शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांच्या भानगडी बाहेर काढणार

By admin | Updated: October 9, 2015 00:47 IST

राजू शेट्टी : नेर्ले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा; ‘एफआरपी’ची रक्कम एकाच वेळी द्या

नेर्ले : मी शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलो आहे. शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत लढणार आहे. आम्ही भाडोत्री मंडळी नव्हे. जयंत पाटील यांच्या भानगडी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मला निवडून दिले आहे. येणाऱ्या काळात जयंत पाटील यांच्या भानगडी बाहेर काढू. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे कारखानदारांचे कारस्थान उधळून लावू, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.नेर्ले (ता. वाळवा) येथे बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते.खा. राजू शेट्टी म्हणाले, जयंत पाटील, तुम्ही मंत्री होता तेव्हा बगलबच्चांना घेऊन दरोडे घातले. परंतु मी शेतकऱ्यांसाठी लढलो. दरोडे घातले नाहीत. हा तुमच्या नि माझ्यातला फरक आहे. एफआरपीपेक्षा कमी दर देणाऱ्यांच्या पुतळ्याचे दहन तुम्ही करणार काय? की त्यासाठी तुमच्या हातात काडीपेटी आम्ही देऊ?. १६ तारखेच्या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा.यावेळी प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले, एकरकमी एफआरपीची रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करा, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत. कायद्याने दिलेले संरक्षण व हक्क अबाधित ठेवण्यासाठी एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे राहतील. ते खासगी करण्याचे मनसुबे धुळीला मिळवू.महेश पाटील यांनी स्वागत केले. हणमंतराव कुंभार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शहाजी पाटील, उत्तमराव पाटील, डॉ. एस. व्ही. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास देशमुख, जयकर कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. हेमंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पाटील यांनी आभार मानले.सभेस पी. वाय. पाटील, एल. एम. पाटील, जयकर पाटील, जयसिंग माने, भीमराव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)