शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

जयंतरावांची इस्लामपूर पालिकेवरील पकड सैल

By admin | Updated: November 23, 2014 23:56 IST

तडजोडीचे राजकारण : अंतर्गत गटबाजीमुळे शहरातील विकास कामे झाली ठप्प

अशोक पाटील- इस्लामपूर पालिकेत माजी मंत्री जयंत पाटील यांची गेली २५ वर्षे सत्ता आहे. शहरातील विविध विकास कामांसाठी पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुनही, सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत मतभेदामुळे झालेल्या विकास कामांना भकासपणा आला आहे. यावर जयंत पाटील यांनी पालिकेत जाऊन वेळोवेळी खडे बोल सुनावले आहेत. तरीसुध्दा सत्ताधाऱ्यांचा कारभार ‘ये रे माझ्या मागल्या...’ असाच चालू आहे. यावरुनच जयंत पाटील यांची पालिकेवरील पकड सैल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या पालिकेत पक्षप्रतोद विजय पाटील गटाची सरशी असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. त्यामुळे नगराध्यक्ष दालनात विजय पाटील यांचे समर्थक पडून असतात. ते समाजसेवेचा आव आणत, उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्यावरच कुरघोड्या करताना दिसतात. त्यामुळेच कोरे सध्या अस्वस्थ आहेत. काही दिवसात ते आपल्या पदाचा राजीनामाही देतील, अशीच चर्चा आहे.संजय कोरे यांना एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांची साथ असली तरी, जयंत पाटील यांच्यासमोर मात्र विजय पाटील आणि खंडेराव जाधव तडजोडीचे राजकारण करीत आहेत. त्याचाच फटका कोरे यांना बसला आहे. सध्या पालिकेत विजय पाटील आणि खंडेराव जाधव यांची चलती आहे. डांगे गटाचे अ‍ॅड. चिमण डांगे यांची एन्ट्री झाली की दोन भाऊ एकदिलाचे असल्याचे दाखवतात. त्यानंतर भाऊ—नानांच्या कुरघोड्यांचा उद्योग सुरु होतो. त्यामुळे याचा फटका पालिका प्रशासनासह विकास कामांना बसल्याची चर्चा आहे.जयंत पाटील यांची शिस्त व नियोजनाला तोड नसल्याचे मानले जाते. इस्लामपूर शहराचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे स्वप्न सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धुळीस मिळवले आहे. तसेच मंत्रीपद नसल्याने पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही बेफाम झाले आहेत. जयंत पाटील यांचा वचक असता, तर नगराध्यक्षांच्या दालनाचा खेळखंडोबा झाला नसता, हे मात्र निश्चित.पालिकेतील सर्वच नगरसेवक माझेच आहेत. माझा कोणताही वेगळा गट नाही. संजय कोरे हे चांगले नगरसेवक आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल आपण काहीही बोलणार नाही. पालिकेत गटांतर्गत राजकारण होत नाही.- विजय पाटील, पक्षप्रतोद.सत्ताधारी शहरातील रस्ते करण्यासाठी सरसावले आहेत. परंतु त्यांची भुयारी गटारीची घोषणा कुठे गेली? चौक सुशोभिकरण, नियोजित विकास आराखड्याचे तीनतेरा वाजले आहेत.- बाबासाहेब सूर्यवंशी, माजी नगरसेवक.संजय कोरे यांच्या भूमिकेबद्दल कोणतेही मत नाही. ते माझे मित्र आहेत. पालिकेतील कारभार स्वच्छ असावा, अशीच आमची भूमिका आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास केला जात आहे.- खंडेराव जाधव, सभापती, पाणीपुरवठा.