शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरणग्रस्तांच्या सर्वेक्षणातून ज्यांची घरे, जमिनीच्या ताली (बांध) व विहिरी चुकल्या होत्या, त्या १४ गावांतील ८५० पैकी ७५१ लाभार्थ्यांचे पुनर्सर्वेक्षण कारण्यात आले. त्याचा अंतिम अहवाल पूर्णत्वाकडे आहे. त्यापूर्वी सर्वेक्षणाचा आढावा, धरणग्रस्तांचे म्हणणे व प्रत्यक्ष पाहणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
प्रत्यक्ष पाहणीसाठी झोळंबी या जंगलातून पुनर्वसन झालेल्या गावास त्यांनी भेट दिली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, वनसंरक्षक समाधान चव्हाण, उप वनसंरक्षक प्रमोद धानके, वनसंरक्षक बी. एस. घाडगे, तहसीलदार गणेश शिंदे, विभागीय वन अधिकारी महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल जी. एस. लंगोटे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपअभियंता मिलिंद किटवाडकर व महेश चव्हाण, प्रकल्पग्रस्तांचे समन्वयक ज्ञानदेव पवार, किसन मलप, धाऊजी अनुसे, शंकर सावंत, सरपंच वसंत पाटील, मोहन पाटील, राजू वडम, सरपंच राजू मुटल, श्रीपती अनुते, संजय वडाम, सदाशिव वाडाम, दिनकर दिंडे, सावळा पाटील आदी उपस्थित होते.