शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

जयंतरावांचे राजकीय वारसदार प्रतीकच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:19 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : बापूंच्या निधनाने वाळवा तालुका पोरका झाला आणि राजकीय वारशाचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी थोरले असल्याने भगत पाटील यांच्यावर घराची जबाबदारी आली आणि दुसरे चिरंजीव जयंत पाटील यांच्याकडे अनपेक्षितपणे राजकीय वारसपद आले. यावेळी उलट परिस्थिती आहे थोरल्याचा मान म्हणून स्वत: जयंत पाटील यांनी प्रतीक पाटील ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : बापूंच्या निधनाने वाळवा तालुका पोरका झाला आणि राजकीय वारशाचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी थोरले असल्याने भगत पाटील यांच्यावर घराची जबाबदारी आली आणि दुसरे चिरंजीव जयंत पाटील यांच्याकडे अनपेक्षितपणे राजकीय वारसपद आले. यावेळी उलट परिस्थिती आहे थोरल्याचा मान म्हणून स्वत: जयंत पाटील यांनी प्रतीक पाटील यांनाच राजकीय वारस म्हणून अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे. आगामी विधानसभेला आ. पाटील यांच्या प्रचाराची धुरा तेच सांभाळणार आहेत.१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत राजारामबापू पाटील यांच्या प्रचाराची यंत्रणा ज्येष्ठ नेत्यांकडे होती. त्यावेळी थोरले चिरंजीव भगत पाटील यांची प्रचाराच्या माध्यमातून तात्पुरती राजकीय एन्ट्री झाली होती. त्यावेळी भगत पाटील हेच राजारामबापूंचे राजकीय वारसदार म्हणून गणले जाऊ लागले. परंतु राजारामबापू पाटील यांच्या अचानक निधनाने त्यांच्या पत्नी कुसूमताई व थोरले चिरंजीव भगत यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून जयंत पाटील यांना वाळवा साखर कारखान्याची जबाबदारी स्वीकारावी लागली. याला तालुक्यातील काही नेत्यांनी अंतर्गत विरोध केला होता. परंतु कोणाचीही डाळ शिजली नाही. तेथून पुढे जयंत पाटील यांनी आपला राजकीय आलेख कायम चढताच ठेवला.जयंतरावांनी राजकारणात चढ- उतार पाहिले. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत मतदार संघ आणि राजारामबापू उद्योग समूहातील निर्णय घेणारे नेतृत्व आजही तयार झालेले नाही. राष्ट्रवादीने पूर्ण राज्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर सोपविल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वत:च्या मतदार संघाबरोबरच पूर्ण महाराष्ट्रात फिरावे लागणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत इस्लामपूर मतदार संघातील प्रचाराची सर्व धुरा प्रतीक पाटील सांभाळणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे प्रतीक पाटील यांनी मतदार संघात सक्रिय होऊन आपला संपर्क वाढवला आहे.निष्ठावंतांना न्याय देण्याची भूमिका१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत राजारामबापू पाटील यांच्याच कार्यकर्त्यांनी गद्दारी केली. तुम्हीच निवडून येणार, असे म्हणत बापूंना अंधारात ठेवले. त्यामुळे निवडणुकीत घात झाला. अशाच पध्दतीने आमदार जयंत पाटील यांनाही अनुभव आला आहे. सत्ता गेल्यानंतर अनेकांनी भाजप गाठली. आता पुन्हा प्रदेशाध्यक्षपद आल्यानंतर तेच पुन्हा राष्ट्रवादीकडे वळू लागले आहेत. बापू आणि जयंत पाटील यांचा अनुभव पाहता, प्रतीक पाटील यांनीही कार्यकर्त्यांना जवळ करताना खऱ्या निष्ठावंतांना न्याय द्यावा.