शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

खास अभिनंदनातून जयंतरावांची खेळी!

By admin | Updated: January 19, 2015 00:32 IST

नेत्यांच्या त्रिकुटाला टोला : मानसिंगराव नाईक यांच्या पराभवाची सल कायम

अशोक पाटील - इस्लामपूर -वाळव्याचा वाघ (जयंत पाटील) आणि शिराळ्याचा नाग (शिवाजीराव नाईक) यांच्यातील राजकीय संघर्ष नेहमीच चर्चिला जातो. २00९ च्या विधानसभा निवडणुकीत वाघाने नागाला थोपवले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मानसिंगराव नाईक विजयी झाले होते. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वाघाला नागावर मात करता आली नाही. याची सल आजही त्यांच्या मनात आहे. नाईक यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या कासेगाव व नेर्ले जि. प. मतदारसंघातील नेत्यांच्या त्रिकुटाचे नेर्ले येथील कार्यक्रमात जाहीर अभिनंदन करून जयंत पाटील यांनी चांगलाच टोला लगावला. खास अभिनंदनातून त्यांनी नव्या राजकीय खेळीचे संकेतच दिले आहेत. कासेगाव जि. प. मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी ज्येष्ठ नेते जनार्दनकाका पाटील, त्यांचे चिरंजीव जि. प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, वाळवा पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे आणि नेर्ले जि. प. मतदारसंघातील जि. प. चे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांचे वर्चस्व आहे.स्थानिक पातळीवरील निवडणुकीत हे दिग्गज नेते आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यशस्वी होत आहेत. परंतु गेल्या दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कासेगाव आणि नेर्ले जि. प. मतदारसंघात राष्ट्रवादीला पिछाडीवरच रहावे लागले आहे. त्यातच यावेळी मानसिंगराव नाईक यांचाही पराभव झाल्याने ते जयंत पाटील यांच्या मनाला चांगलेच लागले आहे.नेर्ले येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभास हे तिघेही नेते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी, मानसिंगरावांना यंदा थांबावे लागले, याला हे तिघेच कारणीभूत आहेत, यासाठी त्यांचे खास अभिनंदन करतो, असा टोला मारताच कार्यक्रमस्थळी शांतता पसरली.कासेगाव व परिसरात देवराज पाटील यांचे वर्चस्व आहे. यामुळे जयंत पाटील यांनी त्यांना कमी वयात जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती. परंतु त्यांनी या संधीचे सोने केले नाही, अशीच चर्चा आहे. तसेच आपल्याच पक्षातील शेजारील गावातील पदाधिकाऱ्यांना शह देण्यासाठी त्यांनी अंतर्गत खेळ्या केल्याचेही बोलले जात आहे. यामुळेच मानसिंगराव नाईक यांना कासेगाव आणि नेर्ले जि. प. मतदारसंघात मतांची आघाडी घेता आली नाही. हेच जयंतरावांना आजही सलत असून, त्यांनी लगावलेल्या या टोल्यामुळे त्रिकुटावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.