठवून दिले. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे तपास करीत आहेत. (वार्ताहर)शरीराची चाळणविजय मानेने मृत उदयसिंह याच्या छातीवर, पोटावर, मानेवर, पाठीवर, हातावर गंभीर १४ वार केले आहेत. त्याच्या शरीराची चाळण झाली होती. छायादेवी यांचे दागिने घेताना झटापट झाली असावी. यावेळी ऋतुजाने पैशांची पर्स घट्ट पकडून ठेवली होती. आई आणि बहिणीच्या मदतीला आलेला उदयसिंह मध्ये पडल्यावर मानेने वार केले असल्याचा संशय असून, छायादेवी यांच्या जबाबानंतर घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.उपोषण केले नसते तर...प्राथमिक शिक्षक बलराज रूपनर यांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले होते. आंदोलन करून ते उशिरा जतमध्ये आले. वडापच्या गाडीने गावी जाताना मुलाचा खून झाला. उपोषण केले नसते तर जतमध्ये येण्यास त्यांना एवढा उशीर झाला नसता. उपोषणामुळेच हा बळी गेला, अशी चर्चा परिसरात होती.