शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जयंतरावांच्या चिरंजीवांची सहकारातून राजकारणाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यात ऊस पिकासाठी मुबलक पाणी आहे. तेथे ठिबक सिंचन योजना राबवून ऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात ऊस पिकासाठी मुबलक पाणी आहे. तेथे ठिबक सिंचन योजना राबवून ऊस उत्पन्नवाढीचा प्रयत्न जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील करीत आहेत. या संपर्कातून ते राजारामबापू पाटील सहकारी कारखान्याची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.

राजारामबापू यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांनी थेट राजकारणात प्रवेश केला नाही. सुरुवातीला कमी वयातच त्यांनी वाळवा (सध्याचा राजारामबापू कारखाना) सहकारी साखर कारखान्याची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर वाळवा तालुक्यातील जमीन पाण्याखाली येण्यासाठी पदयात्रा काढली. पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदारीबरोबर मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्रिपद आहे. इस्लामपूर, आष्टा शहरांसह राजारामबापू उद्योग समूहात त्यांच्या गैरहजेरीत निर्णय घेणारे नेतृत्व नाही. ती जबाबदारी पेलण्यासाठी प्रतीक व राजवर्धन ही दोन्ही मुले सक्षम आहेत का, याची पाटील यांनी गेल्या चार-पाच वर्षांत चाचपणी केली आहे. यामध्ये प्रतीक पाटील उत्तीर्ण झाले आहेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यापासून प्रतीक पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातच तळ ठोकला आहे.

इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीची पीछेहाट झाली, त्याची सल जयंत पाटील यांच्या मनात आहे. त्यातच त्यांचे विश्वासू विजयभाऊ पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षबांधणीसाठी शहरात बूथ कमिट्या सक्षम करणे आणि जनतेत जाऊन प्रश्न मार्गी लावण्याचा कार्यक्रम जयंत पाटील यांनी हाती घेतला. या संपर्कदौऱ्यात प्रतीक पाटील यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय होता. दोन दिवसांपूर्वी तर ज्यांनी आयुष्य साखर कारखान्याच्या राजकारणात घालविले, अशा ज्येष्ठ संचालकांनाही प्रतीक पाटील यांनी ठिबक सिंचनावर मार्गदर्शन केले. त्यांची पावले राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाकडे वळू लागल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थात यावर जयंत पाटील यांचाच निर्णय अंतिम राहील.

फोटो-०९प्रतीक पाटील