शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जयंत दारिद्र्य निर्मूलनातून रोजगार वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST

इस्लामपूर : जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील छोट्या-छोट्या ३६४ व्यावसायिकांना गेल्या ६ वर्षात २० लाख ५६ ...

इस्लामपूर : जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील छोट्या-छोट्या ३६४ व्यावसायिकांना गेल्या ६ वर्षात २० लाख ५६ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केल्याची माहिती युवा नेते प्रतीक पाटील यांनी दिली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील स्वयंरोजगार वाढायला हवा, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या सभागृहात वाळवा तालुक्यातील १९ छोट्या व्यावसायिकांना अर्थसाहाय्य, तर ११ व्यक्तींना विविध आजारांसाठी त्यांच्याहस्ते आर्थिक मदत देण्यात आली. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर उपस्थित होत्या.

प्रतीक पाटील म्हणाले, तुमचा व्यवसाय छोटा आहे, म्हणून निराश होऊ नका. मन लावून व्यवसाय करा. हाच तुमचा व्यवसाय तुमच्या कुटुंबाचा आधार बनेल.

प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, संग्राम फडतरे, विराज शिंदे, माणिक शेळके, सुवर्णा पाटील, अलका माने, मनीषा पेठकर, शिवाजी चोरमुले, स्वरूप मोरे, अभियानाचे समन्वयक इलियास पिरजादे उपस्थित होते.

चाैकट

यांना मदत...

आष्टा येथील सायराबानू मुलाणी, शिवकुमार हाबळे, दत्तात्रय आवटे, राजू वारे, मोहसीन तांबोळी, समीर मुजावर, अश्विनी हालुंडे, गीता शिंदे, विनया कुलकर्णी, रमजान इनामदार (शिगाव), बाबू चव्हाण (गोटखिंडी), बाळासाहेब आगा (साखराळे), सुवर्णा साळुंखे (कापूसखेड), मधुमालती साठे (वाटेगाव), राजाराम सूर्यवंशी (कासेगाव), पांडुरंग चव्हाण (नेर्ले), सविता सुर्वे, साधना सुर्वे (नरसिंहपूर) यांना व्यवसाय करण्यास अर्थसाहाय्य करण्यात आले.

फोटो-१६इस्लामपुर१

फोटो ओळी-

इस्लामपूर येथे जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाचे प्रतीक पाटील यांच्याहस्ते गरजूंना अर्थसाहाय्य करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, रोझा किणीकर, संग्राम फडतरे, माणिक शेळके, सुभाषराव सूर्यवंशी उपस्थित होते.