शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जयंत पाटील अनावधानाने राजकारणात आलेले पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST

सांगली : कोणतीही पात्रता नसताना केवळ लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याजागी अनुकंपा तत्वावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात ...

सांगली : कोणतीही पात्रता नसताना केवळ लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याजागी अनुकंपा तत्वावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आले, अशी खोचक टीका भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीसाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याबाबतची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात यावरुन चर्चेला उधाण आले आहे. यावर पडळकर म्हणाले की, ज्याप्रमाणे शासकीय नोकऱ्यांमध्ये अनुकंपा भरतीचे धोरण राबविले जाते. त्यासाठी गुणवत्तेऐवजी केवळ पात्रता हा निकष असतो. त्याप्रमाणेच जयंत पाटील हे राजारामबापूंच्या जागेवर अनुकंपा तत्वावर राजकारणात आले आहेत.

त्यांनी आजवर जिल्ह्यासाठी एकही ठोस काम केले नाही. आजवर राजकारणात त्यांनी कोणते चांगले काम झाले, ते सांगावे. कोणताही निधी आला की, आपल्या मतदार संघासाठी पळविणे एवढेच काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. अशी व्यक्ती मुख्यमंत्री होईल, असे वाटत नाही. भविष्यात राष्ट्रवादी पक्षच अस्तित्वात राहील की नाही, ही शंका आहे. त्यामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही.

चौकट

त्यांना ‘युनो’मध्ये पाठवा

जयंत पाटलांच्या भावनेची दखल पक्षाचे नेते शरद पवार यांनी घ्यावी आणि त्यांना ‘युनो’मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोठे पाठवता येते का पहावे. कारण जयंत पाटील हे फार बुद्धिमान आहेत, अशी त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, असा टोलाही पडळकर यांनी लगावला आहे.