शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांपुढे रघुनाथदादांचा फुसका बार!

By admin | Updated: May 22, 2015 00:08 IST

शेतकरी संघटनेचे चौघेच रिंगणात : राजारामबापू कारखाना निवडणुकीचा फार्स; लाखो रुपयांचा चुराडा

अशोक पाटील - इस्लामपूर -माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जयंत पाटील गटाचे १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, तर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी चार उमेदवार उभे करून तोकडे आव्हान दिले आहे. निवडणूक प्रक्रिया म्हणून हा केवळ फार्स ठरणार असल्याने, प्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात राजारामबापू कारखाना हा सक्षम कारखाना म्हणून मानला जातो. या कारखान्याची एक शाखा असून दोन कारखाने चालविण्यास घेतले आहेत. प्रत्येक हंगामात ऊस उत्पादकाला चांगला दर देण्याची कारखान्याची ख्याती आहे. या कारखान्याच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका नेहमीच बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र गत निवडणुकीपासून शेतकरी संघटना एक-दोन जागांसाठी निवडणूक लावत आहे. यावेळीही शेतकरी संघटनेने चार उमेदवार उभे करून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे.नेहमीप्रमाणेच या निवडणुकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व रघुनाथदादा पाटील यांचे शिष्य खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला उमेदवार मिळाले नाहीत. तरीसुध्दा रघुनाथ पाटील यांच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्ची पडणार आहेत.यावेळी ऊस उत्पादकाला जयंत पाटील यांनी एफआरपीपेक्षा कमी दर दिला आहे. याविरोधात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आवाज उठवला नाही, याचीही खंत ऊस उत्पादकांत आहे. राजारामबापू कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ऊस उत्पादकांनी जो कारखाना जास्त दर देईल, त्याच कारखान्याला ऊस घालण्याचे धोरण अवलंबले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांची ताकद तोकडी तर पडली आहेच, त्यातच विरोधकांच्या पाठीशी ऊस उत्पादकही नसल्याचे चित्र आहे. जयंत पाटील नुकतेच जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांची जिल्ह्यावरील पकड मजबूत होऊ लागली आहे. येणाऱ्या सहकारी संस्थांच्या सर्वच निवडणुका ते सहजरित्या पार पाडतील. त्यामुळे या कारखाना निवडणुकीतील रघुनाथदादांचे आव्हान अत्यंत तोकडे ठरणार आहे.‘स्वाभिमानी’ तर रिंंगणातच नाही...राजारामबापू साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका नेहमी बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र मागील निवडणुकीपासून शेतकरी संघटना एक-दोन जागांसाठी निवडणूक लावत आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला उमेदवार मिळाले नाहीत. तरीसुध्दा रघुनाथ पाटील यांच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्ची पडणार आहेत.