शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

जयंतरावांपुढे संघटनांचा ‘फ्लॉप शो’

By admin | Updated: October 9, 2015 00:47 IST

‘एफआरपी’चा वाद पेटला : शेतकरी संघटनेच्या नेत्यांतच मतभिन्नता

अशोक पाटील -इस्लामपूर -एफआरपीचे तुकडे केल्यास उसाचे दांडके दाखवू, कारखान्याचे खासगीकरण होऊ देणार नाही, एफआरपी एकरकमी देण्यासाठी येणारा हंगाम बंद ठेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी साखरसम्राटांना दिला आहे. या तिघा नेत्यांनी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांना ‘टार्गेट’ केले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीच कृती होत नसल्याने, शेतकरी संघटनांचा शो ‘फ्लॉप’ ठरत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखरसम्राटांनी एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. त्याचे श्रेय राजू शेट्टी यांना मिळाले आहे. परंतु राजू शेट्टी यांच्या मतदारसंघात येत असलेल्या व जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मात्र शेट्टी यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी एफआरपी रक्कम न देण्याचाच विडा उचलला आहे. याविरोधात खासदार शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन याविरोधात आवाज उठविला असला तरी, जयंत पाटील यांनी याची कसलीही दखल घेतल्याचे दिसत नाही. नुकत्याच झालेल्या सभेत पाटील यांनी कारखाना कसा तोट्यात आहे, आम्ही एफआरपी का देऊ शकत नाही, याचा पाढाच गिरवला. त्यामुळे सभासदांनीही त्यांच्या भूमिकेला विरोध केला नाही. शेवटी एफआरपी रकमेचा मुद्दा बाजूलाच राहिला. या सभेत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील व्यासपीठावर बसले होते. त्यांनी तर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एफआरपी रक्कम एकरकमी मिळेपर्यंत पुढील हंगाम सुरु करणार नसल्याचे स्पष्ट केले. जयंत पाटील यांनी शक्कल लढवत एफआरपीमधून प्रकल्प निधी ठेवीच्या नावाखाली कपात केली आहे. परिणामी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा शो ‘फ्लॉप’ ठरत चालला आहे.‘विश्वास’ची वाटचाल खासगीकरणाकडेनुकत्याच झालेल्या विश्वास साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सहकारी साखर कारखाने खासगी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. तसा ठरावही त्यांनी केला आहे. या ठरावाला त्यांच्या घरातूनच मोठा विरोध असल्याचे दिसत आहे. मानसिंगराव नाईक हे जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात. यापूर्वीही पाटील यांचे स्रेही असलेल्या कडेगाव तालुक्यातील पृथ्वीराज देशमुख यांचा डोंगराई, शिराळा तालुक्यातील शिवाजीराव देशमुख यांचा निनाई कारखाना खासगी झाला आहे. आता विश्वास कारखाना खासगीकरणाकडे वाटचाल करीत आहे. यामागे जयंत पाटील सूत्रधार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.