शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांचे राजकीय वारसदार प्रतीकच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:19 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : बापूंच्या निधनाने वाळवा तालुका पोरका झाला आणि राजकीय वारशाचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी थोरले असल्याने भगत पाटील यांच्यावर घराची जबाबदारी आली आणि दुसरे चिरंजीव जयंत पाटील यांच्याकडे अनपेक्षितपणे राजकीय वारसपद आले. यावेळी उलट परिस्थिती आहे थोरल्याचा मान म्हणून स्वत: जयंत पाटील यांनी प्रतीक पाटील ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : बापूंच्या निधनाने वाळवा तालुका पोरका झाला आणि राजकीय वारशाचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी थोरले असल्याने भगत पाटील यांच्यावर घराची जबाबदारी आली आणि दुसरे चिरंजीव जयंत पाटील यांच्याकडे अनपेक्षितपणे राजकीय वारसपद आले. यावेळी उलट परिस्थिती आहे थोरल्याचा मान म्हणून स्वत: जयंत पाटील यांनी प्रतीक पाटील यांनाच राजकीय वारस म्हणून अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे. आगामी विधानसभेला आ. पाटील यांच्या प्रचाराची धुरा तेच सांभाळणार आहेत.१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत राजारामबापू पाटील यांच्या प्रचाराची यंत्रणा ज्येष्ठ नेत्यांकडे होती. त्यावेळी थोरले चिरंजीव भगत पाटील यांची प्रचाराच्या माध्यमातून तात्पुरती राजकीय एन्ट्री झाली होती. त्यावेळी भगत पाटील हेच राजारामबापूंचे राजकीय वारसदार म्हणून गणले जाऊ लागले. परंतु राजारामबापू पाटील यांच्या अचानक निधनाने त्यांच्या पत्नी कुसूमताई व थोरले चिरंजीव भगत यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून जयंत पाटील यांना वाळवा साखर कारखान्याची जबाबदारी स्वीकारावी लागली. याला तालुक्यातील काही नेत्यांनी अंतर्गत विरोध केला होता. परंतु कोणाचीही डाळ शिजली नाही. तेथून पुढे जयंत पाटील यांनी आपला राजकीय आलेख कायम चढताच ठेवला.जयंतरावांनी राजकारणात चढ- उतार पाहिले. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत मतदार संघ आणि राजारामबापू उद्योग समूहातील निर्णय घेणारे नेतृत्व आजही तयार झालेले नाही. राष्ट्रवादीने पूर्ण राज्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर सोपविल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वत:च्या मतदार संघाबरोबरच पूर्ण महाराष्ट्रात फिरावे लागणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत इस्लामपूर मतदार संघातील प्रचाराची सर्व धुरा प्रतीक पाटील सांभाळणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे प्रतीक पाटील यांनी मतदार संघात सक्रिय होऊन आपला संपर्क वाढवला आहे.निष्ठावंतांना न्याय देण्याची भूमिका१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत राजारामबापू पाटील यांच्याच कार्यकर्त्यांनी गद्दारी केली. तुम्हीच निवडून येणार, असे म्हणत बापूंना अंधारात ठेवले. त्यामुळे निवडणुकीत घात झाला. अशाच पध्दतीने आमदार जयंत पाटील यांनाही अनुभव आला आहे. सत्ता गेल्यानंतर अनेकांनी भाजप गाठली. आता पुन्हा प्रदेशाध्यक्षपद आल्यानंतर तेच पुन्हा राष्ट्रवादीकडे वळू लागले आहेत. बापू आणि जयंत पाटील यांचा अनुभव पाहता, प्रतीक पाटील यांनीही कार्यकर्त्यांना जवळ करताना खऱ्या निष्ठावंतांना न्याय द्यावा.