शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जयंतरावांना चांगल्या कल्पना सुचतात!

By admin | Updated: April 23, 2016 01:02 IST

सदाभाऊ खोत : राज्य लोकसेवा आयोग परीक्षार्थी वयोमर्यादा वाढीचा श्रेयवाद

अशोक पाटील--इस्लामपूर --राज्य लोकसेवा आयोगााच्या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्याचे श्रेय माजी मंत्री, आमदार जयंत पाटील लाटत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला. १५ वर्षाहून अधिक काळ सत्तेत असताना जयंतरावांना हे का सुचले नाही? आता विरोधी गटनेते झाल्यानंतर दुसऱ्यांचे श्रेय लाटण्याच्या कल्पना सुचू लागल्याचा उपहासात्मक टोलाही त्यांनी मारला.खोत म्हणाले की, जुलै २0१५ मध्ये सांगली येथे विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी खुल्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्याविषयी निवेदन दिले होते. या निवेदनावर ३ सप्टेंबर रोजी पुणे येथील विश्रामगृहावर राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत बसणारे विद्यार्थी आणि खासदार राजू शेट्टी, रवींद्र तुपकर, अ‍ॅड. योगेश पांडे यांच्यासमवेत बैठक झाली. त्यावेळी या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे पांडुरंग शिंदे, किरण निभोरे, जितू आडलेकर, सागर झाडे यांच्यासह ५0 विद्यार्थी उपस्थित होते.या बैठकीनंतर ११ सप्टेंबर २0१५ रोजी पुणे येथे विद्यार्थी हक्क परिषद घेण्याचा निर्णय झाला. या परिषदेचे नियोजन करण्यासाठी आमदार विनायक मेटे, आमदार महादेव जानकर, खासदार रामदास आठवले, सदाभाऊ खोत यांची नागपूर येथेही बैठक झाली. त्यानंतर ११ सप्टेंबर २0१५ रोजी पुणे येथील बालगंधर्व मंदिरात विद्यार्थी हक्क परिषद घेण्यात आली. गिरीश बापट, खासदार राजू शेट्टी, आमदार विनायक मेटे, अविनाश महातेकर आदी नेत्यांच्या उपस्थितीत ही परिषद झाली. त्यावेळी गिरीश बापट यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते.याचदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या खुल्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवू, असे आश्वासन दिले होते. तसे लेखी पत्रही खा. शेट्टी यांना दिले होते. ३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत बैठक झाली. येथे ठोस असा निर्णय न झाल्याने ७ नोव्हेंबरला स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने शनिवार वाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चानंतर ३१ जानेवारी २0१६ रोजी वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. याची माहिती मी स्वत: पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दिली होती. आता तीन महिन्यांनी आमदार जयंत पाटील यांना जाग आली असून, आपणच सरकारकडे पाठपुरावा करुन वयोमर्यादेचा प्रश्न मार्गी लावल्याचा कांगावा त्यांच्याकडून सुरू आहे. जयंतरावांना विरोधी बाकावर बसल्यानंतरच अशा चांगल्या कल्पना सुचतात, हे या घटनेवरुन स्पष्ट झाल्याचेही खोत यांनी सांगितले.सत्काराचे नियोजन...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढविल्याने उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे इस्लामपूर शहरात त्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार घेण्याचे नियोजन सुरु असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.