शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांचे दुष्काळी तालुक्यांत ‘जलास्त्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:27 IST

कवठेमहांकाळ : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे सध्या दुष्काळी भागामध्ये म्हैसाळ, टेंभू योजनांचे पाणी सोडल्यामुळे टंचाई संपली आहे. या ...

कवठेमहांकाळ : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे सध्या दुष्काळी भागामध्ये म्हैसाळ, टेंभू योजनांचे पाणी सोडल्यामुळे टंचाई संपली आहे. या ‘जलास्त्रा’ने दुष्काळी पट्टा सुखावला आहे. तासगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यांना म्हैसाळ व टेंभू योजना वरदान ठरल्या आहेत. परंतु अपुरी कामे, अपूर्ण पोटपाट, नियमित पाण्याचा अभाव, पाणीपट्टीचा प्रश्नही सोडविण्याची गरज आहे.

दुष्काळी पट्ट्यातील काहीजण आजही म्हैसाळ आणि टेंभू योजनांच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ही कामे पूर्ण करून दुष्काळी तालुक्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. २००४ मध्ये राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना, पाटील यांनी त्यावेळी कृत्रिम पाऊस पाडला होता. त्यावेळी त्यांच्या ‘जयंत नक्षत्रा’ची राज्यात चर्चा झाली होती.

यावेळी दुष्काळी भागात पाटील यांच्या ‘जलास्त्रा’ची जोरदार चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात जत तालुक्यातील उमदीपर्यंत त्यांच्यामुळे टेंभूचे पाणी मिळाले. जत तालुक्यातील जनतेला पाटील यांचे वडील दिवंगत नेते राजारामबापू पाटील यांची आठवण झाली. पाटील यांनी बापूंचे स्वप्न, जतच्या शेतकऱ्यांची इच्छा पूर्ण केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

जतला पाणी जात असताना, कवठेमहांकाळ तालुका दुर्लक्षित राहू नये यासाठी त्यांनी तालुक्यातील सर्व म्हैसाळ, टेंभूची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, यासाठी जिल्हास्तरावर बैठक घेतली. ढालगाव, नागज, कुंडलापूर, गर्जेवाडी, जाखापूर, तिसंगी, वाघोली, घाटनांद्रे, केरेवाडी, चुडेखिंडी परिसराला टेंभूचे पाणी मिळावे, यासाठीही त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

चौकट

अपूर्ण कामांना गती

कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव उपसा सिंचन योजना पूर्ण होत आहे. ढालगाव व घाटमाथा परिसरात टेंभूची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. म्हैसाळ व टेंभू योजनेच्या पोटकालव्यांची कामे लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. विस्तारित गव्हाण योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव, तलाव, जाखापूर, केरेवाडी ही गावे सिंचनाखाली आणण्यासाठी जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळात ताकद लावली आहे. या कामासाठी त्यांची काही राज्यस्तरावरील नेत्यांशी तात्त्विक वादही झाल्याची चर्चा आहे. पाटील यांनी कवठेमहांकाळ, जत, तासगाव, आटपाडी या तालुक्यांतील सिंचन योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.