शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

जयंतरावांची एकाधिकारशाही मोडीत काढली : सदाभाऊ खोत

By admin | Updated: February 23, 2017 19:18 IST

राजू शेट्टींना शुभेच्छाच!

सांगली : वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाहीचे राजकारण मोडीत काढण्यासाठी रयत विकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या ताकदीने निवडणूक लढविली. आघाडीने जिल्हा परिषदेच्या वाळवा तालुक्यातील चार व कवठेपिरानची एक अशा पाच जागा, तर पंचायत समितीच्या आठ जागा जिंकल्या. बागणीमध्ये सागर खोत यांचा केवळ १२० मतांनी निसटता पराभव झाला. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. ते म्हणाले की, जयंत पाटील यांनी बागणीची जागा प्रतिष्ठेची केली होती. मात्र तरीही तेथे राष्ट्रवादीचा पराभव झाला. राष्ट्रवादीचा बंडखोर उमेदवार निवडून आला. जयंत पाटील यांना माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव शिंदे यांचा ठरवून पराभव करायचा होता. बागणीमध्ये त्यांनी केवळ शिंदे गटाची सहानुभूती मिळवण्यासाठीच नाटकी आंदोलन केले होते. राष्ट्रवादीने बागणीमध्ये प्रामाणिकपणे काम केले असते तर, बंडखोर उमेदवार निवडून आला नसता. मात्र जयंत पाटील गटाने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करुन पुन्हा कूटनीतीचा प्रत्यय दिला. जयंत पाटील यांना कुठलाही पराभव सहन होत नाही, त्यामुळेच वाळव्यात आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यावर गोळीबार केला गेला. माझा मुलगा सागर खोत याने दुसऱ्या मतदारसंघात जाऊनही चांगली लढत दिली. त्याचा निसटता पराभव झाला. सांगली जिल्हा परिषदेत भाजप, रयत विकास आघाडी आणि मित्र पक्ष यांची सत्ता स्थापन करणार आहोत.राजू शेट्टींना शुभेच्छाच! खासदार राजू शेट्टी यांनी आयुष्यभर तत्त्वाचा मुलामा देऊन राजकारण केले. या निवडणुकीतही त्यांनी तत्त्वाचे राजकारण केले. अशाप्रकारच्या भविष्यकालीन राजकारणाच्या वाटचालीला खासदार शेट्टी यांना माझ्या शुभेच्छाच आहेत, अशी खोचक प्रतिक्रियाही खोत यांनी दिली.