शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

जयंतरावांचे दुष्काळी तालुक्यांत ‘जलास्त्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:27 IST

कवठेमहांकाळ : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे सध्या दुष्काळी भागामध्ये म्हैसाळ, टेंभू योजनांचे पाणी सोडल्यामुळे टंचाई संपली आहे. या ...

कवठेमहांकाळ : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे सध्या दुष्काळी भागामध्ये म्हैसाळ, टेंभू योजनांचे पाणी सोडल्यामुळे टंचाई संपली आहे. या ‘जलास्त्रा’ने दुष्काळी पट्टा सुखावला आहे. तासगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यांना म्हैसाळ व टेंभू योजना वरदान ठरल्या आहेत. परंतु अपुरी कामे, अपूर्ण पोटपाट, नियमित पाण्याचा अभाव, पाणीपट्टीचा प्रश्नही सोडविण्याची गरज आहे.

दुष्काळी पट्ट्यातील काहीजण आजही म्हैसाळ आणि टेंभू योजनांच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ही कामे पूर्ण करून दुष्काळी तालुक्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. २००४ मध्ये राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना, पाटील यांनी त्यावेळी कृत्रिम पाऊस पाडला होता. त्यावेळी त्यांच्या ‘जयंत नक्षत्रा’ची राज्यात चर्चा झाली होती.

यावेळी दुष्काळी भागात पाटील यांच्या ‘जलास्त्रा’ची जोरदार चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात जत तालुक्यातील उमदीपर्यंत त्यांच्यामुळे टेंभूचे पाणी मिळाले. जत तालुक्यातील जनतेला पाटील यांचे वडील दिवंगत नेते राजारामबापू पाटील यांची आठवण झाली. पाटील यांनी बापूंचे स्वप्न, जतच्या शेतकऱ्यांची इच्छा पूर्ण केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

जतला पाणी जात असताना, कवठेमहांकाळ तालुका दुर्लक्षित राहू नये यासाठी त्यांनी तालुक्यातील सर्व म्हैसाळ, टेंभूची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, यासाठी जिल्हास्तरावर बैठक घेतली. ढालगाव, नागज, कुंडलापूर, गर्जेवाडी, जाखापूर, तिसंगी, वाघोली, घाटनांद्रे, केरेवाडी, चुडेखिंडी परिसराला टेंभूचे पाणी मिळावे, यासाठीही त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

चौकट

अपूर्ण कामांना गती

कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव उपसा सिंचन योजना पूर्ण होत आहे. ढालगाव व घाटमाथा परिसरात टेंभूची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. म्हैसाळ व टेंभू योजनेच्या पोटकालव्यांची कामे लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. विस्तारित गव्हाण योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव, तलाव, जाखापूर, केरेवाडी ही गावे सिंचनाखाली आणण्यासाठी जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळात ताकद लावली आहे. या कामासाठी त्यांची काही राज्यस्तरावरील नेत्यांशी तात्त्विक वादही झाल्याची चर्चा आहे. पाटील यांनी कवठेमहांकाळ, जत, तासगाव, आटपाडी या तालुक्यांतील सिंचन योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.