शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

जयंतरावांची एकाधिकारशाही मोडीत काढली : सदाभाऊ खोत

By admin | Updated: February 23, 2017 19:18 IST

राजू शेट्टींना शुभेच्छाच!

सांगली : वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाहीचे राजकारण मोडीत काढण्यासाठी रयत विकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या ताकदीने निवडणूक लढविली. आघाडीने जिल्हा परिषदेच्या वाळवा तालुक्यातील चार व कवठेपिरानची एक अशा पाच जागा, तर पंचायत समितीच्या आठ जागा जिंकल्या. बागणीमध्ये सागर खोत यांचा केवळ १२० मतांनी निसटता पराभव झाला. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. ते म्हणाले की, जयंत पाटील यांनी बागणीची जागा प्रतिष्ठेची केली होती. मात्र तरीही तेथे राष्ट्रवादीचा पराभव झाला. राष्ट्रवादीचा बंडखोर उमेदवार निवडून आला. जयंत पाटील यांना माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव शिंदे यांचा ठरवून पराभव करायचा होता. बागणीमध्ये त्यांनी केवळ शिंदे गटाची सहानुभूती मिळवण्यासाठीच नाटकी आंदोलन केले होते. राष्ट्रवादीने बागणीमध्ये प्रामाणिकपणे काम केले असते तर, बंडखोर उमेदवार निवडून आला नसता. मात्र जयंत पाटील गटाने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करुन पुन्हा कूटनीतीचा प्रत्यय दिला. जयंत पाटील यांना कुठलाही पराभव सहन होत नाही, त्यामुळेच वाळव्यात आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यावर गोळीबार केला गेला. माझा मुलगा सागर खोत याने दुसऱ्या मतदारसंघात जाऊनही चांगली लढत दिली. त्याचा निसटता पराभव झाला. सांगली जिल्हा परिषदेत भाजप, रयत विकास आघाडी आणि मित्र पक्ष यांची सत्ता स्थापन करणार आहोत.राजू शेट्टींना शुभेच्छाच! खासदार राजू शेट्टी यांनी आयुष्यभर तत्त्वाचा मुलामा देऊन राजकारण केले. या निवडणुकीतही त्यांनी तत्त्वाचे राजकारण केले. अशाप्रकारच्या भविष्यकालीन राजकारणाच्या वाटचालीला खासदार शेट्टी यांना माझ्या शुभेच्छाच आहेत, अशी खोचक प्रतिक्रियाही खोत यांनी दिली.