शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

जयंतरावांपुढे संघटनांचा ‘फ्लॉप शो’

By admin | Updated: October 9, 2015 00:47 IST

‘एफआरपी’चा वाद पेटला : शेतकरी संघटनेच्या नेत्यांतच मतभिन्नता

अशोक पाटील -इस्लामपूर -एफआरपीचे तुकडे केल्यास उसाचे दांडके दाखवू, कारखान्याचे खासगीकरण होऊ देणार नाही, एफआरपी एकरकमी देण्यासाठी येणारा हंगाम बंद ठेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी साखरसम्राटांना दिला आहे. या तिघा नेत्यांनी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांना ‘टार्गेट’ केले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीच कृती होत नसल्याने, शेतकरी संघटनांचा शो ‘फ्लॉप’ ठरत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखरसम्राटांनी एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. त्याचे श्रेय राजू शेट्टी यांना मिळाले आहे. परंतु राजू शेट्टी यांच्या मतदारसंघात येत असलेल्या व जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मात्र शेट्टी यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी एफआरपी रक्कम न देण्याचाच विडा उचलला आहे. याविरोधात खासदार शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन याविरोधात आवाज उठविला असला तरी, जयंत पाटील यांनी याची कसलीही दखल घेतल्याचे दिसत नाही. नुकत्याच झालेल्या सभेत पाटील यांनी कारखाना कसा तोट्यात आहे, आम्ही एफआरपी का देऊ शकत नाही, याचा पाढाच गिरवला. त्यामुळे सभासदांनीही त्यांच्या भूमिकेला विरोध केला नाही. शेवटी एफआरपी रकमेचा मुद्दा बाजूलाच राहिला. या सभेत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील व्यासपीठावर बसले होते. त्यांनी तर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एफआरपी रक्कम एकरकमी मिळेपर्यंत पुढील हंगाम सुरु करणार नसल्याचे स्पष्ट केले. जयंत पाटील यांनी शक्कल लढवत एफआरपीमधून प्रकल्प निधी ठेवीच्या नावाखाली कपात केली आहे. परिणामी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा शो ‘फ्लॉप’ ठरत चालला आहे.‘विश्वास’ची वाटचाल खासगीकरणाकडेनुकत्याच झालेल्या विश्वास साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सहकारी साखर कारखाने खासगी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. तसा ठरावही त्यांनी केला आहे. या ठरावाला त्यांच्या घरातूनच मोठा विरोध असल्याचे दिसत आहे. मानसिंगराव नाईक हे जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात. यापूर्वीही पाटील यांचे स्रेही असलेल्या कडेगाव तालुक्यातील पृथ्वीराज देशमुख यांचा डोंगराई, शिराळा तालुक्यातील शिवाजीराव देशमुख यांचा निनाई कारखाना खासगी झाला आहे. आता विश्वास कारखाना खासगीकरणाकडे वाटचाल करीत आहे. यामागे जयंत पाटील सूत्रधार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.