शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

जयंतरावांची इस्लामपूर पालिकेवरील पकड सैल

By admin | Updated: November 23, 2014 23:56 IST

तडजोडीचे राजकारण : अंतर्गत गटबाजीमुळे शहरातील विकास कामे झाली ठप्प

अशोक पाटील- इस्लामपूर पालिकेत माजी मंत्री जयंत पाटील यांची गेली २५ वर्षे सत्ता आहे. शहरातील विविध विकास कामांसाठी पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुनही, सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत मतभेदामुळे झालेल्या विकास कामांना भकासपणा आला आहे. यावर जयंत पाटील यांनी पालिकेत जाऊन वेळोवेळी खडे बोल सुनावले आहेत. तरीसुध्दा सत्ताधाऱ्यांचा कारभार ‘ये रे माझ्या मागल्या...’ असाच चालू आहे. यावरुनच जयंत पाटील यांची पालिकेवरील पकड सैल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या पालिकेत पक्षप्रतोद विजय पाटील गटाची सरशी असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. त्यामुळे नगराध्यक्ष दालनात विजय पाटील यांचे समर्थक पडून असतात. ते समाजसेवेचा आव आणत, उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्यावरच कुरघोड्या करताना दिसतात. त्यामुळेच कोरे सध्या अस्वस्थ आहेत. काही दिवसात ते आपल्या पदाचा राजीनामाही देतील, अशीच चर्चा आहे.संजय कोरे यांना एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांची साथ असली तरी, जयंत पाटील यांच्यासमोर मात्र विजय पाटील आणि खंडेराव जाधव तडजोडीचे राजकारण करीत आहेत. त्याचाच फटका कोरे यांना बसला आहे. सध्या पालिकेत विजय पाटील आणि खंडेराव जाधव यांची चलती आहे. डांगे गटाचे अ‍ॅड. चिमण डांगे यांची एन्ट्री झाली की दोन भाऊ एकदिलाचे असल्याचे दाखवतात. त्यानंतर भाऊ—नानांच्या कुरघोड्यांचा उद्योग सुरु होतो. त्यामुळे याचा फटका पालिका प्रशासनासह विकास कामांना बसल्याची चर्चा आहे.जयंत पाटील यांची शिस्त व नियोजनाला तोड नसल्याचे मानले जाते. इस्लामपूर शहराचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे स्वप्न सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धुळीस मिळवले आहे. तसेच मंत्रीपद नसल्याने पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही बेफाम झाले आहेत. जयंत पाटील यांचा वचक असता, तर नगराध्यक्षांच्या दालनाचा खेळखंडोबा झाला नसता, हे मात्र निश्चित.पालिकेतील सर्वच नगरसेवक माझेच आहेत. माझा कोणताही वेगळा गट नाही. संजय कोरे हे चांगले नगरसेवक आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल आपण काहीही बोलणार नाही. पालिकेत गटांतर्गत राजकारण होत नाही.- विजय पाटील, पक्षप्रतोद.सत्ताधारी शहरातील रस्ते करण्यासाठी सरसावले आहेत. परंतु त्यांची भुयारी गटारीची घोषणा कुठे गेली? चौक सुशोभिकरण, नियोजित विकास आराखड्याचे तीनतेरा वाजले आहेत.- बाबासाहेब सूर्यवंशी, माजी नगरसेवक.संजय कोरे यांच्या भूमिकेबद्दल कोणतेही मत नाही. ते माझे मित्र आहेत. पालिकेतील कारभार स्वच्छ असावा, अशीच आमची भूमिका आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास केला जात आहे.- खंडेराव जाधव, सभापती, पाणीपुरवठा.