शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

जयंतरावांची एकाधिकारशाही मोडीत काढली : सदाभाऊ खोत

By admin | Updated: February 23, 2017 19:18 IST

राजू शेट्टींना शुभेच्छाच!

सांगली : वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाहीचे राजकारण मोडीत काढण्यासाठी रयत विकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या ताकदीने निवडणूक लढविली. आघाडीने जिल्हा परिषदेच्या वाळवा तालुक्यातील चार व कवठेपिरानची एक अशा पाच जागा, तर पंचायत समितीच्या आठ जागा जिंकल्या. बागणीमध्ये सागर खोत यांचा केवळ १२० मतांनी निसटता पराभव झाला. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. ते म्हणाले की, जयंत पाटील यांनी बागणीची जागा प्रतिष्ठेची केली होती. मात्र तरीही तेथे राष्ट्रवादीचा पराभव झाला. राष्ट्रवादीचा बंडखोर उमेदवार निवडून आला. जयंत पाटील यांना माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव शिंदे यांचा ठरवून पराभव करायचा होता. बागणीमध्ये त्यांनी केवळ शिंदे गटाची सहानुभूती मिळवण्यासाठीच नाटकी आंदोलन केले होते. राष्ट्रवादीने बागणीमध्ये प्रामाणिकपणे काम केले असते तर, बंडखोर उमेदवार निवडून आला नसता. मात्र जयंत पाटील गटाने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करुन पुन्हा कूटनीतीचा प्रत्यय दिला. जयंत पाटील यांना कुठलाही पराभव सहन होत नाही, त्यामुळेच वाळव्यात आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यावर गोळीबार केला गेला. माझा मुलगा सागर खोत याने दुसऱ्या मतदारसंघात जाऊनही चांगली लढत दिली. त्याचा निसटता पराभव झाला. सांगली जिल्हा परिषदेत भाजप, रयत विकास आघाडी आणि मित्र पक्ष यांची सत्ता स्थापन करणार आहोत.राजू शेट्टींना शुभेच्छाच! खासदार राजू शेट्टी यांनी आयुष्यभर तत्त्वाचा मुलामा देऊन राजकारण केले. या निवडणुकीतही त्यांनी तत्त्वाचे राजकारण केले. अशाप्रकारच्या भविष्यकालीन राजकारणाच्या वाटचालीला खासदार शेट्टी यांना माझ्या शुभेच्छाच आहेत, अशी खोचक प्रतिक्रियाही खोत यांनी दिली.