शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

जयंत पाटील यांचे बाहुबल वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:00 IST

सांगली : माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्यानंतर जिल्ह्याला दुसऱ्यांदा राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता जयंत पाटील यांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील त्यांचे समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणाचा अनुभव असणाºया नेत्यांमध्ये जयंत पाटील यांचा समावेश होतो. आर. ...

सांगली : माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्यानंतर जिल्ह्याला दुसऱ्यांदा राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता जयंत पाटील यांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील त्यांचे समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणाचा अनुभव असणाºया नेत्यांमध्ये जयंत पाटील यांचा समावेश होतो. आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि जयंत पाटील या त्रिमूर्र्तींनी एकाचवेळी मंत्रीपदे व राज्यातील महत्त्वाची पदे सांभाळून सांगलीचा दबदबा निर्माण केला होता. त्यातील आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपविरोधात आता जयंत पाटील यांची लढाई सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचा विचार पक्षीय स्तरावर सुरू झाला आहे. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्टÑातील राष्टÑवादीच्या काही आमदारांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांचे नाव पक्षश्रेष्ठींना सुचविल्याचे समजते. याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. तरीही प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.आर. आर. पाटील यांनी यापूर्वी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते. त्यानंतर जिल्ह्याला ही संधी दुसºयांदा जयंत पाटील यांच्या माध्यमातून मिळू शकते. या पदावर त्यांची वर्णी लागली, तर जिल्ह्यातील राष्टÑवादीला मोठे बळ मिळणार आहे. सध्या पाटील यांच्यासाठी भाजप व अन्य विरोधकांनी चक्रव्यूह रचला आहे. त्यांना मतदारसंघातच थोपवण्याची व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे त्यांच्या संघर्षाला या पदाच्या माध्यमातून बळ मिळू शकते. पक्षीय संघटन मजबूत करण्यासाठी त्यांना या पदाची मदत होऊ शकते. आजही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जयंत पाटील यांना मानणारा गट आहे. पाटील यांनी गेल्या काही वर्षात तालुकानिहाय समर्थक, कार्यकर्त्यांच्या गटाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. महापालिका क्षेत्रात मात्र आता निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पदे वाटपावरून होणारे वाद मिटविताना त्यांना मर्यादा येत आहेत. अशावेळी पक्षाचे राज्याचे पद मिळाले, तर वाद मिटवून संघटन अधिक मजबूत करता येऊ शकेल. त्यामुळे त्यांना पद मिळावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. या चर्चेने पक्षांंतर्गत वातावरणात बदल झाला आहे.महापालिका निवडणुकीत : फायदासांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक आता जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले, तर त्याचा फायदा स्थानिक पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड व्हावी, अशी इच्छा येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.निकटवर्तीय नेत्यांना आशा!जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांना या पदाबाबत आशा वाटते. राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये जयंत पाटील यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.