शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जयंतरावांचा रस सूडबुद्धीच्या खेळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:40 IST

कासेगाव : सर्वोदय साखर कारखाना उभा करण्यासाठी संभाजी पवारांनी रक्ताचे पाणी केले. वसंतदादांशी संघर्ष करून राजारामबापूंसाठी छातीचा कोट केला. बापूंच्या निधनानंतर जयंत पाटलांना खांद्यावर घेऊन ते सांगलीला नाचत गेले. संभाजी पवारांना कळले नसावे, की हे भुताचे पाय आहेत. पायात पाय अडकवल्यानंतर आता त्यांना कळून चुकले आहे. जयंत पाटलांनी नेहमीच सूडबुद्धीने राजकारण करून आपला स्वार्थ साधण्यात रस घेतला, असा घणाघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.

ठळक मुद्देसदाभाऊ खोत : कासेगाव येथील कार्यक्रमात टीका

कासेगाव : सर्वोदय साखर कारखाना उभा करण्यासाठी संभाजी पवारांनी रक्ताचे पाणी केले. वसंतदादांशी संघर्ष करून राजारामबापूंसाठी छातीचा कोट केला. बापूंच्या निधनानंतर जयंत पाटलांना खांद्यावर घेऊन ते सांगलीला नाचत गेले. संभाजी पवारांना कळले नसावे, की हे भुताचे पाय आहेत. पायात पाय अडकवल्यानंतर आता त्यांना कळून चुकले आहे. जयंत पाटलांनी नेहमीच सूडबुद्धीने राजकारण करून आपला स्वार्थ साधण्यात रस घेतला, असा घणाघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.कासेगाव (ता. वाळवा) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. शिवाजीराव नाईक, विक्रम पाटील, प्रसाद पाटील, बापूसाहेब शिंदे, नेताजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. नाईक यांचा स्थानिक विकास निधी व इतर माध्यमातून कासेगावमध्ये मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम पार पडला.सर्वोदय कारखान्याबाबतीत पृथ्वीराज पवार यांना झालेल्या शिक्षेचा धागा पकडत खोत म्हणाले की, कारखाना हडप करून आज त्यांच्याच मुलावर हे लोक दावा ठोकतात. निदान राजारामबापूंना त्यांनी केलेल्या मदतीची तरी जाण ठेवायची होती. जिल्ह्यात व वाळवा तालुक्यात त्यांनी नेहमीच सूडबुद्धीचे राजकारण केले. नेर्ले येथे नऊ कोटी रुपये मंजूर करून नवी पाणीपुरवठा योजना आणली. मात्र त्यांच्याच सांगण्यावरून यालाही विरोध केला. वाघवाडी येथील सत्तर एकर जागा हडप करण्याचा डाव उधळून याठिकाणी कृषी विद्यालय मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले.इस्लामपूरची सत्ता गेल्या ३१ वर्षांपासून तुमच्याकडे होती. या काळात जेवढा निधी तुम्ही आणला, तेवढा निधी आम्ही गेल्या सव्वा वर्षात आणला. राजकीय द्वेषापोटी माझ्या गावावर काही मंडळी चौकशी लावत आहेत. मी आधीच फाटका आहे. फाटक्याचं काय फाटत नाही, पण धडक्याचं फार फाटतं हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सांगितले.आ. शिवाजीराव नाईक म्हणाले की, कासेगावने मला नेहमीच मदत केली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही सर्व विकासकामे पूर्ण झाली असून अजूनही भरपूर कामे करायची आहेत. वाळवा तालुक्यातील या अठ्ठेचाळीस गावांत एकोणीस कोटींची कामे केली आहेत. प्रसाद पाटील, संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन ग्रा. पं. सदस्यांचा व सर्व ग्रामपंचायत उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास संजय पाटील, दिनकर जाधव, पांडुरंग वाघमोडे, ज्ञानदेव पाटील, राजेंद्र पाटील, विनोद कांबळे, राजाराम पाटसुते, शहाजी मिसाळ उपस्थित होते.महाडिकांना : टोलाआमदार शिवाजीराव नाईक यांनी या मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून तेच पुन्हा एकदा असणार आहेत. त्यामुळे कोणी कितीही जोर-बैठका काढायला सुरुवात केली तरी, त्याचा काही उपयोग होणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला मंत्री खोत यांनी सम्राट महाडिक यांचे नाव न घेता मारला.