शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

आष्ट्यात जयंतराव गट अस्वस्थ

By admin | Updated: August 23, 2016 00:32 IST

नगरपालिका निवडणुकीचे वारे : विलासराव शिंदे गटाकडून डावलले जात असल्याची भावना

सुरेंद्र शिराळकर -- आष्टा नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. आष्टा नगरपरिषदेत माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील गटाला डावलले जात असल्याची कार्यकर्त्यांत भावना आहे. माजी आ. विलासराव शिंदे गट व आ. जयंत पाटील गट सत्तेत एकत्र असले तरी, पाटील गटातील अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवक पद खुणावू लागल्याने, शिंदे गटाविरुध्द आ. पाटील गट वेगळी भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आष्टा नगरपरिषदेत विलासराव शिंदे गटाची निर्विवाद सत्ता आहे. नव्वदीच्या दशकातील शिंदे-पाटील संघर्षानंतर दोन्ही गटाचे नेते एकत्र आले आहेत. बेरजेचे राजकारण करीत आष्टा पालिका विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली जात आहे. मात्र दोन्ही नेते एकत्र असताना आष्टा नगरपरिषदेत जयंत पाटील गटाला डावलले जात असल्याची भावना असून येणारी पालिका निवडणूक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. आ. जयंत पाटील यांनी विजय मोरे, सौ. नीता किरण काळोखे, जभिलाबी आब्बास लतीफ, सौ. संगीता सुनील वारे, सौ. पद्मश्री प्रशांत मालगावे, आनंदराव ढोले यांना नगरसेवक म्हणून पाच वर्षासाठी संधी दिली आहे, तर आनंदराव कुशिरे, मुकुंद इंगळे, ताहेर मुन्शी, संदीप तांबवेकर, के. ए. माने यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली आहे. जयंत पाटील यांनी राजारामबापू कारखाना संचालक म्हणून विराज शिंदे, माणिक शेळके यांना संधी दिली आहे, तर सौ. उज्ज्वला विजय पाटील यांना राजारामबापू दूध संघ, सौ. अनिता अशोक वग्याणी यांना राजारामबापू बँकेत संचालक म्हणून संधी दिली आहे. बबन थोटे यांना शेतकरी विणकरी सूतगिरणीचे अध्यक्षपद दिले आहे. ‘सर्वोदय’चे संचालकपद अशोक वग्याणी, रघुनाथ जाधव यांना दिले आहे. आष्टा शहरातील बँक, पतसंस्था, सोसायट्या, पाणी पुरवठा संस्थांवर जयंत पाटील गटाचे वर्चस्व कायम आहे.अनेक युवा नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत, तर अनेकांची उमेदीची वर्षे राजकारणात जाऊन सुध्दा त्यांना संधी मिळाली नसल्याने, आ. जयंत पाटील स्वत:च्या गटातील कार्यकर्त्यांना संधी देत वेगळी चूल मांडणार, की पुन्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना तहासाठी पाठवून बेरजेचे राजकारण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेत्यांचे दुर्लक्ष : प्रभाग समित्या रखडल्याआ. जयंत पाटील व माजी आमदार विलासराव शिंदे जिल्हा व राज्याच्या राजकारणात एकत्र असल्याने आष्टा पालिकेत आ. पाटील लक्ष देत नाहीत. अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र लढण्यासाठी नेत्याचा आशीर्वादच नसल्याने अनेक कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनिल पाटील आहेत. मात्र दोन्ही गटातील मतभेदामुळे मागील अनेक वर्षापासून त्यांना प्रभाग समित्याही स्थापना करता आलेल्या नाहीत.