शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

जयंतरावांपुढे रघुनाथदादांचा फुसका बार!

By admin | Updated: May 22, 2015 00:08 IST

शेतकरी संघटनेचे चौघेच रिंगणात : राजारामबापू कारखाना निवडणुकीचा फार्स; लाखो रुपयांचा चुराडा

अशोक पाटील - इस्लामपूर -माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जयंत पाटील गटाचे १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, तर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी चार उमेदवार उभे करून तोकडे आव्हान दिले आहे. निवडणूक प्रक्रिया म्हणून हा केवळ फार्स ठरणार असल्याने, प्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात राजारामबापू कारखाना हा सक्षम कारखाना म्हणून मानला जातो. या कारखान्याची एक शाखा असून दोन कारखाने चालविण्यास घेतले आहेत. प्रत्येक हंगामात ऊस उत्पादकाला चांगला दर देण्याची कारखान्याची ख्याती आहे. या कारखान्याच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका नेहमीच बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र गत निवडणुकीपासून शेतकरी संघटना एक-दोन जागांसाठी निवडणूक लावत आहे. यावेळीही शेतकरी संघटनेने चार उमेदवार उभे करून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे.नेहमीप्रमाणेच या निवडणुकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व रघुनाथदादा पाटील यांचे शिष्य खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला उमेदवार मिळाले नाहीत. तरीसुध्दा रघुनाथ पाटील यांच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्ची पडणार आहेत.यावेळी ऊस उत्पादकाला जयंत पाटील यांनी एफआरपीपेक्षा कमी दर दिला आहे. याविरोधात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आवाज उठवला नाही, याचीही खंत ऊस उत्पादकांत आहे. राजारामबापू कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ऊस उत्पादकांनी जो कारखाना जास्त दर देईल, त्याच कारखान्याला ऊस घालण्याचे धोरण अवलंबले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांची ताकद तोकडी तर पडली आहेच, त्यातच विरोधकांच्या पाठीशी ऊस उत्पादकही नसल्याचे चित्र आहे. जयंत पाटील नुकतेच जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांची जिल्ह्यावरील पकड मजबूत होऊ लागली आहे. येणाऱ्या सहकारी संस्थांच्या सर्वच निवडणुका ते सहजरित्या पार पाडतील. त्यामुळे या कारखाना निवडणुकीतील रघुनाथदादांचे आव्हान अत्यंत तोकडे ठरणार आहे.‘स्वाभिमानी’ तर रिंंगणातच नाही...राजारामबापू साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका नेहमी बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र मागील निवडणुकीपासून शेतकरी संघटना एक-दोन जागांसाठी निवडणूक लावत आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला उमेदवार मिळाले नाहीत. तरीसुध्दा रघुनाथ पाटील यांच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्ची पडणार आहेत.