शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांचे बाहुबल वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:00 IST

सांगली : माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्यानंतर जिल्ह्याला दुसऱ्यांदा राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता जयंत पाटील यांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील त्यांचे समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणाचा अनुभव असणाºया नेत्यांमध्ये जयंत पाटील यांचा समावेश होतो. आर. ...

सांगली : माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्यानंतर जिल्ह्याला दुसऱ्यांदा राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता जयंत पाटील यांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील त्यांचे समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणाचा अनुभव असणाºया नेत्यांमध्ये जयंत पाटील यांचा समावेश होतो. आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि जयंत पाटील या त्रिमूर्र्तींनी एकाचवेळी मंत्रीपदे व राज्यातील महत्त्वाची पदे सांभाळून सांगलीचा दबदबा निर्माण केला होता. त्यातील आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपविरोधात आता जयंत पाटील यांची लढाई सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचा विचार पक्षीय स्तरावर सुरू झाला आहे. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्टÑातील राष्टÑवादीच्या काही आमदारांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांचे नाव पक्षश्रेष्ठींना सुचविल्याचे समजते. याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. तरीही प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.आर. आर. पाटील यांनी यापूर्वी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते. त्यानंतर जिल्ह्याला ही संधी दुसºयांदा जयंत पाटील यांच्या माध्यमातून मिळू शकते. या पदावर त्यांची वर्णी लागली, तर जिल्ह्यातील राष्टÑवादीला मोठे बळ मिळणार आहे. सध्या पाटील यांच्यासाठी भाजप व अन्य विरोधकांनी चक्रव्यूह रचला आहे. त्यांना मतदारसंघातच थोपवण्याची व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे त्यांच्या संघर्षाला या पदाच्या माध्यमातून बळ मिळू शकते. पक्षीय संघटन मजबूत करण्यासाठी त्यांना या पदाची मदत होऊ शकते. आजही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जयंत पाटील यांना मानणारा गट आहे. पाटील यांनी गेल्या काही वर्षात तालुकानिहाय समर्थक, कार्यकर्त्यांच्या गटाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. महापालिका क्षेत्रात मात्र आता निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पदे वाटपावरून होणारे वाद मिटविताना त्यांना मर्यादा येत आहेत. अशावेळी पक्षाचे राज्याचे पद मिळाले, तर वाद मिटवून संघटन अधिक मजबूत करता येऊ शकेल. त्यामुळे त्यांना पद मिळावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. या चर्चेने पक्षांंतर्गत वातावरणात बदल झाला आहे.महापालिका निवडणुकीत : फायदासांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक आता जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले, तर त्याचा फायदा स्थानिक पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड व्हावी, अशी इच्छा येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.निकटवर्तीय नेत्यांना आशा!जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांना या पदाबाबत आशा वाटते. राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये जयंत पाटील यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.