शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जयंतरावांपुढे रघुनाथदादांचा फुसका बार!

By admin | Updated: May 22, 2015 00:08 IST

शेतकरी संघटनेचे चौघेच रिंगणात : राजारामबापू कारखाना निवडणुकीचा फार्स; लाखो रुपयांचा चुराडा

अशोक पाटील - इस्लामपूर -माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जयंत पाटील गटाचे १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, तर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी चार उमेदवार उभे करून तोकडे आव्हान दिले आहे. निवडणूक प्रक्रिया म्हणून हा केवळ फार्स ठरणार असल्याने, प्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात राजारामबापू कारखाना हा सक्षम कारखाना म्हणून मानला जातो. या कारखान्याची एक शाखा असून दोन कारखाने चालविण्यास घेतले आहेत. प्रत्येक हंगामात ऊस उत्पादकाला चांगला दर देण्याची कारखान्याची ख्याती आहे. या कारखान्याच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका नेहमीच बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र गत निवडणुकीपासून शेतकरी संघटना एक-दोन जागांसाठी निवडणूक लावत आहे. यावेळीही शेतकरी संघटनेने चार उमेदवार उभे करून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे.नेहमीप्रमाणेच या निवडणुकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व रघुनाथदादा पाटील यांचे शिष्य खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला उमेदवार मिळाले नाहीत. तरीसुध्दा रघुनाथ पाटील यांच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्ची पडणार आहेत.यावेळी ऊस उत्पादकाला जयंत पाटील यांनी एफआरपीपेक्षा कमी दर दिला आहे. याविरोधात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आवाज उठवला नाही, याचीही खंत ऊस उत्पादकांत आहे. राजारामबापू कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ऊस उत्पादकांनी जो कारखाना जास्त दर देईल, त्याच कारखान्याला ऊस घालण्याचे धोरण अवलंबले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांची ताकद तोकडी तर पडली आहेच, त्यातच विरोधकांच्या पाठीशी ऊस उत्पादकही नसल्याचे चित्र आहे. जयंत पाटील नुकतेच जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांची जिल्ह्यावरील पकड मजबूत होऊ लागली आहे. येणाऱ्या सहकारी संस्थांच्या सर्वच निवडणुका ते सहजरित्या पार पाडतील. त्यामुळे या कारखाना निवडणुकीतील रघुनाथदादांचे आव्हान अत्यंत तोकडे ठरणार आहे.‘स्वाभिमानी’ तर रिंंगणातच नाही...राजारामबापू साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका नेहमी बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र मागील निवडणुकीपासून शेतकरी संघटना एक-दोन जागांसाठी निवडणूक लावत आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला उमेदवार मिळाले नाहीत. तरीसुध्दा रघुनाथ पाटील यांच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्ची पडणार आहेत.