शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

जत तालुक्याला अच्छे दिन येणार का?

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

मूलभूत प्रश्न सुटण्याची गरज : तालुका विभाजनाकडेही गांभीर्याने लक्ष हवे

भागवत काटकर - जत -केंद्रात व राज्यात भाजपचे शासन, तर जत तालुक्यातही आमदार विलासराव जगताप यांच्या रूपाने भाजपची सत्ता आली आहे. तालुक्यातील रस्ते, ६७ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश, तालुका विभाजन आदी कामे प्रलंबित राहिली आहेत. आता भाजपचे विलासराव जगताप यांना संधी मिळाल्याने, जत तालुक्याला अच्छे दिन येणार का? अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांना पहिल्यांदाच जगताप यांनी जाहीर पाठिंबा दिला. मोदी लाटेच्या गणिताने संजयकाका खासदार झाले. त्यांच्या विजयानंतर जगताप यांनी तालुक्यात गावोगावी आभार दौरे करून पुन्हा नेटवर्क उभे केले. पाटील यांच्याकडून लोकांच्याही तालुक्याच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्याचा फायदा या निवडणुकीत जगताप यांना झाला. आता दुष्काळी जत तालुक्यातील जनतेच्या असंख्य अपेक्षा विद्यमान आमदार जगताप यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुका विभाजन, म्हैसाळ योजनेतील वंचित ६७ गावांचा समावेश, तालुक्यातील ७0 टक्के रस्त्यांची दुरुस्ती, संख पोलीस ठाणे मंजुरी आदी कामांचा समावेश आहे.जत पूर्व भागातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना भरघोस मताधिक्य दिले. या पूर्व भागातील लोकांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत, एक तालुका विभाजन व दुसरी म्हैसाळ योजनेत समावेश. वर्षानुवर्षे दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या जनतेला पाण्याच्या टँकरपासून मुक्ती हवी आहे. या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्यास ऊस तोडीसाठी जाणाऱ्या सुमारे २५ ते ३५ हजार मजुरांचे स्थलांतर थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जत तालुक्याचे क्षेत्रफळ अधिक आहे. १२३ गावांच्या या तालुक्याचे विभाजन करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. शासकीय कामासाठी या भागातील लोकांना ५0 ते ६0 कि.मी. अंतरावर जतला यावे लागते. जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी, रेशन कार्डधारकांची विविध कामे या व इतर कामासाठी जत येथील तहसील कार्यालयाकडे यावे लागते.ही कामे एका दिवसात कधीच होत नाहीत. यासाठी वेळ, पैसा विनाकारण खर्च करण्याची वेळ जनतेवर येते. यासाठी तालुका विभाजन होणे ही एक प्रमुख मागणी आहे. शिवाय संख येथे पोलीस ठाण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.केंद्रात, राज्यात एकाच विचाराचे शासन आहे. नूतन आमदार विलासराव जगताप हे अभ्यासू व संघर्षातून तयार झालेले व्यक्तिमत्त्व आहे. तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून, तालुक्याला अच्छे दिन येणार का? अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रस्ते दुरुस्तीची गरजजत तालुक्यात ६0 ते ७0 टक्के रस्ते कच्चे आहेत. खराब रस्त्यामुळे लोकांचा वेळ व वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. जत शहरातील रस्त्यासाठी निधी मिळण्याची मागणी होत आहे. महसूल विभागाचा कारभार तर अत्यंत कमी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. १0 ते १२ गावांसाठी एक तलाठी अशी अवस्था आहे.