शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीसाठी जयंतरावांची नजर घोरपडेंवर

By admin | Updated: May 26, 2015 00:53 IST

जूनमध्ये निवडणुका : मदनभाऊंना घेण्यास अजितराव घोरपडेंचा विरोध कायम

अशोक डोंबाळे - सांगली -जिल्हा बँकेत निवडणुकीपासून दूर राहिलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बरोबर घेण्यासाठी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी गळ टाकला आहे. परंतु, घोरपडे यांनी बाजार समिती निवडणुकीतही माजी मंत्री मदन पाटील यांना सोबत घेण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे जयंत पाटील यांची कोंडी झाली असून, घोरपडे की मदनभाऊ या कात्रीत ते सापडले आहेत. सर्वाधिक मोठी आर्थिक उलाढाल असणारी संस्था म्हणून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत हे तीन तालुके बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येतात. मागील निवडणूक त्रिभाजनाच्या मुद्द्यावर झाली. मदन पाटील विरूध्द खासदार संजयकाका पाटील, अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप एकत्रित येत निवडणूक लढविली. संजयकाका, घोरपडे, जगतापांच्या पाठीशी जयंत पाटील यांचीच छुपी ताकद होती. घोरपडे, जगतापांनी त्रिभाजनाचे तोटे सभासदांपर्यंत पोहोचवित निवडणुकीत यश मिळविले होते. त्यानंतर तीनही नेते पाच वर्षे एकत्र होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा, विधानसभा निवडणुकाही लढविल्या. परंतु, विधानसभा निवडणुकीत घोरपडेंना यश मिळाले नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी मदन पाटील यांच्याशी युती करीत शेतकरी सहकारी पॅनेल तयार केले. घोरपडेंचा मदनभाऊंना विरोध असल्याने ते जयंतरावांच्या पॅनेलपासून दूर राहिले. यातूनच घोरपडे आणि दुष्काळी फोरमच्या अन्य नेत्यांमध्येही काही प्रमाणात दरी निर्माण झाली आहे. घोरपडेंची नाराजी बाजार समितीच्या निवडणुकीत अडचणीची ठरू शकते. म्हणूनच त्यांना सोबत घेण्याची तयारी जयंत पाटील यांनी चालविली आहे. त्यादृष्टीने त्यांच्याशी बोलणी सुरु झाली आहेत. पण, घोरपडे यांनी पूर्वीप्रमाणेच, मदनभाऊ असतील तर मी तुमच्याबरोबर नाही, असे सांगून, बाजार समितीच्या भल्यासाठी तीनही तालुक्यातील सभासदांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.घोरपडेंची जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नाराजी दूर करून त्यांना बाजार समितीत बरोबर घेण्यासाठी दुष्काळी फोरमचे नेतेही प्रयत्न करीत आहेत. त्यादृष्टीने चर्चा चालू झाल्या आहेत. पण, घोरपडे यांच्या मनाला जिल्हा बँकेतील घडामोडी चांगल्याच बोचल्या आहेत. यातूनच त्यांनी दुष्काळी फोरमच्या नेत्यांपासून दुरावा घेतल्याचे दिसत आहे. खासदार संजयकाका पाटील यांचेही त्यांच्याशी फारसे सूत जमत नाही. या पार्श्वभूमीवर बाजार समिती निवडणुकीत नक्की चित्र काय असणार, याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली आहे.१८ जूनपासून निवडणुकीचा कार्यक्रमसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतदार यादी दि. ४ जूनरोजी निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. १८ जूनपासून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित एक आणि भाजप व राष्ट्रवादी असे एकत्र येऊन एक पॅनेल होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत माजी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.मदनभाऊ भाजप, राष्ट्रवादीप्रणित पॅनेलकडे राहिल्यास अजितराव घोरपडे कोणती भूमिका घेणार, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्यापध्दतीने पॅनेल तयार केले होते, तशाच पध्दतीच्या लोकांना बरोबर घेऊन जयंत पाटील पॅनेल तयार करणार असतील, तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून वेगळा विचार करावा लागणार आहे. येत्या चार दिवसांत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार आहे. बाजार समिती शेतकऱ्यांची असून, ती त्यांच्यासाठीच राहिली पाहिजे, त्यादृष्टीने यापूर्वीही प्रयत्न केले. म्हणूनच जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यांचा विकास झाला आहे.- अजितराव घोरपडे, माजी मंत्री.