शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

जयंतरावांची इस्लामपूर पालिकेवरील पकड सैल

By admin | Updated: November 23, 2014 23:56 IST

तडजोडीचे राजकारण : अंतर्गत गटबाजीमुळे शहरातील विकास कामे झाली ठप्प

अशोक पाटील- इस्लामपूर पालिकेत माजी मंत्री जयंत पाटील यांची गेली २५ वर्षे सत्ता आहे. शहरातील विविध विकास कामांसाठी पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुनही, सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत मतभेदामुळे झालेल्या विकास कामांना भकासपणा आला आहे. यावर जयंत पाटील यांनी पालिकेत जाऊन वेळोवेळी खडे बोल सुनावले आहेत. तरीसुध्दा सत्ताधाऱ्यांचा कारभार ‘ये रे माझ्या मागल्या...’ असाच चालू आहे. यावरुनच जयंत पाटील यांची पालिकेवरील पकड सैल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या पालिकेत पक्षप्रतोद विजय पाटील गटाची सरशी असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. त्यामुळे नगराध्यक्ष दालनात विजय पाटील यांचे समर्थक पडून असतात. ते समाजसेवेचा आव आणत, उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्यावरच कुरघोड्या करताना दिसतात. त्यामुळेच कोरे सध्या अस्वस्थ आहेत. काही दिवसात ते आपल्या पदाचा राजीनामाही देतील, अशीच चर्चा आहे.संजय कोरे यांना एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांची साथ असली तरी, जयंत पाटील यांच्यासमोर मात्र विजय पाटील आणि खंडेराव जाधव तडजोडीचे राजकारण करीत आहेत. त्याचाच फटका कोरे यांना बसला आहे. सध्या पालिकेत विजय पाटील आणि खंडेराव जाधव यांची चलती आहे. डांगे गटाचे अ‍ॅड. चिमण डांगे यांची एन्ट्री झाली की दोन भाऊ एकदिलाचे असल्याचे दाखवतात. त्यानंतर भाऊ—नानांच्या कुरघोड्यांचा उद्योग सुरु होतो. त्यामुळे याचा फटका पालिका प्रशासनासह विकास कामांना बसल्याची चर्चा आहे.जयंत पाटील यांची शिस्त व नियोजनाला तोड नसल्याचे मानले जाते. इस्लामपूर शहराचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे स्वप्न सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धुळीस मिळवले आहे. तसेच मंत्रीपद नसल्याने पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही बेफाम झाले आहेत. जयंत पाटील यांचा वचक असता, तर नगराध्यक्षांच्या दालनाचा खेळखंडोबा झाला नसता, हे मात्र निश्चित.पालिकेतील सर्वच नगरसेवक माझेच आहेत. माझा कोणताही वेगळा गट नाही. संजय कोरे हे चांगले नगरसेवक आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल आपण काहीही बोलणार नाही. पालिकेत गटांतर्गत राजकारण होत नाही.- विजय पाटील, पक्षप्रतोद.सत्ताधारी शहरातील रस्ते करण्यासाठी सरसावले आहेत. परंतु त्यांची भुयारी गटारीची घोषणा कुठे गेली? चौक सुशोभिकरण, नियोजित विकास आराखड्याचे तीनतेरा वाजले आहेत.- बाबासाहेब सूर्यवंशी, माजी नगरसेवक.संजय कोरे यांच्या भूमिकेबद्दल कोणतेही मत नाही. ते माझे मित्र आहेत. पालिकेतील कारभार स्वच्छ असावा, अशीच आमची भूमिका आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास केला जात आहे.- खंडेराव जाधव, सभापती, पाणीपुरवठा.