शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जत तालुक्याला अच्छे दिन येणार का?

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

मूलभूत प्रश्न सुटण्याची गरज : तालुका विभाजनाकडेही गांभीर्याने लक्ष हवे

भागवत काटकर - जत -केंद्रात व राज्यात भाजपचे शासन, तर जत तालुक्यातही आमदार विलासराव जगताप यांच्या रूपाने भाजपची सत्ता आली आहे. तालुक्यातील रस्ते, ६७ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश, तालुका विभाजन आदी कामे प्रलंबित राहिली आहेत. आता भाजपचे विलासराव जगताप यांना संधी मिळाल्याने, जत तालुक्याला अच्छे दिन येणार का? अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांना पहिल्यांदाच जगताप यांनी जाहीर पाठिंबा दिला. मोदी लाटेच्या गणिताने संजयकाका खासदार झाले. त्यांच्या विजयानंतर जगताप यांनी तालुक्यात गावोगावी आभार दौरे करून पुन्हा नेटवर्क उभे केले. पाटील यांच्याकडून लोकांच्याही तालुक्याच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्याचा फायदा या निवडणुकीत जगताप यांना झाला. आता दुष्काळी जत तालुक्यातील जनतेच्या असंख्य अपेक्षा विद्यमान आमदार जगताप यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुका विभाजन, म्हैसाळ योजनेतील वंचित ६७ गावांचा समावेश, तालुक्यातील ७0 टक्के रस्त्यांची दुरुस्ती, संख पोलीस ठाणे मंजुरी आदी कामांचा समावेश आहे.जत पूर्व भागातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना भरघोस मताधिक्य दिले. या पूर्व भागातील लोकांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत, एक तालुका विभाजन व दुसरी म्हैसाळ योजनेत समावेश. वर्षानुवर्षे दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या जनतेला पाण्याच्या टँकरपासून मुक्ती हवी आहे. या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्यास ऊस तोडीसाठी जाणाऱ्या सुमारे २५ ते ३५ हजार मजुरांचे स्थलांतर थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जत तालुक्याचे क्षेत्रफळ अधिक आहे. १२३ गावांच्या या तालुक्याचे विभाजन करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. शासकीय कामासाठी या भागातील लोकांना ५0 ते ६0 कि.मी. अंतरावर जतला यावे लागते. जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी, रेशन कार्डधारकांची विविध कामे या व इतर कामासाठी जत येथील तहसील कार्यालयाकडे यावे लागते.ही कामे एका दिवसात कधीच होत नाहीत. यासाठी वेळ, पैसा विनाकारण खर्च करण्याची वेळ जनतेवर येते. यासाठी तालुका विभाजन होणे ही एक प्रमुख मागणी आहे. शिवाय संख येथे पोलीस ठाण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.केंद्रात, राज्यात एकाच विचाराचे शासन आहे. नूतन आमदार विलासराव जगताप हे अभ्यासू व संघर्षातून तयार झालेले व्यक्तिमत्त्व आहे. तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून, तालुक्याला अच्छे दिन येणार का? अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रस्ते दुरुस्तीची गरजजत तालुक्यात ६0 ते ७0 टक्के रस्ते कच्चे आहेत. खराब रस्त्यामुळे लोकांचा वेळ व वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. जत शहरातील रस्त्यासाठी निधी मिळण्याची मागणी होत आहे. महसूल विभागाचा कारभार तर अत्यंत कमी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. १0 ते १२ गावांसाठी एक तलाठी अशी अवस्था आहे.