शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्याला अच्छे दिन येणार का?

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

मूलभूत प्रश्न सुटण्याची गरज : तालुका विभाजनाकडेही गांभीर्याने लक्ष हवे

भागवत काटकर - जत -केंद्रात व राज्यात भाजपचे शासन, तर जत तालुक्यातही आमदार विलासराव जगताप यांच्या रूपाने भाजपची सत्ता आली आहे. तालुक्यातील रस्ते, ६७ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश, तालुका विभाजन आदी कामे प्रलंबित राहिली आहेत. आता भाजपचे विलासराव जगताप यांना संधी मिळाल्याने, जत तालुक्याला अच्छे दिन येणार का? अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांना पहिल्यांदाच जगताप यांनी जाहीर पाठिंबा दिला. मोदी लाटेच्या गणिताने संजयकाका खासदार झाले. त्यांच्या विजयानंतर जगताप यांनी तालुक्यात गावोगावी आभार दौरे करून पुन्हा नेटवर्क उभे केले. पाटील यांच्याकडून लोकांच्याही तालुक्याच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्याचा फायदा या निवडणुकीत जगताप यांना झाला. आता दुष्काळी जत तालुक्यातील जनतेच्या असंख्य अपेक्षा विद्यमान आमदार जगताप यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुका विभाजन, म्हैसाळ योजनेतील वंचित ६७ गावांचा समावेश, तालुक्यातील ७0 टक्के रस्त्यांची दुरुस्ती, संख पोलीस ठाणे मंजुरी आदी कामांचा समावेश आहे.जत पूर्व भागातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना भरघोस मताधिक्य दिले. या पूर्व भागातील लोकांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत, एक तालुका विभाजन व दुसरी म्हैसाळ योजनेत समावेश. वर्षानुवर्षे दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या जनतेला पाण्याच्या टँकरपासून मुक्ती हवी आहे. या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्यास ऊस तोडीसाठी जाणाऱ्या सुमारे २५ ते ३५ हजार मजुरांचे स्थलांतर थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जत तालुक्याचे क्षेत्रफळ अधिक आहे. १२३ गावांच्या या तालुक्याचे विभाजन करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. शासकीय कामासाठी या भागातील लोकांना ५0 ते ६0 कि.मी. अंतरावर जतला यावे लागते. जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी, रेशन कार्डधारकांची विविध कामे या व इतर कामासाठी जत येथील तहसील कार्यालयाकडे यावे लागते.ही कामे एका दिवसात कधीच होत नाहीत. यासाठी वेळ, पैसा विनाकारण खर्च करण्याची वेळ जनतेवर येते. यासाठी तालुका विभाजन होणे ही एक प्रमुख मागणी आहे. शिवाय संख येथे पोलीस ठाण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.केंद्रात, राज्यात एकाच विचाराचे शासन आहे. नूतन आमदार विलासराव जगताप हे अभ्यासू व संघर्षातून तयार झालेले व्यक्तिमत्त्व आहे. तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून, तालुक्याला अच्छे दिन येणार का? अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रस्ते दुरुस्तीची गरजजत तालुक्यात ६0 ते ७0 टक्के रस्ते कच्चे आहेत. खराब रस्त्यामुळे लोकांचा वेळ व वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. जत शहरातील रस्त्यासाठी निधी मिळण्याची मागणी होत आहे. महसूल विभागाचा कारभार तर अत्यंत कमी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. १0 ते १२ गावांसाठी एक तलाठी अशी अवस्था आहे.